सुक्या मासळीने खाल्ला भाव;  दरात ४० टक्क्यांनी वाढ

वाकटीचा दर ७०० रुपये किलो


सुधागड-पाली (वार्ताहर) : पावसाळा तोंडावर येऊन ठेपला आहे. जिल्ह्यात अगोटीची खरेदी जोरात आहे. त्यामुळे सुक्या मासळीची मागणी वाढली आहे. परिणामी मागणी अधिक व आवक कमी असल्याने मागील महिन्याच्या तुलनेत या महिन्यात सुक्या मासळीचे भाव तब्बल ३० ते ४० टक्क्यांनी वधारले आहेत.


गेल्या महिन्यात ४०० रुपये किलोने मिळणारी मोठी वाकटी आता तब्बल ७०० रुपये किलोने मिळत आहे. सोडे, माकूल अशा सुक्या मासळीचे भाव तर खूप वाढले आहेत.


१ जूनपासून समुद्रातील मासेमारी बंद झाली आहे. परिणामी पावसाळ्यात मांसाहारी खाणा-यांना सुक्या मासळीचा उत्तम पर्याय व आधार असतो. मात्र कमी प्रमाणात मासे मिळणे व मासळीची आवक कमी यामुळे सुक्या मासळीचे भाव वधारले आहेत.


जिल्ह्यातील समुद्रात अगदी कमी प्रमाणात मासळी सापडते. सापडलेली ताजी मासळी विकण्यावर मच्छिमारांचा कल असतो. मासळी आधीच कमी त्यात सुकविण्यासाठी कशी उरणार त्यामुळे मासळी फार कमी जण सुकवत आहेत, असे पालीतील मासळी विक्रेत्या गौरी मनोरे यांनी सांगितले. डिझेलचे व मजुरीच्या वाढलेल्या दरामुळेसुद्धा सुक्या मासळीचे भाव वाढले आहेत.


मासळीची आवक कमी झाल्याने सुकवलेले सुरमई व पापलेट, माकुल हे महागातले मासे बाजारातून गायब झाले आहेत. पावसाळ्यात समुद्रातील मासळी मिळत नसल्याने सुकी मासळीचा उत्तम पर्याय असतो. त्यामुळे किमत वाढली तरी सुकी मासळी काही प्रमाणात खरेदी केली आहे, असे खवय्ये किरण खंडागळे यांनी सांगितले. तसेच मागील महिन्याच्या तुलनेत आता सुक्या मासळीचे भाव खूप वाढले आहेत. अगोटी असल्याने खवय्ये सुकी मासळी खरेदी करतात, असे मासेविक्रेते सरफराज पानसरे म्हणाले.


सुकी मासळी भाव प्रतिकिलो


साधे सोडे - आता - १८०० रुपये, मागील महिन्यात १६०० रुपये


उच्च दर्जाचे सोडे - आता - २२०० रुपये, मागील महिन्यात - २००० रुपये


अंबाडी सुकट - आत्ता - ६५० रुपये, मागील महिन्यात - ५०० रुपये


सुकट - आत्ता - ३०० रुपये, मागील महिन्यात - २५० रुपये


मासे सुकट (खारे) - आत्ता - ५०० रुपये, मागील महिन्यात - ४०० रुपये


बोंबील - आत्ता - ७०० ते ७५० रुपये, मागील महिन्यात ६०० ते ७००


माकुल - आत्ता - ७०० रुपये, मागील महिन्यात - ६०० रुपये


वाकटी मोठी - आत्ता - ७०० रुपये, मागील महिन्यात - ४०० रुपये


वाकटी छोटी - आता ४०० रुपये, मागील महिन्यात ३०० रुपये.

Comments
Add Comment

शक्तिपीठ महामार्ग महाराष्ट्रातील या जिल्ह्यांतून जाणार

मुंबई : एमएसआरडीसीने ८५६ किमीच्या महाराष्ट्रातील १३ जिल्ह्यांतील ३९५ गावांतून जाणार असलेल्या शक्तिपीठ

कर्तव्यपथावर 'गणपती बाप्पा मोरया'चा गजर, प्रजासत्ताक दिनी दिसले देशाचे सामर्थ्य

नवी दिल्ली : भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी नवी दिल्लीत कर्तव्यपथावर संचलनाचे अर्थात

प्रजासत्ताक दिनी धाराशिवमध्ये पोलिसाचा मृत्यू

धाराशिव : प्रजासत्ताक दिनी ध्वजवंदन केल्यानंतर थोड्याच वेळात ५५ वर्षीय मोहन भीमा जाधव या पोलीस अधिकाऱ्याचा

मोदी सरकारचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना होणार फायदा

नवी दिल्ली : मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना फायदा

फिलिपाईन्समध्ये बोट बुडून अनेकांचा मृत्यू

झांबोआंगा : फिलिपाईन्समध्ये झांबोआंगा येथून सुलू प्रांतातील जोलो बेटाच्या दिशेने निघालेली बोट समुद्रात

मराठी रीलस्टार प्रथमेश कदमचे निधन

मुंबई : लोकप्रिय मराठी रीलस्टार आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रथमेश कदमचं निधन झालं आहे. प्रथमेशच्या निधनाचे