आयपीएलचा हंगाम संपला; पण चर्चा तर होणारच...

अहमदाबाद/मुंबई (प्रतिनिधी) : इंडियन प्रीमियर लीग टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेच्या (आयपीएल) १५ व्या हंगामाचा नवा कोरा चॅम्पियन मिळाला आहे. विशेष म्हणजे प्रथमच आयपीएल खेळणाऱ्या ‘गुजरात टायटन्स’ने पहिल्याच सत्रात राजस्थान रॉयल्सचा सात गडी राखून पराभव करून या हंगामाचे विजेतेपद पटकावले आणि इतिहास रचला. तर राजस्थान रॉयल्सच्या या पराभवामुळे १४ वर्षानंतर दुसरे विजेतेपद मिळवण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहिले आहे.


तसेच विजयानंतर गुजरातवर बीसीसीआयकडून पैशांची बरसात झली आहे. गुजरातला चॅम्पियन ट्रॉफीसह २० कोटी रुपयांची बक्षीसाची घसघशीत रक्कमही मिळाली. तर उपविजेत्या राजस्थानलाही १२.५ कोटी रुपये मिळाले आणि तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या बंगळुरूलाही ७ कोटी व चौथ्या क्रमांकावर असलेल्या लखनऊला ६.५ कोटींचे रोख पारितोषिक मिळाले.


संघांव्यतिरिक्त या स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनीही भरपूर कमाई केली. सर्वाधिक विकेट घेणारा राजस्थानच्या युजवेंद्र चहलला पर्पल कॅपसह १० लाख रुपये मिळाले. चहलने या मोसमात २७ विकेट घेतल्या.
त्याचवेळी या मोसमात सर्वाधिक धावा करणारा राजस्थानचा सलामीवीर जोस बटलर याला ऑरेंज कॅपसह १० लाख रुपये मिळाले. बटलरने १७ सामन्यात ८६३ धावा फटकावल्या.


अंतिम सामन्यातील सामनावीर हार्दिक पांड्या याला ५ लाख रुपये मिळाले. त्याशिवाय इमर्जिंग प्लेअर ऑफ द इयर, सुपर स्ट्रायकर ऑफ द सीझन, मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर ऑफ द इयर, गेमचेंजर ऑफ द इयर, पॉवरप्लेअर ऑफ द इयर आणि मॅक्सिम सिक्स अॅवार्ड्सही अंतिम सादरीकरण सोहळ्यात देण्यात आले. म्हणजे उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना मालामाल करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत