मुंबई (प्रतिनिधी) : बेस्ट बसमध्ये महिन्याभरात प्रवाशांकडून विसरलेले तब्बल ४८ मोबाइल सापडले असून हे मोबाइल १३ जूनपर्यंत आपली ओळख दाखवून घेऊन जाण्याचे आवाहन बेस्ट प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, बेस्टबसमध्ये प्रवास करताना प्रवाशांकडून मोबाईल विसरण्याचे प्रमाण वाढले आहे. एप्रिल महिन्यात वेगवेगळ्या मार्गावर चालणाऱ्या बसमध्ये प्रवासी मोबाइल विसरले आहेत. यात सॅमसंग, लिनोवो, नोकिया, व्हीओ, जिओ, रेडमी, ओप्पो यासह आय-फोनसारख्या मोबाइलचादेखील समावेश आहे.
तर ४८ मोबाईल सापडले असून यावर कुणी ही दावा केलेला नाही. तर बेस्टने या मोबाइलची यादी प्रसिद्ध केली आहे. ज्या कोणाचे हे मोबाइल आहेत त्यांनी कुलाबा येथील बेस्ट भवन येथून १३ जूनपर्यंत आपली ओळख पटवून घेऊन जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,…
ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार मुंबई (प्रतिनिधी) : बनावट पनीर किंवा चीन ऍनालॉग वापरणाऱ्यांवर…
पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…
काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…