डिजिटल सातबारा शेतकऱ्यांसाठी ठरतोय डोकेदुखी

संदीप जाधव


बोईसर : जिल्ह्यात सध्या खरीप हंगामासाठी पीक कर्ज काढण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी शेतकरी तयारीला लागला आहे. त्यासाठी महत्त्वाचा दाखला हा सातबारा उतारा आहे. मात्र गेल्या महिनाभरापासून डिजिटल सातबाराची सर्वर डाउन तसेच नेटवर्कचा खोळंबा असल्याने शेतकऱ्यांना महा-ई-सेवा केंद्र, सेतू कार्यालयात तासंतास थांबावे लागत आहे.


कधी कधी डिजिटल सातबारा निघत नसल्याने शेतकऱ्यांना खाली हात परतावे लागत आहे. परिणामी उतारा भावी कामे खोळंबली असून शेतकरी हैराण झाला आहे. डिजिटल इंडियाच्या पार्श्वभूमीवर राज्यात महसूल खात्याने सर्व गावांमधील शेतकऱ्यांच्या जमिनीचे सातबारा उतारे ऑनलाइन उपलब्ध करून दिले, मात्र सर्वर डाऊन असल्यामुळे शेतकऱ्यांना दाखला काढता येणे अवघड बनले आहे.


शेतकऱ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. शासनाच्या शेतकऱ्यांना इतर कागदपत्रांसह सातबाराची ही मागणी केली जाते. तसेच सध्या पीक कर्ज काढण्यासाठी लगबग सुरू असल्याने शेतकऱ्यांना सातबारा आवश्यक आहे. सर्वर डाऊन होत असल्याने शेतकरी डिजिटल सातबारा मिळणे अवघड झाले असून सेतू केंद्र व महा ई-सेवा केंद्रांमध्ये शेतकऱ्यांच्या चकरा वाढल्या आहेत.


ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी तलाठी कार्यालय, तहसील कार्यालय त्या भागातील महा-ई-सेवा केंद्र सेतू कार्यालय आदी ठिकाणी शेतकऱ्यांना डिजिटल सातबारा मिळतो. दरम्यान, महा-ई-सेवा केंद्र व सेतू कार्यालयात डिजिटल सातबारा मिळणे कठीण झाले आहे. पर्यायी शेतकरी तलाठ्यांशी संपर्क करून सातबारा काढत आहेत.

Comments
Add Comment

विरार-सफाळे जलमार्गावर बोट फेऱ्या वाढणार

बंदरे विकास मंत्री नितेश राणेंचे निर्देश विरार (प्रतिनिधी) : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक कोंडीतून

वसईत गॅस पाईपलाईन फुटली

वसई : पालघर जिल्ह्यातील वसईमध्ये वसंत नागरी परिसरात शनिवारी चार ऑक्टोबर रोजी सकाळी धक्कादायक घटना घडली.

शहरातील पंधराशे दुर्गामूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन

पर्यावरणपूरक नवरात्र उत्सवाला प्रतिसाद विरार (प्रतिनिधी) : वसई-विरार शहर पालिका कार्यक्षेत्रात दुर्गा देवीच्या

माजी आयुक्तांच्या अटकेचे पुरावे दाखवा

कारागृहातील मुक्काम वाढला बांधकाम प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले पालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार,

'चिकन लॉलीपॉप'ने घेतला सात वर्षांच्या मुलाचा जीव, पालघरमध्ये खळबळ

पालघर: मुंबईला लागून असलेल्या महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे चिकन लॉलीपॉप

रस्त्यांवरील खड्ड्यांसाठी एकमेकांकडे बोट

पालिका, बांधकाम विभागाने जबाबदारी झटकली विरार : रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे नुकतेच विरारमध्ये एका व्यक्तीचा