दादर-धारावी नाल्यावरील बंदिस्त नवीन पूल तयार

  140

मुंबई (प्रतिनिधी) : दादर-धारावी नाल्याच्या बंदिस्त प्रवाहावर असलेला आणि माहीम उपनगरीय रेल्वे स्थानक व धारावी या परिसरांना जोडणारा पूल मोडकळीस आल्याने तो नव्याने बांधण्यात येणार आहे. तत्पूर्वी या परिसरातील वाहतूक सुरळीत रहावी म्हणून या ठिकाणी जुना पूल तोडून त्यानंतर तब्बल ३० टन वजनाचा तात्पुरता पूल उभारण्याचे विक्रमी काम अवघ्या १७ दिवसांमध्ये महानगरपालिकेच्या अभियंत्यांनी यशस्वीपणे पूर्ण केले आहे. हा तात्पुरता पूल उद्या बुधवार, दिनांक १ जून २०२२ पासून वजनाने हलक्या वाहनांसाठी खुला केला जाणार आहे.


दादर-धारावी नाल्यावर बंदिस्त प्रवाह मार्गावर (कल्व्हर्ट) २० मीटर लांब आणि १६ मीटर रुंदीचा पूल मोडकळीस आल्याने त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. सदर पूल हा माहीम स्थानक आणि धारावी या दोन्ही परिसरांना जोडणारा व अत्यंत वर्दळीचा आहे. पूल बंद करण्यात आल्यानंतर स्थानिक रहिवाशांसह स्थानिक व्यावसायिकांना देखील वाहतुकीच्या अडचणी होऊ लागल्या. स्थानिक आमदार तथा राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांनी महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन तातडीने आणि किमान तात्पुरता दिलासा देणारी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.


तसेच अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी देखील उपायुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले व सर्व संबंधित अधिकाऱ्यांच्या सोबतीने दिनांक ११ मे २०२२ रोजी या ठिकाणी पाहणी केली. मोडकळीस आलेला सद्यस्थितीतील पूल तोडून त्या ठिकाणी तातडीने तात्पुरता पूल बांधावा आणि पावसाळा संपल्यानंतर नियमित पद्धतीने पूल बांधावा, असे निर्देश वेलरासू यांनी दिले.


हा परिसर अत्यंत वर्दळीचा व घनदाट वस्तीचा असल्याने जुना पूल तोडून तात्पुरता पूल बांधणे जिकरीचे होते. हा तात्पुरता पूल १ जूनपासून वाहतुकीसाठी खुला होणार आहे. त्यामुळे रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. या ठिकाणी कायमस्वरूपी पूल उभारण्याचे काम पावसाळा संपल्यानंतर सुरू होईल.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.