दुचाकीवरील सह प्रवाशाला हेल्मेट सक्ती रद्द करण्याची मागणी

  66

मुंबई (प्रतिनिधी): मुंबई शहरात दुचाकीवरील सह प्रवाशाला हेल्मेट सक्ती करणे हा पोलीस आयुक्तांचा निर्णय अत्यंत बालीशपणाचा आणि अन्यायकारक आहे. या निर्णयावर मुंबईकरांमध्ये संतप्त भावना आहे. हा निर्णय त्वरित रद्द करावा, अशी मागणी गृहमंत्र्यांकडे पत्र पाठवून केली आहे. निर्णय रद्द न केल्यास भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, अशी माहिती आमदार अतुल भातखळकर यांनी दिली.


पोलीस आयुक्तांचा हा निर्णय म्हणजे 'आजार म्हशीला आणि औषध पखाल्याला' असे आहे. दुचाकीवर ऐनवेळी बसणा-याने हेल्मेट कोठून आणायचे?, दुचाकीमध्ये दोन हेल्मेट ठेवण्याची जागा असते का? ताशी ४० किमी पेक्षा कमी वेगात वाहन चालवले जात असताना हेल्मेटची गरज काय? असा सवाल आ. भातखळकर यांनी केला. आ. भातखळकर म्हणाले, ही हेल्मेट सक्ती त्वरित मागे घेण्यात यावी. गृहमंत्री दिलीप वळसे - पाटील यांनी यामध्ये गांभीर्याने लक्ष देऊन तसा निर्णय जाहीर करावा, अन्यथा भारतीय जनता पार्टीच्या आंदोलनास सामोरे जाण्यासाठी सज्ज रहावे, असे भातखळकर म्हणाले.

Comments
Add Comment

सौर पंप शक्य नसल्यास पारंपरिक कृषी पंप देणार

भौगोलिक परिस्थितीनुसार निर्णय घेणार मुंबई : राज्य शासनाने सौर ऊर्जेवर आधारित कृषी पंप देण्यावर भर दिला आहे.

वाहतूकदारांच्या संपात ७० हजार वाहने सहभागी

नागरिकांसह आयात-निर्यातदारांना संपाचा मोठा फटका मुंबई : ई-चलन व वाहतूकदारावर लाभलेल्या इतर अनेक अन्यायकारक

मुंबईतील सर्व कबुतरखाने बंद करण्याचे निर्देश

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील कबुतरखान्यांमुळे श्वसन तसेच फुफ्फुसांचे आजार वाढले असून यात काही रहिवाशांचा

Nitesh Rane : “पिक्चर अभी बाकी हैं”, ‘तुम्हाला सांगून ठेवलेली उत्तर रेकॉर्ड करुन’ नंतर एकत्र…मंत्री नितेश राणेंचा हल्लाबोल

मुंबई : दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांना दिलासा मिळाला आहे. मुंबई

आरोग्यास अपायकारक तरीही मुंबई महापालिकेच्या हद्दीत ५१ कबुतरखाने पुन्हा सुरू

मनपाने मुंबईतील कबूतरखान्यांबाबत विशेष अभियान राबवावे – मंत्री उदय सामंत मुंबई : सध्या मुंबई महापालिकेच्या

शक्तीपीठ महामार्ग लोकांच्या विकासासाठी : मंत्री नितेश राणे

मुंबई : शक्तीपीठ महामार्ग हा लोकांच्या विकासासाठी आहे. या प्रकल्पासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी मी पालकमंत्री