पोलिसांच्या पेट्रोलिंग दुचाकींची दुरवस्था

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई पोलीसांच्या पेट्रोलिंगसाठी आणलेल्या दुचाकी गेल्या तीन ते चार महिन्यापासून एकाच जागेवर उभ्या आहेत. या दुचाकीतील पार्ट चोरीला जात असल्याचा दावा स्थानिकांकडून करण्यात येत आहे. वेळीच निर्णय न घेतल्यास धुळीमध्ये उभ्या असणाऱ्या या दुचाकींना आता चार महिने पावसाचा सामना करावा लागणार आहे. गस्तीसाठी आणलेल्या दुचाकींचे भंगारांत रूपांतर झाल्यावरच प्रशासन हालचाली करणार का?, असा संतप्त सूर आता स्थानिक रहिवाशांकडून आळविला जात आहे.


मुंबईत पोलीस पेट्रोलिंगसाठी आणलेल्या जवळपास ३०० ते ४०० मोटरसायकल मुंबईतील भोईवाडा नायगाव इथल्या मैदानात तीन ते चार महिन्यांपासून धूळ खात उभ्या आहेत. या गाड्याचे वाटप कधी होणार, पेट्रोलिंगसाठी रस्त्यावर कधी वापरल्या जाणार? हे प्रश्न उपस्थित होत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मात्र याकडे दुर्लक्ष केले आहे.


भोईवाडा नायगाव इथले पोलीस हुतात्मा मैदान जे हॉकी मैदान म्हणून ओळखले जाते. या मैदानावरील या मोटरसायकलवर लक्ष ठेवण्यासाठी मुंबई पोलीसही तैनात केले आहेत, जे या मोटरसायकलवर २४ तास लक्ष ठेवतील. सामान्य जनतेला एक मोटरसायकल घ्यायला एक लाख रुपये मोजावे लागतात. पण या मैदानात लाखो रुपयांच्या मोटरसायकल धूळखात उभ्या आहेत. यातून करदात्यांच्या पैशांचा गैरवापर कशा प्रकारे होत आहे, याचे उत्तम उदाहरण दिसून येत आहे. लवकरच पावसाळा सुरू होणार आहे.


त्यातच गेल्या तीन ते चार महिन्यांपासून धूळखात असलेल्या या दुचाकी येणाऱ्या पावसात भिजून खराब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मोटरसायकल खरोखरीच रस्त्यावर पेट्रोलिंगसाठी वापरल्या जाणार आहेत की त्या भंगारजमा होणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Comments
Add Comment

मागासवर्गीय शासकीय वसतिगृहांना महापुरुषांची नावे देण्याचा सामाजिक न्याय विभागाचा निर्णय

मुंबई : सामाजिक न्याय विभागांतर्गत चालविण्यात येणाऱ्या मागासवर्गीय मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहांना

फुलांची होळी उपक्रमातून महापौर रितू तावडे यांनी दिला पर्यावरणपूरक सण साजरे करण्याचा संदेश

मुंबई : होळी व धुळवड/रंगपंचमी हे सण आनंदात साजरे करावेत आणि त्यासोबत पर्यावरणाचे संरक्षण करण्याचे सामाजिक

दोन महिन्यांत राज्यातील सव्वा कोटी नागरिकांची आरोग्य तपासणी

आरोग्य जागर : सिकलसेलपासून कर्करोगापर्यंतच्या मोहिमांना मोठे यश मुंबई : राज्यातील जनतेचे आरोग्य सुदृढ

राज्यातील अकुशल कामगारांच्या थकीत मजुरीचा प्रश्न सुटला

मनरेगा अंतर्गत १ हजार १६८ कोटींचा निधी मंजूर; होळीच्या पार्श्वभूमीवर केंद्राचा श्रमिकांना मोठा दिलासा मुंबई :

जाहिरातीतून एसटी कमविणार २५० कोटी रुपये

मुंबई : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धावणारी ‘लालपरी’ आता केवळ प्रवाशांनाच नव्हे, तर महसूलवाढीलाही वेग देणार

दुबईत अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून विशेष विमानाची व्यवस्था

मुंबई : इराण-इस्रायल-अमेरिका यांच्यातील तीव्र संघर्षामुळे मध्य पूर्वेतील हवाई क्षेत्र बंद पडल्याने दुबईसह