फुलांची होळी उपक्रमातून महापौर रितू तावडे यांनी दिला पर्यावरणपूरक सण साजरे करण्याचा संदेश

मुंबई : होळी व धुळवड/रंगपंचमी हे सण आनंदात साजरे करावेत आणि त्यासोबत पर्यावरणाचे संरक्षण करण्याचे सामाजिक कर्तव्यही सर्वांनी पार पाडावे, त्यासाठी मुंबईची महापौर या नात्याने स्वतः कृतीतून संदेश द्यावा, या उद्देशाने ‘फुलांची होळी’ हा पर्यावरणपूरक उपक्रम आयोजित केला, असे उद्गार मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी काढले. या उपक्रमात वापरात आलेल्या फुलांचा सेंद्रिय खत निर्मितीसाठी उपयोग करण्यात येणार असून हरित मुंबईसाठी नागरिकांनी हातभार लावावा, असे आवाहन देखील महापौरांनी या निमित्ताने केले आहे.


मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या पुढाकाराने घाटकोपर (पूर्व) येथे राजावाडी उद्यानात ‘फुलांची होळी’ हा पर्यावरणपूरक उपक्रम आज (दिनांक ३ मार्च २०२६) सकाळी आयोजित करण्यात आला. महापौर श्रीमती रितू तावडे, आमदार पराग शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि स्थानिक नागरिकांच्या उत्साहात हा उपक्रम पार पडला.


रासायनिक रंगांचा वापर टाळून, पाण्याचा अपव्यय न करता, फुलांच्या पाकळ्यांनी धूलिवंदन सण साजरा करणे, पर्यायाने नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत जनजागृती करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. या उपक्रमानंतर संपूर्ण परिसराची स्वच्छता करण्यात आली. फुलांची होळी उपक्रमात वापरलेली फुले संकलित करण्यात आली. ही फुले सेंद्रिय खतनिर्मितीसाठी वापरण्यात येणार आहेत. यामुळे फुलांचे रूपांतर उपयुक्त खतामध्ये होऊन स्वच्छ व हरित मुंबईच्या संकल्पनेला हातभार लागणार आहे.


यावेळी महापौर रितू तावडे म्हणाल्या की, होलिका दहन व धुळवड/रंगपंचमी हे सण जबाबदारीने साजरे करणे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. झाडांची तोड न करता, कोरड्या लाकडाचा वापर करून पारंपरिक पद्धतीने होलिका दहन करावे, तसेच प्लास्टिक, टायर, रबर व रसायनयुक्त रंगवलेले साहित्य जाळू नये. धुळवडीच्या दिवशी पाण्याचा अपव्यय टाळावा, पर्यावरणपूरक नैसर्गिक व सेंद्रिय रंगांचा वापर करावा, असे आवाहन महानगरपालिकेने केले होते. त्याही पुढे जाऊन फुलांची होळी यासारखा पर्यावरणपूरक आणि आपल्या संस्कृतीचा परिचय देणारा उपक्रम मी स्वतः मुंबईची महापौर या नात्याने राबवला. त्यातून एक कृतिशील संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.


आमदार पराग शाह म्हणाले की, मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी फुलांची होळी उपक्रम राबवून पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाचा संदेश स्वतःपासून दिला आहे. सर्व नागरिकांनी सण साजरे करताना पर्यावरणाचे भान देखील जपावे. ध्वनी प्रदूषण टाळावे, रुग्णालये, निवासी व संवेदनशील भागात आवाजाची पातळी मर्यादेत ठेवावी. ‘फुलांची होळी’ हा उपक्रम त्याचे उत्तम उदाहरण असल्याचे ते म्हणाले. फक्त एवढ्यावरच न थांबता, या फुलांचे सेंद्रिय खत तयार करून वापरात येणार असल्याने स्वच्छ, हरित व निरोगी मुंबईसाठी हातभार लागणार आहे. अशा उपक्रमांचे अनुकरण करून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन देखील शाह यांनी केले.

Comments
Add Comment

Indian Railway : भारतीय रेल्वेचा नवा विक्रम; पहिल्या डबल-स्टॅक लाँग-हॉल कंटेनर ट्रेनची यशस्वी धाव

मुंबई : भारतीय रेल्वेने मालवाहतुकीच्या क्षेत्रात महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट (JNPT) येथून

CM Devendra Fadnavis : मुंबईत ‘भुलेश्वरचा राजा’च्या आगमन मिरवणुकीत घडलेल्या दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री फडणवीसांनी केला शोक व्यक्त

मुंबई : मुंबईतील भुलेश्वर परिसरात ‘भुलेश्वरचा राजा’ गणेशमूर्तीच्या आगमन मिरवणुकीदरम्यान शनिवारी (दि. २२ ऑगस्ट)

Mumbai-Ahmedabad Bullet Train : भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनसाठी १६ चालकांची नियुक्ती; जपानमध्ये वर्षभर विशेष प्रशिक्षण

मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या संचालनासाठी मनुष्यबळाची तयारी वेगाने सुरू झाली आहे. नॅशनल

Eknath Shinde : महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेत परिवर्तनासाठी ‘मिशन मोड’वर काम करा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे शिक्षण विभागाला निर्देश

मुंबई : महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेत प्रत्यक्ष आणि गुणवत्तापूर्ण बदल घडवून आणण्यासाठी शिक्षण विभागाने

BMC Students ISRO Visit : मुंबई महापालिका शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांना ISRO, सिंगापूर किंवा जपानचा अभ्यास दौरा; आमदार अमित साटम यांची मागणी

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि

Mulund Dumping Ground : मुलुंड डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याचे ढिग तसेच!

- पुन्हा कंपनीला वाढवून दिला एप्रिल २०२७ पर्यंत कालावधी मुंबई (सचिन धानजी) मुलुंड डंपिंग ग्राऊंडवरील कचरा हटवून