रोहा महावितरणच्या दुर्लक्षामुळे १२ गावे तीन दिवस अंधारात...

मुरूड (वार्ताहर) : रोहा तालुक्यातील दुर्गम ग्रामीण भागातील असलेली गावे गोपाळवट, फणसवाडी, वाघीरपट्टी, मसाडी, कांटी, केळघर, वांडरखोंडा, साटलेवाडी, आराळी, खडकी, वांदरखोंड असा सुमारे दहा ते बारा गावांचा वीज पुरवठा गेल्या तीन दिवसांपासून खंडित झाल्याने वीज ग्राहक पुरते हैराण झाले आहेत. दरवर्षी रोहा महावितरणचे दुर्लक्ष होत असल्याने अशा प्रकारे अनेक दिवस वीज प्रवाह खंडित होत असतो, असा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे.


गुरुवार ०९ जून रोजी या गावांचा वीज पुरवठा खंडित झाला असुन, गेले अठ्ठेचाळीस तास उलटून गेले तरी विज प्रवाह सुरू झाला नसल्याने या गावातील ग्रामस्थ हैराण झाले आहेत. अनेक वेळा रोहा महावितरणच्या कर्मचाऱ्यांना फोन केला असता, एक तासात दोन तासात लाईट येईल असे सांगत असून अठ्ठेचाळीस तास उलटून गेले तरी वीजेचा पत्ता नाही, अशी माहिती फणसवाडीचे ग्रामस्थ गोविंद हिरवे यांनी दिली.


ही गावे अत्यंत दुर्गम डोंगर भागात वसलेले असल्याने महावितरण या गावांच्या वीज पुरवठ्याकडे नेहमीच दक्ष करीत असल्याने गावांतील ग्रामस्थांना नेहमीच अंधारात रहावे लागते. याकडे तातडीने लक्ष देऊन या ठिकाणच्या गावांचा नेहमीच विज पुरवठा खंडीत होत असलेला सुरळीत करावा, अशी या ठिकाणच्या ग्रामस्थांची मागणी आहे.

Comments
Add Comment

महाडमध्ये वृद्ध महिलेची हत्या; २४ तासांत गुन्ह्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश

महाड : महाड तालुक्यातील नाते येथे ७५ वर्षीय लीलावती राजाराम बलकवडे यांची शेतातील वाड्यावर हत्या करून सोन्याचे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पेण दौरा रद्द

अलिबाग (प्रतिनिधी) : रायगड जिल्ह्यातील नगरपालिकांचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून, या प्रचाराकडे सर्वच

सांडपाण्यामुळे कुंडलिका नदीचे पाणी प्रदूषित

रोहा : रोहा परिसरातील जीवनरेखा मानली जाणाऱ्या कुंडलिका नदीत धाटाव एमआयडीसी परिसरातून सोडल्या जाणाऱ्या

रेवस - रेड्डी सागरी मार्गावरील आणखी एका पुलाच्या कामाला गती

नव्या रेवदंडा - साळाव पुलासाठी १२५० कोटींचा निधी मंजूर अलिबाग : रेवस-रेड्डी सागरी मार्गावरील आणखी एका पुलाच्या

दहा नगरपालिका हद्दीत मद्यविक्रीला ३ दिवस बंदी

नगरपालिका निवडणूक पार्श्वभूमीवर प्रशासनाचे निर्देश अलिबाग : निवडणूक खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार

नगर परिषदांच्या निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज

नगराध्यक्ष-नगरसेवक पदांसाठी ६२९ उमेदवार रिंगणात, उद्या संध्याकाळी ५ वाजता प्रचार संपणार अडीच लाख मतदार ठरविणार