पाणीपट्टी वाढीवर शिक्कामोर्तब

मुंबई  : मुंबई महानगरपालिका निवडणूक पार पडल्यानंतर गेल्या काही वर्षांपासून रखडलेला पाणीपट्टी वाढीचा निर्णय आता प्रत्यक्षात येण्याची दाट शक्यता आहे. २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच पाणीपट्टीत वाढ होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. याबाबतचा प्रस्ताव मुंबई महापालिकेच्या पाणीपुरवठा लेखा विभागाने तयार केला असून तो लवकरच महापालिका आयुक्तांच्या मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे. लोकसभा व त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकांमुळे तसेच महापालिका निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून गेल्या दोन वर्षांपासून पाणीपट्टी वाढीचा निर्णय वारंवार पुढे ढकलण्यात आला होता. दिवाळीनंतर विधानसभा निवडणुकांनंतर पाणीपट्टी वाढ होणार असल्याचे संकेत होते; मात्र महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय स्थगित ठेवण्यात आला. आता निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यासने आणि पुढील चार वर्षांत कोणतीही मोठी निवडणूक नसल्यामुळे पाणीपट्टी वाढीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.


जल अभियंता खात्याचा आस्थापना खर्च, कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते, प्रशासकीय खर्च, प्रचालन व परिरक्षण खर्च, विद्युत खर्च तसेच भातसा व अप्पर वैतरणा धरणांतून उपसा करण्यात येणाऱ्या पाण्याच्या पाणीपट्टीचा सविस्तर आढावा घेऊन ही वाढ सुचवण्यात आली आहे. प्रस्तावित वाढ सरासरी ६ ते ७ टक्क्यांपर्यंत असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे घरगुती पाणीपट्टीत प्रति हजार लिटरमागे सरासरी एक रुपयापर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे, तर व्यावसायिक वापरासाठी तीन ते चार रुपयांपर्यंत वाढ अपेक्षित आहे. याशिवाय एकूण पाणीबिलाच्या ७० टक्के मलनि:सारण आकार वसूल केला जाणार आहे. महापालिकेच्या अर्थसंकल्पानंतर या प्रस्तावाला मंजुरी देऊन पुढील आर्थिक वर्षापासून पाणीपट्टी वाढीची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

Comments
Add Comment

Water Shortage : पाणीटंचाईचे सावट गडद

जलतरण तलाव व बांधकामांच्या जलजोडण्या खंडित ; उद्योगांना २० टक्के कपात मुंबई : नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन

Alternative Transport Hub : बोरिवली स्थानकावरील गर्दी कमी होणार; कांदिवलीचा 'पर्यायी वाहतूक केंद्र' म्हणून विकास

मुंबई: पश्चिम रेल्वेवरील सर्वात वर्दळीचे स्थानक असलेल्या बोरिवली स्थानकावरील प्रवाशांचा ताण कमी करण्यासाठी

Malnourished children : तीव्र कुपोषित बालकांचा घसरला आलेख

प्रशासनाच्या प्रयत्नांना यश पालघर: कुपोषित बालकांचे प्रमाण जास्त असलेल्या जिल्ह्यांमध्ये पालघर जिल्ह्याचे

Corridor : विरार-अलिबाग मार्गिकेचा मार्ग मोकळा; निविदा प्रक्रियेला लवकरच सुरुवात; कोकण विकासाला मिळणार चालना

मुंबई: राज्यातील पायाभूत सुविधांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या 'विरार-अलिबाग बहुउद्देशीय

Vijay Singhal : विजय सिंघल यांची धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या विशेष कार्य अधिकारी पदी नियुक्ती

 राज्यातील आठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या मुंबई : राज्य सरकारने मंगळवारी आठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे

Maharashtra Police : महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारकडून ७३३.२८ कोटी मंजूर

सागरी सुरक्षा, सायबर सेल आणि 'एआय' तंत्रज्ञानावर भर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानले पंतप्रधान व