पाणीपट्टी वाढीवर शिक्कामोर्तब

मुंबई  : मुंबई महानगरपालिका निवडणूक पार पडल्यानंतर गेल्या काही वर्षांपासून रखडलेला पाणीपट्टी वाढीचा निर्णय आता प्रत्यक्षात येण्याची दाट शक्यता आहे. २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच पाणीपट्टीत वाढ होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. याबाबतचा प्रस्ताव मुंबई महापालिकेच्या पाणीपुरवठा लेखा विभागाने तयार केला असून तो लवकरच महापालिका आयुक्तांच्या मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे. लोकसभा व त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकांमुळे तसेच महापालिका निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून गेल्या दोन वर्षांपासून पाणीपट्टी वाढीचा निर्णय वारंवार पुढे ढकलण्यात आला होता. दिवाळीनंतर विधानसभा निवडणुकांनंतर पाणीपट्टी वाढ होणार असल्याचे संकेत होते; मात्र महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय स्थगित ठेवण्यात आला. आता निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यासने आणि पुढील चार वर्षांत कोणतीही मोठी निवडणूक नसल्यामुळे पाणीपट्टी वाढीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.


जल अभियंता खात्याचा आस्थापना खर्च, कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते, प्रशासकीय खर्च, प्रचालन व परिरक्षण खर्च, विद्युत खर्च तसेच भातसा व अप्पर वैतरणा धरणांतून उपसा करण्यात येणाऱ्या पाण्याच्या पाणीपट्टीचा सविस्तर आढावा घेऊन ही वाढ सुचवण्यात आली आहे. प्रस्तावित वाढ सरासरी ६ ते ७ टक्क्यांपर्यंत असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे घरगुती पाणीपट्टीत प्रति हजार लिटरमागे सरासरी एक रुपयापर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे, तर व्यावसायिक वापरासाठी तीन ते चार रुपयांपर्यंत वाढ अपेक्षित आहे. याशिवाय एकूण पाणीबिलाच्या ७० टक्के मलनि:सारण आकार वसूल केला जाणार आहे. महापालिकेच्या अर्थसंकल्पानंतर या प्रस्तावाला मंजुरी देऊन पुढील आर्थिक वर्षापासून पाणीपट्टी वाढीची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

Comments
Add Comment

Breaking News : मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा; सलग दुसऱ्या दिवशी शाळा-महाविद्यालयांना सुटी जाहीर

मुंबई : मुंबई महापालिकेने सलग दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या मंगळवार ७ जुलै २०२६ रोजी सर्व शासकीय, खासगी,

Dadar Tree Collapse : दादरमध्ये भलंमोठं झाड कोसळलं! प्लाझाजवळ पार्क केलेल्या कारचा चक्काचूर; अग्निशमन दलाकडून मदतकार्य सुरू

मुंबई : मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडे कोसळण्याच्या घटनांमध्ये गेल्या

BMC Park : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! महापालिकेची सर्व उद्याने उद्या बंद राहणार; जोरदार वारे आणि पावसाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

मुंबई : मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शहरातील अनेक

Mumbai Rain : मुंबईत मुसळधार पावसाचा तडाखा! २९१ ठिकाणी झाडे कोसळली, २२ ठिकाणी भिंती-घरांचे नुकसान; पुढील २४ तास अतिवृष्टीचा इशारा

मुंबईत सोमवारी (६ जुलै) दिवसभर मुसळधार पावसाने हजेरी लावली असून शहरातील जनजीवनावर त्याचा मोठा परिणाम झाला आहे.

Girish Mahajan : अतिवृष्टीमुळे घडलेल्या सर्व घटनांची चौकशी होणार, नागरिकांनी सतर्क राहावे : मंत्री गिरीष महाजन

मुंबई : राज्यात सुरू असलेल्या मुसळधार आणि अतिवृष्टीमुळे विविध ठिकाणी दरडी कोसळणे, झाडे पडणे आणि इमारतींचे

Mumbai heavy rain : मुंबईत अवघ्या सहा दिवसांत १० जणांचा मृत्यू; पाऊस, झाडे कोसळणे आणि घर दुर्घटनांनी वाढवली चिंता

मुंबई : यंदाच्या मान्सूनमध्ये मुंबईत पावसामुळे घडणाऱ्या दुर्घटनांचे प्रमाण वाढत असून, ३० जून ते ५ जुलै या अवघ्या