सुक्या मासळीने खाल्ला भाव;  दरात ४० टक्क्यांनी वाढ

वाकटीचा दर ७०० रुपये किलो


सुधागड-पाली (वार्ताहर) : पावसाळा तोंडावर येऊन ठेपला आहे. जिल्ह्यात अगोटीची खरेदी जोरात आहे. त्यामुळे सुक्या मासळीची मागणी वाढली आहे. परिणामी मागणी अधिक व आवक कमी असल्याने मागील महिन्याच्या तुलनेत या महिन्यात सुक्या मासळीचे भाव तब्बल ३० ते ४० टक्क्यांनी वधारले आहेत.


गेल्या महिन्यात ४०० रुपये किलोने मिळणारी मोठी वाकटी आता तब्बल ७०० रुपये किलोने मिळत आहे. सोडे, माकूल अशा सुक्या मासळीचे भाव तर खूप वाढले आहेत.


१ जूनपासून समुद्रातील मासेमारी बंद झाली आहे. परिणामी पावसाळ्यात मांसाहारी खाणा-यांना सुक्या मासळीचा उत्तम पर्याय व आधार असतो. मात्र कमी प्रमाणात मासे मिळणे व मासळीची आवक कमी यामुळे सुक्या मासळीचे भाव वधारले आहेत.


जिल्ह्यातील समुद्रात अगदी कमी प्रमाणात मासळी सापडते. सापडलेली ताजी मासळी विकण्यावर मच्छिमारांचा कल असतो. मासळी आधीच कमी त्यात सुकविण्यासाठी कशी उरणार त्यामुळे मासळी फार कमी जण सुकवत आहेत, असे पालीतील मासळी विक्रेत्या गौरी मनोरे यांनी सांगितले. डिझेलचे व मजुरीच्या वाढलेल्या दरामुळेसुद्धा सुक्या मासळीचे भाव वाढले आहेत.


मासळीची आवक कमी झाल्याने सुकवलेले सुरमई व पापलेट, माकुल हे महागातले मासे बाजारातून गायब झाले आहेत. पावसाळ्यात समुद्रातील मासळी मिळत नसल्याने सुकी मासळीचा उत्तम पर्याय असतो. त्यामुळे किमत वाढली तरी सुकी मासळी काही प्रमाणात खरेदी केली आहे, असे खवय्ये किरण खंडागळे यांनी सांगितले. तसेच मागील महिन्याच्या तुलनेत आता सुक्या मासळीचे भाव खूप वाढले आहेत. अगोटी असल्याने खवय्ये सुकी मासळी खरेदी करतात, असे मासेविक्रेते सरफराज पानसरे म्हणाले.


सुकी मासळी भाव प्रतिकिलो


साधे सोडे - आता - १८०० रुपये, मागील महिन्यात १६०० रुपये


उच्च दर्जाचे सोडे - आता - २२०० रुपये, मागील महिन्यात - २००० रुपये


अंबाडी सुकट - आत्ता - ६५० रुपये, मागील महिन्यात - ५०० रुपये


सुकट - आत्ता - ३०० रुपये, मागील महिन्यात - २५० रुपये


मासे सुकट (खारे) - आत्ता - ५०० रुपये, मागील महिन्यात - ४०० रुपये


बोंबील - आत्ता - ७०० ते ७५० रुपये, मागील महिन्यात ६०० ते ७००


माकुल - आत्ता - ७०० रुपये, मागील महिन्यात - ६०० रुपये


वाकटी मोठी - आत्ता - ७०० रुपये, मागील महिन्यात - ४०० रुपये


वाकटी छोटी - आता ४०० रुपये, मागील महिन्यात ३०० रुपये.

Comments
Add Comment

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

काँग्रेसचे माजी नगरसेवक धर्मेश व्यासही भाजपात

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : काँग्रेसचे माजी नगरसेवक धर्मेश व्यास यांनीही अखेर भाजपच्या झेंडा हाती घेतला. धर्मेश

मीरा भाईंदरच्या मच्छीमारांच्या सर्व समस्या सोडवणार, मंत्री नितेश राणेंचे आश्वासन

भाईंदर : मीरा भाईंदर शहरातील उत्तन परिसरातील मच्छीमारांवर होत असलेला अन्याय दूर करून त्यांच्या सर्व समस्या

बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘आरोग्य आपल्या दारी’ उपक्रम राबवणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवक व नगराध्यक्षांचा सत्कार मुंबई : “मुख्यमंत्रीपदी

शिरोडा-वेळाघरमध्ये होणार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले पंचतारांकीत हॉटेल

पालकमंत्री नितेश राणेंच्या प्रयत्नांना यश; ताज समूहासोबत लवकरच सामंजस्य करार मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील

खरीप हंगाम २०२४–२५;मका,ज्वारी सह भरड धान्य खरेदीसाठी शेतकरी नोंदणीला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

मुंबई : खरीप हंगाम २०२४–२५ अंतर्गत शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत धान व मका, ज्वारी, रागीसह भरड धान्य