पत्रके वाटणारे मनसैनिक पोलिसांच्या ताब्यात

मुंबई (प्रतिनिधी) : मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्याकडून मशिदींवरील भोंग्यांविरोधातील आंदोलनाचा पाठपुरावा केला जात आहे. राज ठाकरे यांनी गुरुवारी एक पत्रक प्रसिद्ध केले होते. हे पत्रक घरोघरी पोहोचवावे, असे आदेश राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिले होते. मुंबईच्या चेंबूर व चांदिवली परिसरात मनसैनिकांनी घरोघरी जाऊन हे पत्रक वाटायला सुरुवात केली होती. मनसैनिकांकडून चेंबूरमध्ये राज ठाकरे यांच्या पत्रकाचे बॅनर्स लावण्यात आले आहेत. मात्र पोलिसांनी या मनसैनिकांना तातडीने ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी मनसैनिकांना नक्की का ताब्यात घेतले?, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, आता त्यांच्यावर अटकेची कारवाई होणार का, हे पाहावे लागेल.


शुक्रवारी चांदिवली विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांच्या वतीने पत्राची देव साक्षीने पूजा करून घरोघरी वितरण करण्याचा शुभारंभ योजण्यात आला होता. यावेळी घाटकोपर पोलिसांनी मनसे पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले. सकाळी साडेअकराच्या सुमारास चंदिवली विभागाचे विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली हे मंदिरात दर्शन घेऊन बाहेर येत असतानाच त्यांना घाटकोपर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्यासोबत शाखाध्यक्ष राहुल चव्हाण या पदाधिकाऱ्याला यावेळी ताब्यात घेण्यात आले. उशिरापर्यंत हे पदाधिकारी घाटकोपर पोलीस ठाण्यातच होते. पोलिसांनी ज्यांना ताब्यात घेतले नाही, ते हे पत्र त्यांच्या स्थानिक भागात वाटणार असल्याची माहिती भानुशाली यांनी दिली.


पोलिसांच्या या पवित्र्यामुळे राज्याच्या इतर भागांमध्येही मनसैनिक राज ठाकरे यांचे पत्रक वाटायला गेल्यास त्यांच्यावर अशा प्रकारची कारवाई होऊ शकते. त्यामुळे आता मनसे याविरोधात आक्रमक होणार का?, हे पाहावे लागेल. राज ठाकरे यांनी गेल्या महिन्यात पुण्यात सभा घेतली होती. त्या सभेत त्यांनी सांगितलं होतं की, ते भोंगे प्रकरणावर एक पत्र लिहिणार आहेत आणि ते पत्र मनसैनिकांनी संपूर्ण राज्यातील जनतेपर्यंत पोहोचवायचे असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्याच पत्राबाबत त्यांनी गुरुवारी एक ट्वीट करत मनसैनिकांना आदेश दिले होते.

Comments
Add Comment

गुजराती मतदार पोहोचले गावाला

मुंबई : मकरसंक्रांत अर्थात "उत्तरायण" हा गुजरात आणि राजस्थानमधील प्रमुख सण आहे. या काळात जवळपास जागोजागी भव्य

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या