हायकोर्टाने नाकारली मलिक-देशमुखांना राज्यसभेसाठी मतदानाची परवानगी

  72

मुंबई, (हिं.स.) : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना राज्यसभा निवडणुकीत मतदान करण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाने नाकारली आहे. गुरुवारी सत्र न्यायालयाने दोन्ही नेत्यांना मतदान करण्याची परवानगी नाकारली होती. तोच निर्णय वरिष्ठ न्यायालयाने आजही कायम ठेवला.


राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागांसाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत सहा जागांवर सात उमेदवार रिंगणात आहेत. सहावा उमेदवार विजयी करण्यासाठी आवश्यक असलेली मते कुठल्याच राजकीय पक्षांकडे नसल्याने एक-एक मत अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी लहान पक्ष आणि अपक्षांचीही मदत घेण्यात येत आहे.


मात्र, सत्ताधारी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे दोन आमदार हे अटकेत आहेत. त्यामुळे या आमदारांनाही निवडणुकीत मतदान करण्याची परवानगी मिळावी, यासाठी सत्र न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. मात्र, सत्र न्यायालयाने मतदानाची परवानगी नाकारली. त्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात तातडीने आव्हान देण्यात आले. त्यावर आज सुनावणी झाली. त्यात उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निकाल कायम ठेवत मतदान करण्याची परवानगी नाकारली.


ही याचिका सुनावणीसाठी योग्यच नाही असा दावा सरकारी पक्षाची बाजू मांडणाऱ्या महाधिवक्ता अनिल सिंग यांनी न्यायालयात केला. त्यावर नवाब मलिकांच्या वकिलांनी युक्तीवाद करताना म्हटले की, घटनात्मक अधिकार आहे तोच आम्ही मागतोय. आता मलिक कोठडीत नसून रुग्णालयात आहेत. त्यामुळे त्यांना फक्त काही वेळ दिला तर त्यांना त्यांचा घटनात्मक अधिकार वापरता येईल.


मलिक यांच्यावतीने युक्तीवादाकरता ज्येष्ठ वकील अमित देसाई, तर अनिल देशमुख यांच्यावतीने युक्तीवादाकरता आबाद पोंडा यांनी युक्तीवाद केला. तर सरकारी पक्षाची बाजू महाधिवक्ता अनिल सिंग यांनी मांडली.

Comments
Add Comment

हुंड्याऐवजी मुलींसाठी फिक्स डिपॉझिट

मराठा समाजाची लग्न आचारसंहिता अहिल्यानगर : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणानंतर मराठा समाजातील

आणिक आगार ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत धावणार मेट्रो

मुंबई : मुंबईतील मुख्य पर्यटन आकर्षणांपैकी एक असलेल्या 'गेट वे ऑफ इंडिया'ला भुयारी मेट्रोतून जाता येणार आहे. गेट

डॉक्टरांसाठी ‘क्यूआर कोड’ प्रणाली अनिवार्य

बोगस डॉक्टरांना बसणार आळा पुणे : राज्यातील बोगस डॉक्टरांच्या वाढत्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी आता

भाऊरायांना राखी पाठवण्यासाठी पोस्ट ऑफिस सज्ज, पावसाची चिंता मिटली; राखीसाठी वॉटरप्रूफ लिफाफा

पुणे (वार्ताहर) : दूरगावी असणाऱ्या भावाला आपली प्रेमाची राखी पाठविण्यासाठी सध्या बहिणींची लगबग सुरू आहे. तसेच

येमेनजवळ मोठी दुर्घटना, आफ्रिकन स्थलांतरितांची बोट बुडाली, ६० हून अधिक जणांचा मृत्यू

सना, येमेन: येमेनच्या किनाऱ्यावर रविवारी एक भीषण बोट दुर्घटना घडली, ज्यात ६० हून अधिक आफ्रिकन स्थलांतरितांचा

रक्षाबंधन २०२५: 'या' वेळेत चुकूनही बांधू नका राखी

मुंबई: भाऊ-बहिणीच्या पवित्र प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण २०२५ मध्ये शनिवार, ९ ऑगस्टला साजरा केला जाईल. या