विरार पूर्वेकडील रस्ता रुंदीकरणासाठी तलावाचा बळी

  108

विरार (वार्ताहर) : रस्ता रुंदीकरणासाठी चक्क तलाव आठ ते दहा फूट बुजवून माती भराव करून रस्ता बनवण्याचे काम वसई-विरार महापालिकेने सुरू केले आहे. धक्कादायक बाब म्हणजे नेहमी पर्यावरणाच्या नावाखाली आवाज उठवणाऱ्या हरित पट्ट्यातच हा प्रकार सुरु असताना पर्यावरणप्रेमींकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया येत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विरार पूर्वेकडील नंदाखाल गावात चर्चशेजारील पुरातन तलाव आहे.


रस्ता रुंदीकरण करण्यासाठी एका बाजूने जवळपास ८ ते १० फूट बुजवून त्यावर माती भराव टाकून रस्ता तयार करण्याचा प्रताप महापालिका बांधकाम विभागाने सुरू केल्याचे दिसत आहे. ऐन उन्हाळ्यात लाखो लिटर पाणी उपसा करून हे काम सुरू असून महापालिकेच्या या प्रकारावर परिसरातील पर्यावरणप्रेमी व सजग नागरिक गप्प का?, असा सवाल भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज पाटील यांनी उपस्थित केला आहे.


काही विशिष्ट लोकांना फायदा पोहोचण्यासाठी पुरातन तलाव बुजवण्यात येत असल्याची भावना व रोष व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, वसईच्या पश्चिम पट्ट्यातील बावखले, तलाव आणि विहिरींनी येथील पाण्याचे भूगर्भातील स्त्रोत कायम ठेवण्याचे काम केले आहे. म्हणूनच बावखल बचाव मोहीम या परिसरात राबवण्यात आली आहे.


एखाद्याने बावखल बुजवून घेर बांधण्याचे काम हाती घेतले तरी मोठा विरोध केला जात असल्याचे पहावयास मिळते. असे सामाजिक चळवळीत अग्रेसर असलेल्या पर्यावरणप्रेमींच्या गावातच पुरातन तलाव चक्क एका बाजूने बुजवून रस्ता रुंदीकरणाचे काम सुरु असताना त्यावर कुणीही बोलताना दिसत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते.

Comments
Add Comment

बेरोजगार उमेदवारांसाठी इस्राायल येथे रोजगाराची संधी

युवक-युवतींनी लाभ घेण्याचे आवाहन पालघर : महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अंतिम प्रभागरचना

आठ पंचायत समित्यांचीही अधिसूचना प्रसिद्ध पालघर : पालघर जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील आठ पंचायत समित्यांच्या

वसईत विद्यार्थ्याच्या अंगावर खांब कोसळला; सुदैवाने जीव वाचला, घटना सीसीटीव्हीत कैद

वसई शहरातील निष्काळजीपणाचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वसईमध्ये एका शाळकरी विद्यार्थ्याच्या अंगावर जुना

माजी आयुक्तांसह चौघांना १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी

विरार : वसई-विरार महापालिका क्षेत्रातील बेकायदेशीर बांधकाम प्रकरणात ६ दिवसाच्या 'ईडी' कोठडीत असलेले पालिकेचे

विरार, वसई, नालासोपारामधील अनेक भाग पाण्याखाली, पाऊस अजूनही कायम, रेड अलर्ट जारी

मुसळधार पावसाने वसई, विरार, नालासोपारा परिसराला झोडपून काढलं आहे. गेल्या तीन दिवसापासून मुसळधार पाऊस या भागात

मुंबईत मुसळधार पाऊस, मुंबईसह कोकणात रेड अलर्ट, पुढील 3 – 4 तास महत्वाचे, सखल भागात पाणी साचलं, रेल्वे वाहतुकीवर परिणाम

राज्यात मुसळधार पावसाने अनेक जिल्ह्यांना तडका दिला असून पुढील ३ ते ४ तासांत मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड,