वरळी किल्ल्याचा होणार कायापालट

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महापालिका क्षेत्राचा ऐतिहासिक ठेवा व सांस्कृतिक वैभव असणाऱ्या आणि तब्बल ३४७ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या वरळी किल्ल्याच्या पहिल्या टप्प्यातील जिर्णोद्धार कामांचे भूमिपूजन आमदार सुनिल शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी माजी महापौर किशोरी पेडणेकर, माजी मंत्री सचिन अहिर, माजी नगरसेवक आशीष चेंबूरकर व माजी नगरसेविका हेमांगी वरळीकर, जी दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त शरद उघडे व मोठ्या संख्येने मान्यवर नागरिक उपस्थित होते.


‘जी दक्षिण’ विभागाद्वारे वरळी किल्ल्याचा जिर्णोद्धार व सभोवतालच्या परिसराचे सुशोभीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यानुसार टप्प्याटप्प्याने ही काम केली जाणार आहेत. दरम्यान महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारीतील किल्ल्यांपैकी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात असलेल्या ऐतिहासिक किल्ल्यांमध्ये वरळी किल्ला हा एक महत्त्वाचा किल्ला आहे. वरळी किल्ल्याच्या जिर्णोद्धाराचे व सभोवतालच्या परिसराच्या सुशोभीकरणाचे काम बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे हाती घेण्यात आले आहे.


किल्ल्याच्या जिर्णोद्धारांतर्गत प्रामुख्याने स्थापत्य स्वरुपाची कामे करण्यात येणार असून तटबंदीची डागाडुजी देखील करण्यात येणार आहे. किल्ल्याच्या पश्चिमेकडील बाजूस व दक्षिणेकडील बाजूस समुद्र किनारी असलेल्या मोकळ्या जागेत समुद्रफुल अशा आकर्षक झाडांची लागवड करण्यात येणार आहे. तसेच किल्ल्याबाहेरील मोकळ्या जागेत हिरवळ व इतर शोभेची झाडे लावून बेसॉल्ट दगडाच्या पायवाटा देखील तयार करण्यात येणार आहेत. वरळी किल्ल्याची महती आणि माहिती सांगणारे फलक, दिशादर्शक फलक इत्यादी देखील परिसरात जागोजागी बसविण्यात येणार आहेत.

Comments
Add Comment

मुंबई–लातूर द्रुतगती महामार्गाला गती

सहा जिल्हे जोडले जाणार मुंबई : मुंबई ते लातूर हा प्रवास अतिजलद आणि सुलभ करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास

मुंबई उपनगरीय रेल्वेचा चेहरामोहरा बदलणार

१८,३६४ कोटींचे ४०० किमी रेल्वे प्रकल्प मार्गी मुंबई : मुंबईची उपनगरीय रेल्वेव्यवस्था येत्या काही वर्षांत

सरकारी रुग्णालयांमध्ये डिजिटल सुविधा सुरू करणार

केईएम, जेजेमध्ये AI-आधारित शवविच्छेदन मुंबई : न्यायवैद्यक शास्त्राचे आधुनिकीकरण करण्याच्या दिशेने एक

देशभरात वीज होणार स्वस्त

पावर ट्रेडिंग शुल्काबाबत केंद्रीय विद्युत नियामक आयोगाचा निर्णय जानेवारी २०२६ पासून टप्प्याटप्प्याने

दिव्यांग शिक्षकांना निवडणुकीची ‘ड्युटी’

शिक्षक संघटनाची नाराजी मुंबई : दिव्यांग शिक्षकांना निवडणूकसंदर्भात कोणतेही कामकाज देऊ नये, असे आदेश असताना

नीता अंबानी यांनी सुरू केले कर्करोग व डायलिसिस केंद्र

मुंबई (प्रतिनिधी) : रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक व अध्यक्षा नीता अंबानी यांनी कर्करोग रुग्णांसाठी रिलायन्स