खुनी आरोपीला १९ वर्षांनंतर विदेशातून अटक

  74

नालासोपारा (वार्ताहर) : मुंबईत खून करणाऱ्या विपुल पटेल या आरोपीला युरोपमधील प्राग या शहरातून मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या एका विशेष पथकाने २१ मे रोजी अटक केली. हे पथक विपुलचा ताबा घेऊन २७ मे रोजी भारतात परतले आहे. न्यायालयाने त्याला १० जुलै पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. लिओन स्विडेस्की या ३३ वर्षीय अमेरिकन मॉडेलची ८ फेब्रुवारी २००३ रोजी मुंबई विमानतळावरुन अपहरण करुन हत्या करण्यात आली होती. त्यानंतर आरोपींनी तिचा मृतदेह काशिमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत महामार्गालगत फेकला होता.


अमेरिकन सरकारने लिओनाच्या हत्येची गंभीर दखल घेतली होती. या तपासासाठी त्यांच एक पथक मीरा रोडला पाठवले होते. याप्रकरणी काशिमीरा पोलिसांनी लिओनचा प्रियकर प्रग्नेश देसाई आणि विपुल पटेल यांना अटक केली होती. परंतु दोघेही निर्दोष सुटले होते.


अमेरिकन सरकारने गंभीर दखल घेतल्याने पोलिसांनी या निकालाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. खटल्यात प्रगती होत नव्हती. या प्रकरणाची दखल आयुक्त सदानंद दाते यांनी तपास सुरु केला. मुख्य आरोपी प्रग्नेशला बडोद्यामधून न्यायालयात हजर केले. तर विपुलला प्राग शहरातून ताब्यात घेतले, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी दिली.

Comments
Add Comment

Weight loss: वजन कमी करायचे आहे तर करा ही ४ कामे, १ महिन्यात कंबर होईल सडपातळ

मुंबई: प्रत्येकाला वाटत असते की आपण स्लिम ट्रिम असावं. आपले शरीर हे सडपातळ असावे. मात्र अनेकदा प्रयत्न करूनही ही

बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणातील मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना मिळणार २५ लाखांची मदत

मुंबई: बंगळुरूच्या एम.चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेल्या दुर्देवी घटनेनंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री

'हाउसफुल ५' सिनेमाने पहिल्याच दिवशी केली रेकॉर्डब्रेक कमाई

मुंबई : बहुचर्चित आणि मोठ्या बजेटचा चित्रपट 'हाउसफुल ५' ६ जून रोजी प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी

कोकण रेल्वे मुंबई-मडगाव मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी मुंबई मडगाव मार्गावर धावणार आहे. या गाडीचे आरक्षण

डीनो मोरियाच्या ईडी चौकशीत सुशांत–दिशा हत्या प्रकरणाचे धागेदोरे उलगडणार?

मुंबई : बॉलिवूड अभिनेता डिनो मोरिया, एकेकाळचा बॉलीवूड अभिनेता आणि आज एक संशयित घोटाळेबाज! मुंबईच्या मीठी नदी

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु -