नालेसफाईबाबतचा महापालिकेचा दावा फोल

  30

विरार (वार्ताहर) : शहरातील नालेसफाईबाबत वसई-विरार महापालिका प्रशासन उदासीन आहे. पालिका प्रशासन ८०-९० टक्के नालेसफाई पूर्ण झाल्याची खोटी माहिती देऊन जनतेची दिशाभूल करीत असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पालघर जिल्हा उपाध्यक्ष वितेंद्र पाटील यांनी सांगितले. आपल्या सहकाऱ्यांना घेऊन वितेंद्र पाटील हे नालासोपारा पश्चिम येथील फन फियेस्टाजवळील मुख्य नाल्यात उतरले.


तसेच त्यांनी पालिकेच्या आरोग्य निरीक्षकांनासुद्धा नाल्यात उतरण्यास भाग पाडले. येथील नाला वीस फूट रुंद असताना काही विकासकांनी आपल्या व्यक्तिगत फायद्यासाठी भरणी करून अर्ध्यापेक्षा जास्त नाला बुजवला आहे. त्याची रुंदी जेमतेम आठ फूट झाली आहे. त्यामुळे येथील इमारतींमधील दुकाने आणि घरांमध्ये पाणी शिरून सामान्य नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान होते.


स्थानिक माजी नगरसेवक बेफिकीर आहेत. पालिका प्रशासनाशी पत्रव्यवहार, पाठपुरावा करून देखील नालेसफाईच्या समस्येकडे सर्रास दुर्लक्ष केले जाते. पालिकेने नालेसफाई केल्याची चिन्हे दिसत नाहीत. अस्वच्छतेमुळे परिसरात रोगराई पसरून मोठी जीवितहानी होण्याचा धोका आहे. नालेसफाईच्या कामात मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. मनसेकडे नागरिकांच्या वारंवार तक्रारी येत होत्या. त्या अानुषंगाने नाल्यात उतरण्याचा निर्णय घेऊन नालेसफाईबाबतची पाहणी केली. यामुळे महापालिकेचा नालेसफाई केल्याचा दावा फोल ठरला असल्याचे वितेंद्र पाटील यांनी सांगतले.

Comments
Add Comment

भाजपाची मंडळ समिती राहणार ६१ सदस्यांची!

स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मोर्चे बांधणी सुरू विरार : भारतीय जनता पक्षाच्या ५० प्राथमिक सदस्यांची नोंदणी

पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरना विश्रांती कधी?

पाणी टंचाईला जबाबदार कोण; नागरिक संतप्त मोखाडा : तालुक्यातील गाव पाड्यांमध्ये जानेवारी महिन्यापासून सुरू

कोट्यवधींच्या योजनांचे भवितव्य मालमत्ता कराच्या वसुलीवर!

वसई विरार महापालिकेच्या कराची मागणी ७६७ कोटी विरार : पाणीपुरवठा, दिवाबत्ती, शहर स्वच्छ ठेवण्यासाठी करण्यात

लाडक्या बहिणींच्या प्रवासाचा चढता आलेख !

५ दिवसांत १ लाख ३१ हजार महिलांचा प्रवास विरार : वसई-विरार महानगरपालिकेने १ जूनपासून मनपाच्या परिवहन सेवेत

४० हजार पशुधनासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा

जून महिन्यातही पाणीटंचाई कायम पालघर : जिल्ह्यातील मोखाडा, वाडा, जव्हार आणि विक्रमगड तालुक्यातील पाणीटंचाई जून

नुकसानग्रस्तांसाठी मिळाला पाऊणे दोन कोंटीचा निधी

पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्याला यश पालघर : अवकाळी पावसामुळे पालघर जिल्ह्यातील घरे, शेती, फळशेती, मत्स्य