Mumbai University Exams: मुंबई विद्यापीठाच्या परीक्षांच्या तारखेत बदल; आता 'या' तारखांना होणार परीक्षा

मुंबई : राज्यात सध्या सर्वत्र जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्या निर्णयानुसार फेब्रुवारीच्या ९ आणि १० तारखेला होणाऱ्या परीक्षा आता पुढे ढकलण्यात आल्या आहेत. विद्यापीठातर्फे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आलं असून त्यानुसार आता ९ आणि १० तारखेला होणाऱ्या परीक्षा फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात घेण्यात येणार आहेत.


जिल्हा परिषदेच्या निवडणुका आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे विद्यापीठाने हा निर्णय घेतला आहे.


परीक्षेच्या स्वरूपात कुठलाही बदल नाही


मुंबई विद्यापीठाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, जे पेपर ९ आणि १० तारखेला होणार होते ते आता २४ आणि २५ फेब्रुवारी रोजी घेण्यात येतील.परीक्षेची तारीख जरी बदलण्यात आली असली तरी परीक्षेच्या स्वरूपात कुठलाही बदल नसणार आहे. त्यामुळे आधीच्या वेळापत्रकात जी वेळ दिली होती, त्या वेळेनुसारच २४ आणि २५ तारखेला या परीक्षा होतील. सर्व संबंधित महाविद्यालयांनी या सुधारित वेळापत्रकाची माहिती तातडीने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावी असे निर्देश देखील विद्यापीठाने दिले आहेत.


म्हणून परीक्षेच्या तारखेत बदल झाला :


खरंतर या निवडणुकांसाठी येत्या ५ फेब्रुवारीला मतदान होऊन ७ तारखेला मतमोजणी करण्यात येणार होती. तसेच त्याच दिवशी निकालही लागला असता. मात्र २८ जानेवारी रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार याचे अपघाती निधन झाले. त्या दिवशी जाहीर करण्यात आलेल्या शासकीय दुखवट्यामुळे सर्व सार्वजनिक कार्यक्रम आणि परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. त्यानंतर निवडणुकांचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला.


Comments
Add Comment

Shocking Video : किळसवाणा प्रकार! दादरमध्ये इडली बनवण्यासाठी चक्क शौचालयाच्या पाण्याचा वापर; व्हिडिओ व्हायरल

मुंबई : कामावर जाण्याची घाई आणि वेळेची कमतरता यामुळे अनेक मुंबईकर चाकरमानी सकाळचा नाश्ता रेल्वे स्टेशनबाहेरील

Passengers Stranded At Mumbai Airport : मुंबईत एअर इंडियाची विमानसेवा कोलमडली; ताटकळलेल्या प्रवाशांचा संताप

मुंबई : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (CSMIA) १८ मे रोजी एअर इंडिया (Air India) आणि एअर इंडिया

Sion Flyover Mumbai : मुंबईकरांसाठी मोठी बातमी! सायन उड्डाणपूल १५ ऑगस्टला खुला होण्याची शक्यता

मुंबई : मुंबईकरांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या शीव (Sion)

Ladki Bahin Yojana : ई-केवायसी होत राहील, पण एकही पात्र लाडकी बहिण ओवाळणीपासून वंचित राहणार नाही

आमचा अजेंडा सत्तेची खुर्ची मिळवणे नाही तर लोकांच्या मनात आपली जागा निर्माण करणे आहे अंधेरीतील लाडक्या बहिणींचा

Ashwini Bhide : इंधन बचतीसाठी महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांचा पुढाकार

मुंबई (सचिन धानजी): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत, पर्यावरण संरक्षण आणि हरित ऊर्जेच्या वापराबाबत

Khar tree collapse : खारमध्ये रिक्षावर झाड कोसळल्याने १४ वर्षीय मुलीचा मृत्यू

मुंबई : खार (पश्चिम) येथील लिंकिंग रोडवर राजकुमार ज्वेलर्सजवळ रिक्षावर झाड कोसळल्याने,१४ वर्षीय मुलीचा मृत्यू