प्रहार    

पत्रके वाटणारे मनसैनिक पोलिसांच्या ताब्यात

  95

पत्रके वाटणारे मनसैनिक पोलिसांच्या ताब्यात

मुंबई (प्रतिनिधी) : मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्याकडून मशिदींवरील भोंग्यांविरोधातील आंदोलनाचा पाठपुरावा केला जात आहे. राज ठाकरे यांनी गुरुवारी एक पत्रक प्रसिद्ध केले होते. हे पत्रक घरोघरी पोहोचवावे, असे आदेश राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिले होते. मुंबईच्या चेंबूर व चांदिवली परिसरात मनसैनिकांनी घरोघरी जाऊन हे पत्रक वाटायला सुरुवात केली होती. मनसैनिकांकडून चेंबूरमध्ये राज ठाकरे यांच्या पत्रकाचे बॅनर्स लावण्यात आले आहेत. मात्र पोलिसांनी या मनसैनिकांना तातडीने ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी मनसैनिकांना नक्की का ताब्यात घेतले?, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, आता त्यांच्यावर अटकेची कारवाई होणार का, हे पाहावे लागेल.


शुक्रवारी चांदिवली विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांच्या वतीने पत्राची देव साक्षीने पूजा करून घरोघरी वितरण करण्याचा शुभारंभ योजण्यात आला होता. यावेळी घाटकोपर पोलिसांनी मनसे पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले. सकाळी साडेअकराच्या सुमारास चंदिवली विभागाचे विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली हे मंदिरात दर्शन घेऊन बाहेर येत असतानाच त्यांना घाटकोपर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्यासोबत शाखाध्यक्ष राहुल चव्हाण या पदाधिकाऱ्याला यावेळी ताब्यात घेण्यात आले. उशिरापर्यंत हे पदाधिकारी घाटकोपर पोलीस ठाण्यातच होते. पोलिसांनी ज्यांना ताब्यात घेतले नाही, ते हे पत्र त्यांच्या स्थानिक भागात वाटणार असल्याची माहिती भानुशाली यांनी दिली.


पोलिसांच्या या पवित्र्यामुळे राज्याच्या इतर भागांमध्येही मनसैनिक राज ठाकरे यांचे पत्रक वाटायला गेल्यास त्यांच्यावर अशा प्रकारची कारवाई होऊ शकते. त्यामुळे आता मनसे याविरोधात आक्रमक होणार का?, हे पाहावे लागेल. राज ठाकरे यांनी गेल्या महिन्यात पुण्यात सभा घेतली होती. त्या सभेत त्यांनी सांगितलं होतं की, ते भोंगे प्रकरणावर एक पत्र लिहिणार आहेत आणि ते पत्र मनसैनिकांनी संपूर्ण राज्यातील जनतेपर्यंत पोहोचवायचे असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्याच पत्राबाबत त्यांनी गुरुवारी एक ट्वीट करत मनसैनिकांना आदेश दिले होते.

Comments
Add Comment

Dadar Kabutar Khana : "कबुतरखाना वाद तापला! जैन समाजाला मराठी एकीकरण समितीची थेट चेतावणी"

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बंद करण्यात आलेल्या दादर कबुतरखान्याच्या (Dadar Kabutar Khana) प्रकरणावरून सध्या

पोकोचा एम ७ प्लस 5जी भारतात १३ ऑगस्टला होणार लाँच

मुंबई : पोकोकडून एम 7 प्लस 5जी भारतात लॉन्च होणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. हा स्मार्टफोन 13 ऑगस्ट रोजी

शिवसेना महिला शाखाप्रमुखाला उबाठाच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण, उपसभापती नीलम गोऱ्हेंकडून घटनेची दखल, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या

मुंबई: वरळीतील शिवसेना शाखा क्र. १९८ च्या महिला शाखाप्रमुख पूजा बरिया यांना काल उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांकडून

मुंबईतील सण उत्सवांसाठी मुंबई पोलीस सज्ज : सणासुदीत कडेकोट बंदोबस्त

मुंबई : मुंबईमध्ये सण, उत्सवांचा हंगाम सुरु झाला आहे . या पार्श्वभूमीवर मुंबईतील पोलीस यंत्रणा बंदोबस्तासाठी आणि

एअर इंडिया एक्सप्रेसची ‘फ्रीडम सेल’ घोषणा

मुंबई : भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त एअर इंडिया एक्सप्रेसने “फ्रीडम सेल”ची घोषणा करत प्रवाशांना

कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन दोन दिवस बंद

कोल्हापूर : कोल्हापुरच्या देवी अंबाबाईचे दर्शन दोन दिवस बंद राहणार आहे. सोमवार आणि मंगळवार हे दोन दिवस मूर्तीवर