दुचाकीवरील सह प्रवाशाला हेल्मेट सक्ती रद्द करण्याची मागणी

मुंबई (प्रतिनिधी): मुंबई शहरात दुचाकीवरील सह प्रवाशाला हेल्मेट सक्ती करणे हा पोलीस आयुक्तांचा निर्णय अत्यंत बालीशपणाचा आणि अन्यायकारक आहे. या निर्णयावर मुंबईकरांमध्ये संतप्त भावना आहे. हा निर्णय त्वरित रद्द करावा, अशी मागणी गृहमंत्र्यांकडे पत्र पाठवून केली आहे. निर्णय रद्द न केल्यास भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, अशी माहिती आमदार अतुल भातखळकर यांनी दिली.


पोलीस आयुक्तांचा हा निर्णय म्हणजे 'आजार म्हशीला आणि औषध पखाल्याला' असे आहे. दुचाकीवर ऐनवेळी बसणा-याने हेल्मेट कोठून आणायचे?, दुचाकीमध्ये दोन हेल्मेट ठेवण्याची जागा असते का? ताशी ४० किमी पेक्षा कमी वेगात वाहन चालवले जात असताना हेल्मेटची गरज काय? असा सवाल आ. भातखळकर यांनी केला. आ. भातखळकर म्हणाले, ही हेल्मेट सक्ती त्वरित मागे घेण्यात यावी. गृहमंत्री दिलीप वळसे - पाटील यांनी यामध्ये गांभीर्याने लक्ष देऊन तसा निर्णय जाहीर करावा, अन्यथा भारतीय जनता पार्टीच्या आंदोलनास सामोरे जाण्यासाठी सज्ज रहावे, असे भातखळकर म्हणाले.

Comments
Add Comment

Mumbai HC Voting List : मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय; मतदार यादी विरोधातील सर्व याचिका फेटाळल्या!

मुंबई : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Local Self-Government Bodies) निवडणुकीच्या दृष्टीने मुंबई उच्च न्यायालयाने

मुंबई विमानतळावर २० नोव्हेंबरला दोन्ही रनवे तात्पुरते बंद

मुंबई : जगातील सर्वाधिक व्यस्त सिंगल रनवे विमानतळांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज

...म्हणून रोहित आर्यशी बोलले नव्हते माजी मंत्री दीपक केसरकर

मुंबई: मागील आठवड्यात पवईच्या आर.ए. स्टुडिओमध्ये ओलीस ठेवलेल्या मुलांच्या घटनेनंतर सर्वत्रच भीतीदायक वातावरण

मुन्नारला पर्यटनासाठी गेलेल्या महिलेचा टॅक्सीचालकांनी केला छळ! दोन अधिकारी निलंबित

मुंबई: मुंबईहून मुन्नारला पर्यटनासाठी गेलेल्या महिलेचा टॅक्सीचालकांनी छळ केल्याची घटना समोर येत आहे. संबंधित

मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना २६ जानेवारीपर्यंत लागू करण्याच्या दृष्टीने आराखडा तयार करा

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या सूचना मुंबई  : मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना २६ जानेवारी २०२६

भारतातील अस्वच्छ शहरांमध्ये मुंबईचा समावेश, दिल्लीलाही टाकले मागे

मुंबई: स्वच्छता सर्वेक्षण २०२४-२५ च्या अहवालात स्वच्छतेच्या आधारावर भारतातील शहरांचे क्रमांक जाहीर करण्यात