मुंबईत पुन्हा कोरोना!

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईत गेल्या काही दिवसांमध्ये कोविड विषाणू बाधितांची संख्या वाढली आहे. वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलेला संभाव्य चौथ्या लाटेचा इशारा लक्षात घेता आणि पावसाळा सुरू होणार असल्याने जलजन्य आजारांची शक्यता पाहता आरोग्य यंत्रणेसह विभाग कार्यालये व सर्व संबंधित खात्यांनी सुसज्ज राहावे. त्याचप्रमाणे कोविड संसर्ग वेळीच रोखण्यासाठी बाधितांचा शोध घेता यावा म्हणून चाचण्यांची संख्या वाढवावी, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी दिले आहेत.


मुंबईत गेल्या आठवडाभरात कोरोना रुग्ण संख्या वेगाने वाढ झाली आहे. पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी शुक्रवारी प्रशासनाची बैठक घेतली. यावेळी महाराष्ट्र कोविड टास्क फोर्स प्रमुख डॉ. संजय ओक यांच्यासह महानगरपालिकेचे सर्व अतिरिक्त आयुक्त, सहआयुक्त, उपआयुक्त, सहायक आयुक्त तसेच विविध रुग्णालयांचे अधिष्ठाता, कार्यकारी आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, इतर सर्व संबंधित खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.


दरम्यान महानगरपालिका आयुक्त डॉ. चहल याप्रसंगी म्हणाले की, कानपूर आय. आय. टी. तज्ज्ञांनी जुलै २०२२ मध्ये कोविडची चौथी लाट येण्याची शक्यता वर्तवली असून त्यांचा इशारा गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. कारण याआधीच्या कोविड लाटांबाबत त्यांनी वर्तवलेले अंदाज देखील खरे ठरले होते. कोविड विषाणूच्या बाधित रुग्णांची संख्या अलीकडे वाढली आहे, हे लक्षात घेतले तर चौथ्या लाटेची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कोविड प्रतिबंधात्मक बाबींवर पुन्हा एकदा विशेषत्वाने लक्ष देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.


पुढील दोन आठवडे महत्वाचे- डॉ संजय ओक


पुढील एक दोन आठवडे कोविड परिस्थितीच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याचे महाराष्ट्र टास्क प्रमुख डॉ संजय ओक यांनी सांगितले. कोरोनाबाधित रुग्ण शोधून काढणे हे अत्यंत आवश्यक असून त्यासाठी चाचण्यांची संख्या वाढवली पाहिजे. अशी सूचना ओक यांनी केली.

Comments
Add Comment

जे निर्माण करू शकत नाहीत, तेच तोडफोडीवर बोलणार; नमो केंद्रावरून राजकीय वादंग!

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक नवं वादळ उठलंय. प्रश्न हा आहे की, फक्त तोडण्याची भाषा करणाऱ्यांना

‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्ष पूर्ण; मंत्रालयात निनादणार समूहगान

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 'सार्ध शताब्दी' महोत्सवास उद्या सुरुवात मुंबई : देशप्रेमाचे

न्यायालये केवळ इमारती नसून लोकशाही मूल्यांचे प्रतीक – सरन्यायाधीश भूषण गवई

वांद्रे पूर्व येथे उच्च न्यायालय संकुलाची पायाभरणी व कोनशीलेचे अनावरण मुंबई : न्यायालयीन इमारती या केवळ भव्य

सीएसएमटीवर मोटरमन, कर्मचाऱ्यांचे अचानक आंदोलन; मुंबईकरांचे हाल! ऐन गर्दीच्या वेळेत लोकल सेवा ठप्प

४ महिन्यांपूर्वीच्या अपघातावरून अभियंत्यांवर गुन्हा; रेल्वे कर्मचाऱ्यांनी काम थांबवत व्यक्त केला संताप मुंबई

कुलाबा कॉजवे परिसरातील ६७ अनधिकृत फेरीवाल्यांना हटवले, महानगरपालिकेच्या ए विभागाकडून कारवाई

मुंबई (खास प्रतिनिधी): कुलाबा कॉजवे परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात त्वरीत कारवाई करावी अन्यथा आंदोलन

संजय गांधी उद्यानातून जाणाऱ्या जुळ्या बोगद्याच्या प्रवेशद्वारावर घडणार वाघाचे दर्शन

मुंबई (खास प्रतिनिधी): गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पांतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या जमिनीखालून