फुलांची होळी उपक्रमातून महापौर रितू तावडे यांनी दिला पर्यावरणपूरक सण साजरे करण्याचा संदेश

मुंबई : होळी व धुळवड/रंगपंचमी हे सण आनंदात साजरे करावेत आणि त्यासोबत पर्यावरणाचे संरक्षण करण्याचे सामाजिक कर्तव्यही सर्वांनी पार पाडावे, त्यासाठी मुंबईची महापौर या नात्याने स्वतः कृतीतून संदेश द्यावा, या उद्देशाने ‘फुलांची होळी’ हा पर्यावरणपूरक उपक्रम आयोजित केला, असे उद्गार मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी काढले. या उपक्रमात वापरात आलेल्या फुलांचा सेंद्रिय खत निर्मितीसाठी उपयोग करण्यात येणार असून हरित मुंबईसाठी नागरिकांनी हातभार लावावा, असे आवाहन देखील महापौरांनी या निमित्ताने केले आहे.


मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या पुढाकाराने घाटकोपर (पूर्व) येथे राजावाडी उद्यानात ‘फुलांची होळी’ हा पर्यावरणपूरक उपक्रम आज (दिनांक ३ मार्च २०२६) सकाळी आयोजित करण्यात आला. महापौर श्रीमती रितू तावडे, आमदार पराग शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि स्थानिक नागरिकांच्या उत्साहात हा उपक्रम पार पडला.


रासायनिक रंगांचा वापर टाळून, पाण्याचा अपव्यय न करता, फुलांच्या पाकळ्यांनी धूलिवंदन सण साजरा करणे, पर्यायाने नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत जनजागृती करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. या उपक्रमानंतर संपूर्ण परिसराची स्वच्छता करण्यात आली. फुलांची होळी उपक्रमात वापरलेली फुले संकलित करण्यात आली. ही फुले सेंद्रिय खतनिर्मितीसाठी वापरण्यात येणार आहेत. यामुळे फुलांचे रूपांतर उपयुक्त खतामध्ये होऊन स्वच्छ व हरित मुंबईच्या संकल्पनेला हातभार लागणार आहे.


यावेळी महापौर रितू तावडे म्हणाल्या की, होलिका दहन व धुळवड/रंगपंचमी हे सण जबाबदारीने साजरे करणे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. झाडांची तोड न करता, कोरड्या लाकडाचा वापर करून पारंपरिक पद्धतीने होलिका दहन करावे, तसेच प्लास्टिक, टायर, रबर व रसायनयुक्त रंगवलेले साहित्य जाळू नये. धुळवडीच्या दिवशी पाण्याचा अपव्यय टाळावा, पर्यावरणपूरक नैसर्गिक व सेंद्रिय रंगांचा वापर करावा, असे आवाहन महानगरपालिकेने केले होते. त्याही पुढे जाऊन फुलांची होळी यासारखा पर्यावरणपूरक आणि आपल्या संस्कृतीचा परिचय देणारा उपक्रम मी स्वतः मुंबईची महापौर या नात्याने राबवला. त्यातून एक कृतिशील संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.


आमदार पराग शाह म्हणाले की, मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी फुलांची होळी उपक्रम राबवून पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाचा संदेश स्वतःपासून दिला आहे. सर्व नागरिकांनी सण साजरे करताना पर्यावरणाचे भान देखील जपावे. ध्वनी प्रदूषण टाळावे, रुग्णालये, निवासी व संवेदनशील भागात आवाजाची पातळी मर्यादेत ठेवावी. ‘फुलांची होळी’ हा उपक्रम त्याचे उत्तम उदाहरण असल्याचे ते म्हणाले. फक्त एवढ्यावरच न थांबता, या फुलांचे सेंद्रिय खत तयार करून वापरात येणार असल्याने स्वच्छ, हरित व निरोगी मुंबईसाठी हातभार लागणार आहे. अशा उपक्रमांचे अनुकरण करून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन देखील शाह यांनी केले.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : परदेश दौरे रद्द करा, मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्याही कमी करा!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश; सामान्य प्रशासन विभागाकडून मंत्र्यांच्या लवाजम्याचा आढावा घेण्यास

Reserve Bank of India (RBI) : रिझर्व्ह बँकेकडून सर्वोदय सहकारी बँकेचा परवाना रद्द

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) (RBI) मुंबईतील 'सर्वोदय सहकारी बँके'चा परवाना अखेर रद्द केला आहे. बँकेकडे

Amol Mitkari : १४ मेपासून नव्या राजकीय प्रवासाला सुरुवात!

अमोल मिटकरींनी आमदारकीच्या शेवटच्या दिवशी सुनेत्रा पवारांची घेतली भेट मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे

BMC News : माहुलमधील प्रकल्पबाधितांच्या वसाहतीमध्ये पायाभूत सुविधा तातडीने पुरवा ; स्थायी समिती अध्यक्षांचे प्रशासनाला निर्देश

मुंबई: मुंबईतील विविध प्रकल्पांमध्ये बाधित होणाऱ्या कुटुंबांचे माहुल येथील एसआरए प्रकल्पांतर्गत बांधण्यात

BMC : पहाटेच पोहोचल्या महापालिका आयुक्त सफाई कामगारांच्या भेटीला...

मुंबई :  असे म्हटले जाते की जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मी नांदते आणि जिथे स्वच्छता असते तिथे आरोग्य निरोगी

BMC News : महापालिका आयुक्त जेव्हा पहाटेच कांजूर मार्ग डम्पिंग ग्राउंडवर पोहोचतात, तेव्हा...

मुंबई: मुंबईकर जेव्हा गाढ झोपेत किंवा कुणी लवकर उठून मॉर्निंग वॉकला फिरत असतात,त्यावेळेस मुंबई महापालिकेच्या