पत्रके वाटणारे मनसैनिक पोलिसांच्या ताब्यात

मुंबई (प्रतिनिधी) : मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्याकडून मशिदींवरील भोंग्यांविरोधातील आंदोलनाचा पाठपुरावा केला जात आहे. राज ठाकरे यांनी गुरुवारी एक पत्रक प्रसिद्ध केले होते. हे पत्रक घरोघरी पोहोचवावे, असे आदेश राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिले होते. मुंबईच्या चेंबूर व चांदिवली परिसरात मनसैनिकांनी घरोघरी जाऊन हे पत्रक वाटायला सुरुवात केली होती. मनसैनिकांकडून चेंबूरमध्ये राज ठाकरे यांच्या पत्रकाचे बॅनर्स लावण्यात आले आहेत. मात्र पोलिसांनी या मनसैनिकांना तातडीने ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी मनसैनिकांना नक्की का ताब्यात घेतले?, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, आता त्यांच्यावर अटकेची कारवाई होणार का, हे पाहावे लागेल.


शुक्रवारी चांदिवली विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांच्या वतीने पत्राची देव साक्षीने पूजा करून घरोघरी वितरण करण्याचा शुभारंभ योजण्यात आला होता. यावेळी घाटकोपर पोलिसांनी मनसे पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले. सकाळी साडेअकराच्या सुमारास चंदिवली विभागाचे विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली हे मंदिरात दर्शन घेऊन बाहेर येत असतानाच त्यांना घाटकोपर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्यासोबत शाखाध्यक्ष राहुल चव्हाण या पदाधिकाऱ्याला यावेळी ताब्यात घेण्यात आले. उशिरापर्यंत हे पदाधिकारी घाटकोपर पोलीस ठाण्यातच होते. पोलिसांनी ज्यांना ताब्यात घेतले नाही, ते हे पत्र त्यांच्या स्थानिक भागात वाटणार असल्याची माहिती भानुशाली यांनी दिली.


पोलिसांच्या या पवित्र्यामुळे राज्याच्या इतर भागांमध्येही मनसैनिक राज ठाकरे यांचे पत्रक वाटायला गेल्यास त्यांच्यावर अशा प्रकारची कारवाई होऊ शकते. त्यामुळे आता मनसे याविरोधात आक्रमक होणार का?, हे पाहावे लागेल. राज ठाकरे यांनी गेल्या महिन्यात पुण्यात सभा घेतली होती. त्या सभेत त्यांनी सांगितलं होतं की, ते भोंगे प्रकरणावर एक पत्र लिहिणार आहेत आणि ते पत्र मनसैनिकांनी संपूर्ण राज्यातील जनतेपर्यंत पोहोचवायचे असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्याच पत्राबाबत त्यांनी गुरुवारी एक ट्वीट करत मनसैनिकांना आदेश दिले होते.

Comments
Add Comment

मुंबई झाली पूर्णपणे बॅनर,फलकमुक्त, दहा दिवसांमध्ये ७६५१ जाहिरातींवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  मुंबई महापालिकेची निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यांनतर मुंबईला विद्रुप करणाऱ्या

बिनधास्त करा नववर्षाचे सेलिब्रेशन, मध्य रेल्वे मध्यरात्री सोडणार विशेष लोकल

मुंबई : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईत ठिकठिकाणी रात्री उशिरापर्यंत कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. रात्री

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील