खुनी आरोपीला १९ वर्षांनंतर विदेशातून अटक

नालासोपारा (वार्ताहर) : मुंबईत खून करणाऱ्या विपुल पटेल या आरोपीला युरोपमधील प्राग या शहरातून मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या एका विशेष पथकाने २१ मे रोजी अटक केली. हे पथक विपुलचा ताबा घेऊन २७ मे रोजी भारतात परतले आहे. न्यायालयाने त्याला १० जुलै पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. लिओन स्विडेस्की या ३३ वर्षीय अमेरिकन मॉडेलची ८ फेब्रुवारी २००३ रोजी मुंबई विमानतळावरुन अपहरण करुन हत्या करण्यात आली होती. त्यानंतर आरोपींनी तिचा मृतदेह काशिमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत महामार्गालगत फेकला होता.


अमेरिकन सरकारने लिओनाच्या हत्येची गंभीर दखल घेतली होती. या तपासासाठी त्यांच एक पथक मीरा रोडला पाठवले होते. याप्रकरणी काशिमीरा पोलिसांनी लिओनचा प्रियकर प्रग्नेश देसाई आणि विपुल पटेल यांना अटक केली होती. परंतु दोघेही निर्दोष सुटले होते.


अमेरिकन सरकारने गंभीर दखल घेतल्याने पोलिसांनी या निकालाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. खटल्यात प्रगती होत नव्हती. या प्रकरणाची दखल आयुक्त सदानंद दाते यांनी तपास सुरु केला. मुख्य आरोपी प्रग्नेशला बडोद्यामधून न्यायालयात हजर केले. तर विपुलला प्राग शहरातून ताब्यात घेतले, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी दिली.

Comments
Add Comment

नाव न सांगता साईबाबा चरणी "इतक्या" कोटींचा सोन्याचा हार अर्पण...

शिर्डी : साईबाबांचा १०७ वा पुण्यतिथी उत्सव १ ऑक्टोबर ते ४ ऑक्टोबर या दरम्यान झाला. अनेक भाविकांनी दर्शनासाठी

यंदा कधी आहे कोजागिरी पौर्णिमा ? जाणून घ्या या तिथीचे महत्त्व आणि शुभ मुहूर्त

कोजागिरी पौर्णिमा हा आश्विन पौर्णिमेला येणार भारतीय हिंदू संस्कृतीमधील महत्वाचा दिवस आहे. आणि इंग्रजी

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे चिपळूणमध्ये पुराचा धोका

चिपळूण (वार्ताहर) : चिपळूण शहराला असलेल्या पुराच्या धोक्याबाबत उपाययोजना सूचविण्यासाठी राज्य सरकारने जलसंपदा

मंत्री नितेश राणेंचा वैभववाडीत उबाठावर मोठा घाव!

मंगेश लोकेंसह शेकडो कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचा भाजप प्रवेश ओरोस (वार्ताहर) : वैभववाडी तालुक्यात उद्धव

गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या जुळ्या बोगद्याचे काम नवीन वर्षापासून

मुंबई (खास प्रतिनिधी) :गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पातंर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात

रायगड जिल्हा परिषदेत २ हजार ६०९ पदे रिक्त

अलिबाग (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील विकासाला गती देण्याचे काम रायगड जिल्हा परिषदेचे असले, तरी जिल्हा परिषदेत