पोलिसांच्या पेट्रोलिंग दुचाकींची दुरवस्था

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई पोलीसांच्या पेट्रोलिंगसाठी आणलेल्या दुचाकी गेल्या तीन ते चार महिन्यापासून एकाच जागेवर उभ्या आहेत. या दुचाकीतील पार्ट चोरीला जात असल्याचा दावा स्थानिकांकडून करण्यात येत आहे. वेळीच निर्णय न घेतल्यास धुळीमध्ये उभ्या असणाऱ्या या दुचाकींना आता चार महिने पावसाचा सामना करावा लागणार आहे. गस्तीसाठी आणलेल्या दुचाकींचे भंगारांत रूपांतर झाल्यावरच प्रशासन हालचाली करणार का?, असा संतप्त सूर आता स्थानिक रहिवाशांकडून आळविला जात आहे.


मुंबईत पोलीस पेट्रोलिंगसाठी आणलेल्या जवळपास ३०० ते ४०० मोटरसायकल मुंबईतील भोईवाडा नायगाव इथल्या मैदानात तीन ते चार महिन्यांपासून धूळ खात उभ्या आहेत. या गाड्याचे वाटप कधी होणार, पेट्रोलिंगसाठी रस्त्यावर कधी वापरल्या जाणार? हे प्रश्न उपस्थित होत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मात्र याकडे दुर्लक्ष केले आहे.


भोईवाडा नायगाव इथले पोलीस हुतात्मा मैदान जे हॉकी मैदान म्हणून ओळखले जाते. या मैदानावरील या मोटरसायकलवर लक्ष ठेवण्यासाठी मुंबई पोलीसही तैनात केले आहेत, जे या मोटरसायकलवर २४ तास लक्ष ठेवतील. सामान्य जनतेला एक मोटरसायकल घ्यायला एक लाख रुपये मोजावे लागतात. पण या मैदानात लाखो रुपयांच्या मोटरसायकल धूळखात उभ्या आहेत. यातून करदात्यांच्या पैशांचा गैरवापर कशा प्रकारे होत आहे, याचे उत्तम उदाहरण दिसून येत आहे. लवकरच पावसाळा सुरू होणार आहे.


त्यातच गेल्या तीन ते चार महिन्यांपासून धूळखात असलेल्या या दुचाकी येणाऱ्या पावसात भिजून खराब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मोटरसायकल खरोखरीच रस्त्यावर पेट्रोलिंगसाठी वापरल्या जाणार आहेत की त्या भंगारजमा होणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Comments
Add Comment

अरबी शिकवणाऱ्या व्यक्तीवर अल्पवयीन विद्यार्थिनींशी गैरवर्तन केल्याचा आरोप; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

मुंबई: अल्पवयीन मुलींशी गैरवर्तन केल्याच्या गंभीर आरोपाखाली मुंबई पोलिसांनी शिवडी येथील एका धार्मिक संस्थेतून

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर सोयी-सुविधांची कमतरता नको!

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांचे निर्देश मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६९ वा

डिसेंबर २०२८ नंतर सिग्नल फ्री आणि वाहतूक कोंडीशिवाय होणार प्रवास, महापालिकेच्या या प्रकल्पाची वाढतेय गती

मुंबई (खास प्रतिनिधी) : दादासाहेब फाळके चित्रनगरी ते मुलुंडदरम्‍यान नवीन जोडमार्ग स्‍थापित होत आहे. पश्चिमेकडील

मुंबईत चार नवीन कबूतर खाने, पण बाकीचे बंद म्हणजे बंदच....

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईतील विद्यमान कबुतरखाने उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये बंद करण्यात आले आहेत. दरम्यान,

पवईतील एन्काऊंटरवर एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा काय म्हणाले ?

मुंबई : पवईतील स्टुडिओत घडलेल्या ओलीस नाट्य आणि त्यानंतर झालेले आरोपी रोहित आर्य याच्या एन्काऊंटरवर अनेक प्रश्न

'वाचाळवीर' राऊतांना सक्तीची विश्रांती? महापालिका निवडणुकीपूर्वी ‘राजकीय ब्रेक’

प्रकृतीच्या कारणामुळे संजय राऊत दोन महिने सार्वजनिक जीवनापासून दूर राहणार; राजकीय वर्तुळात अनेक