डिजिटल सातबारा शेतकऱ्यांसाठी ठरतोय डोकेदुखी

संदीप जाधव


बोईसर : जिल्ह्यात सध्या खरीप हंगामासाठी पीक कर्ज काढण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी शेतकरी तयारीला लागला आहे. त्यासाठी महत्त्वाचा दाखला हा सातबारा उतारा आहे. मात्र गेल्या महिनाभरापासून डिजिटल सातबाराची सर्वर डाउन तसेच नेटवर्कचा खोळंबा असल्याने शेतकऱ्यांना महा-ई-सेवा केंद्र, सेतू कार्यालयात तासंतास थांबावे लागत आहे.


कधी कधी डिजिटल सातबारा निघत नसल्याने शेतकऱ्यांना खाली हात परतावे लागत आहे. परिणामी उतारा भावी कामे खोळंबली असून शेतकरी हैराण झाला आहे. डिजिटल इंडियाच्या पार्श्वभूमीवर राज्यात महसूल खात्याने सर्व गावांमधील शेतकऱ्यांच्या जमिनीचे सातबारा उतारे ऑनलाइन उपलब्ध करून दिले, मात्र सर्वर डाऊन असल्यामुळे शेतकऱ्यांना दाखला काढता येणे अवघड बनले आहे.


शेतकऱ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. शासनाच्या शेतकऱ्यांना इतर कागदपत्रांसह सातबाराची ही मागणी केली जाते. तसेच सध्या पीक कर्ज काढण्यासाठी लगबग सुरू असल्याने शेतकऱ्यांना सातबारा आवश्यक आहे. सर्वर डाऊन होत असल्याने शेतकरी डिजिटल सातबारा मिळणे अवघड झाले असून सेतू केंद्र व महा ई-सेवा केंद्रांमध्ये शेतकऱ्यांच्या चकरा वाढल्या आहेत.


ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी तलाठी कार्यालय, तहसील कार्यालय त्या भागातील महा-ई-सेवा केंद्र सेतू कार्यालय आदी ठिकाणी शेतकऱ्यांना डिजिटल सातबारा मिळतो. दरम्यान, महा-ई-सेवा केंद्र व सेतू कार्यालयात डिजिटल सातबारा मिळणे कठीण झाले आहे. पर्यायी शेतकरी तलाठ्यांशी संपर्क करून सातबारा काढत आहेत.

Comments
Add Comment

एकाच वेळी संसदेत मांडली तीन विधेयक

खासदार डॉ. हेमंत सवरा यांना यश पालघर : महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाशी निगडित तीन महत्त्वपूर्ण विधयके

न्याय मागणाऱ्या महिलेवर पोलिसाकडूनच अत्याचार

आरोपी हवालदारास अटक डहाणू : आपल्या पतीची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात गेलेल्या महिलेशी जवळीक साधून तिच्यावर

नगर परिषदेच्या निकालापूर्वीच महापालिकेसाठी मनोमिलन

वसई-विरारमध्ये महायुती एकत्र लढण्याचे संकेत गणेश पाटील विरार : पालघर जिल्ह्यात नुकतेच पार पडलेल्या नगर परिषद

ग्रामीण भागातही ३० हजार दुबार मतदार

जिल्हा परिषदेच्या ५७ गटातील मतदारांचा समावेश पालघर : मतदार याद्यांमधील दुबार नावावरून सर्वत्र राजकीय वातावरण

गटशिक्षण अधिकाऱ्यांसह तीन अधिकारी निलंबित !

जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांचा आदेश पालघर : शाळेत यायला उशीर झाल्याने विद्यार्थ्यांना उठाबशा

वसई - विरारमध्ये ८० हजार दुबार मतदार?

मतदारयादीत सुधारणा करण्याची बविआची मागणी वसई : वसई - विरार महानगरपालिकेने प्रसिद्ध केलेल्या मतदार याद्यांमध्ये