फुलांची होळी उपक्रमातून महापौर रितू तावडे यांनी दिला पर्यावरणपूरक सण साजरे करण्याचा संदेश

मुंबई : होळी व धुळवड/रंगपंचमी हे सण आनंदात साजरे करावेत आणि त्यासोबत पर्यावरणाचे संरक्षण करण्याचे सामाजिक कर्तव्यही सर्वांनी पार पाडावे, त्यासाठी मुंबईची महापौर या नात्याने स्वतः कृतीतून संदेश द्यावा, या उद्देशाने ‘फुलांची होळी’ हा पर्यावरणपूरक उपक्रम आयोजित केला, असे उद्गार मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी काढले. या उपक्रमात वापरात आलेल्या फुलांचा सेंद्रिय खत निर्मितीसाठी उपयोग करण्यात येणार असून हरित मुंबईसाठी नागरिकांनी हातभार लावावा, असे आवाहन देखील महापौरांनी या निमित्ताने केले आहे.


मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या पुढाकाराने घाटकोपर (पूर्व) येथे राजावाडी उद्यानात ‘फुलांची होळी’ हा पर्यावरणपूरक उपक्रम आज (दिनांक ३ मार्च २०२६) सकाळी आयोजित करण्यात आला. महापौर श्रीमती रितू तावडे, आमदार पराग शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि स्थानिक नागरिकांच्या उत्साहात हा उपक्रम पार पडला.


रासायनिक रंगांचा वापर टाळून, पाण्याचा अपव्यय न करता, फुलांच्या पाकळ्यांनी धूलिवंदन सण साजरा करणे, पर्यायाने नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत जनजागृती करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. या उपक्रमानंतर संपूर्ण परिसराची स्वच्छता करण्यात आली. फुलांची होळी उपक्रमात वापरलेली फुले संकलित करण्यात आली. ही फुले सेंद्रिय खतनिर्मितीसाठी वापरण्यात येणार आहेत. यामुळे फुलांचे रूपांतर उपयुक्त खतामध्ये होऊन स्वच्छ व हरित मुंबईच्या संकल्पनेला हातभार लागणार आहे.


यावेळी महापौर रितू तावडे म्हणाल्या की, होलिका दहन व धुळवड/रंगपंचमी हे सण जबाबदारीने साजरे करणे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. झाडांची तोड न करता, कोरड्या लाकडाचा वापर करून पारंपरिक पद्धतीने होलिका दहन करावे, तसेच प्लास्टिक, टायर, रबर व रसायनयुक्त रंगवलेले साहित्य जाळू नये. धुळवडीच्या दिवशी पाण्याचा अपव्यय टाळावा, पर्यावरणपूरक नैसर्गिक व सेंद्रिय रंगांचा वापर करावा, असे आवाहन महानगरपालिकेने केले होते. त्याही पुढे जाऊन फुलांची होळी यासारखा पर्यावरणपूरक आणि आपल्या संस्कृतीचा परिचय देणारा उपक्रम मी स्वतः मुंबईची महापौर या नात्याने राबवला. त्यातून एक कृतिशील संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.


आमदार पराग शाह म्हणाले की, मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी फुलांची होळी उपक्रम राबवून पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाचा संदेश स्वतःपासून दिला आहे. सर्व नागरिकांनी सण साजरे करताना पर्यावरणाचे भान देखील जपावे. ध्वनी प्रदूषण टाळावे, रुग्णालये, निवासी व संवेदनशील भागात आवाजाची पातळी मर्यादेत ठेवावी. ‘फुलांची होळी’ हा उपक्रम त्याचे उत्तम उदाहरण असल्याचे ते म्हणाले. फक्त एवढ्यावरच न थांबता, या फुलांचे सेंद्रिय खत तयार करून वापरात येणार असल्याने स्वच्छ, हरित व निरोगी मुंबईसाठी हातभार लागणार आहे. अशा उपक्रमांचे अनुकरण करून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन देखील शाह यांनी केले.

Comments
Add Comment

Mathadi Workers : माथाडी, हमाल आणि श्रमजीवी कामगार कायद्यांमध्ये बदल होणार

मुंबई : राज्यातील माथाडी, हमाल आणि इतर श्रमजीवी कामगारांच्या सुरक्षा व कल्याणासाठी लागू असलेल्या विविध कामगार

Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर आक्षेप

स्वपक्षातील वरिष्ठ नेत्याने पाठवली नोटीस; निवडणूक पुन्हा घेण्याची मागणी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमधील

Goregaon Mulund Link Road : गोरेगाव-मुलुंड लिंक रोडचा पहिला उड्डाणपूल सप्टेंबरमध्ये वाहतुकीसाठी खुला होणार

मुंबई : मुंबईतील (Mumbai) वाहतूक कोंडी (Traffic) कमी करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या गोरेगाव-मुलुंड लिंक रोड (Goregaon Mulund Link Road)

Mumbai news : धक्कादायक! अंधेरीत तलावात पोहताना १० वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू; शोधमोहीमेदरम्यान सापडला मृतदेह

तलावात मित्रांसोबत पोहायला गेला अन् परतलाच नाही; १० वर्षाच्या मुलाचा बुडून दुर्दैवी मृत्यू मुंबई : मुंबईतील (Mumbai)

Nitesh Rane : आमिर खान लव्ह जिहादचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

मंत्री नितेश राणेंचा घणाघात; हिंदू समाजाला सावधान राहण्याचे आवाहन मुंबई : बॉलिवूड अभिनेता आमिर खान(Amir Khan) याच्या

Mumbai News : धक्कादायक! अंधेरीच्या लॉजमध्ये तरुणीचा संशयास्पद मृत्यू, पोलीस तपास सुरु

मुंबई : मुंबई (Mumbai) येथील अंधेरी पूर्व परिसरात एका लॉजमध्ये तरुणीचा संशयास्पद मृत्यू (Death)