Categories: कोलाज

माकड झाले माणूस!

Share

रमेश तांबे

एके दिवशी एक माकड गेलं देवाकडे अन् म्हणालं, ‘देवा माझ्यावर असा अन्याय तू करतोस तरी कसा?’ देव म्हणाला, ‘झालं तरी काय, एवढं रागवायला. तुलादेखील दिलेत मी दोन डोळे, दोन कान, चार पाय अन् एक शेपूट! बाकीच्या माकडांना जसं दिलंय तेवढंच तुलाही दिलंय!’

माकड हसलं अन् म्हणालं, ‘देवा उगाचच जोक्स् नको मारू! माझ्या बोलण्याला उगाच नको हसू! माझा प्रश्न खूपच साधा, आतापर्यंत विचारलाय दहादा! काही माकडं झाली माणसं, मग मला का नाही तसा चान्स! मीच काय तुझं मारलंय घोडं! मीसुद्धा आहे ना तुझंच लेकरू, मग किती वेळा तुझी विनवणी करू! हे बघ देवा खरा असशील, तर मला माणूस बनवशील!’

देव म्हणाला, ‘माकडा खूप घाई करू नकोस. कारण एकदा का माणूस झालास, तर पुन्हा तुला माकड बनता येणार नाही! तू परत एकदा जंगल सोडून शहरात जा. पुन्हा एकदा माणसांचं जीवन जवळून बघ आणि मगच ठरव. पुन्हा आलास, तर तुला नक्कीच माणूस बनवीन जा तू आता.’

मग माकड गेलं लपत छपत मुंबईत. त्याने बघितल्या उंचच उंच इमारती, मोठमोठ्या गाड्यांमधून मजेत फिरणारी माणसं, त्याने पाहिली हॉटेलात विविध पदार्थांवर ताव मारणारी, समुद्र किनाऱ्यावर आनंदाने गप्पा मारत बसलेली माणसं, माकडानं गाड्या पाहिल्या, विमानं पाहिली, माणसांचं ऐशोआरामी जीवन बघून आपणही माणूसच बनायचं, असं त्यानं मनोमन ठरवलं!

दुसऱ्याच दिवशी माकड गेलं देवाकडे अन् म्हणालं, देवा विचार माझा ठरला, लगेच माणूस बनव मला. देव हसत हसत म्हणाला, माकडा विचार केलास ना नीट. माकड म्हणालं, हो हो देवा माझं डोकं आहे ठीक!

मग देवाने ‘तथास्तू!’ म्हणताच माकडाला खूप खूप आनंद झाला अन् काय आश्चर्य माकड झाला माणूस आणि जंगल सोडून आला थेट मुंबईच्या झोपडपट्टीत! झोपडपट्टी होती खूपच अस्वच्छ. जिकडे तिकडे कचऱ्याचे ढीग अन् वाहती गटारं! दारू पिऊन भांडणारी माणसं अन् कचाकचा भांडणाऱ्या बायका! खायला अन्न नाही, प्यायला स्वच्छ पाणी नाही. एक मळकी, गळकी झोपडी आली माकडाच्या वाट्याला त्यानं हात लावला कपाळाला. मनात म्हणाला, अरेरे हेच असतं का माणसाचं जीवन त्यापेक्षा बरे नाही का मरण! काम करा, पैसे मिळवा, मगच आपलं घर चालवा. माकड असताना मी वेगळीच माणसं बघितली, ते आणि हे किती वेगळं आहे यांचं जीवन!

महिनाभरातच माकड कंटाळलं अन् पुन्हा गेलं देवाकडं आणि म्हणालं! देवा देवा मला पुन्हा कर माकड, माणसाचं जीवन खूपच आहे अवघड. आपलं माकडाचं जीवन किती छान. आपण बरं अन् आपलं जंगल बरं. झाडावर राहायचं. हवं तेव्हा घर बदलायचं. ताजी ताजी फळं खायचं, झुळझुळणाऱ्या नदीचं गोड अन् स्वच्छ पाणी प्यायचं. खरंच घर नको की तो संसार नको. फक्त तेवढं जंगली प्राण्यांपासून सावध राहिलं म्हणजे झालं. मग माकडाचं जीवन म्हणजे मजाच मजा!

पण देव म्हणाला, नाही आता तुला पुन्हा माकड होता येणार नाही! तुला माणूस होण्याआधी दहा वेळा सांगितलं होतं, की नीट विचार कर. पण तू तर हट्टालाच पेटलास. आता तुला माणूस म्हणूनच जीवन जगावं लागेल! हो पण मी तुला रिकाम्या हातानं परत पाठवणार नाही. माकडांचे काही गुण मी तुला देतो. म्हणजे तुला तुझं माकड जीवन माणसाच्या रूपातदेखील जगता येईल. असं म्हणून देवानं पुन्हा एकदा तथास्तू म्हटलं! माकड माणूसच राहिला! पण देवाच्या आशीर्वादाचा परिणाम असा झाला की, तेव्हापासून माणूस ‘माकड चाळे’ करू लागला आणि माकडाकडे बघून त्याला खूप आनंद मिळू लागला!

Recent Posts

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, २५ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण द्वादशी शके १९४७ . चंद्र नक्षत्र पूर्वा भाद्रपदा योग ऐद्र.…

22 minutes ago

पहलगामचा हिशोब भारत चुकता करणार!

काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरनमध्ये दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याने भारताच्या सर्वोच्च स्थानी असलेल्या जम्मूपासून ते…

27 minutes ago

RCB vs RR, IPL 2025: घरच्या मैदानावर आरसीबीचा पहिल्यांदा विजय, राजस्थानवर ११ धावांनी केली मात

बंगलोर: इंडियन प्रीमियर लीगच्या ४२व्या सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने राजस्थान रॉयल्सला ११ धावांनी हरवले…

1 hour ago

वॉटर टॅक्सीची सुविधा असणारे देशातील पहिले विमानतळ

नैना प्रकल्पाची गतीने अंमलबजावणी करावी मुंबई : भविष्यातील आव्हाने लक्षात घेता पर्यावरण पूरक आणि समृद्ध…

2 hours ago

Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यात सुरक्षा यंत्रणांची चूक; सर्वपक्षीय बैठकीत केंद्राची कबुली

नवी दिल्ली : काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याने देश हादरून गेला असतानाच, केंद्र सरकारने…

2 hours ago

Simla Agreement: भारताने सिंधू नदीचे पाणी थांबवले तर पाकिस्तानकडून शिमला करार स्थगित करण्याची दर्पोक्ती! काय आहे हा शिमला करार?

नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, मोदी सरकारने पाकिस्तान संबंधित राजकीय, आर्थिक आणि राजनैतिक आघाड्यांवर काही…

3 hours ago