भंगार साहित्या मुळे मुंब्र्यातील नालेसफाई टांगणीला....

  65

ठाणे (प्रतिनिधी) : मे महिना संपण्यास काही दिवसांचा कालावधी शिल्लक आहे, पावसाळा उंबरठ्यावर आला आहे तरी देखील ठाण्यातील नालेसफाई बद्दल प्रश्नचिन्ह कायम असून अधिकाऱ्यांमध्येच नालेसफाई बद्दल एकवाक्यता नसल्याचे समोर येत आहे. नालेसफाईच्या बैठकीत अधिकाऱ्यांमध्येच आरोप-प्रत्यारोपांची साफसफाई झाल्याचे दिसून आले आहे.


महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी नालेसफाईचा दौरा केल्यानंतर ७० ते ७५ टक्के नालेसफाई झाल्याचा दावा केला असला तरी अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांच्या दालनात नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये नालेसफाई केवळ ५० टक्केच झाली असल्याची माहिती देण्यात आल्यामुळे नाले सफाईच्या कामाच्या दर्जाबाबत प्रशासनातच गोंधळ असल्याची गंभीर बाब सामोर आली आहे.


ठाणे महापालिका क्षेत्रात नालेसफाईच्या कामांना सुरुवात करण्यात आली आहे. नऊ प्रभाग समितीच्या अंतर्गत एकत्रच ही कामे सुरू करण्यात आली असून यासाठी ९ प्रभाग समिती अंतर्गत नऊ स्वतंत्र ठेकेदारांची नियुक्त करण्यात आली आहे. नालेसफाई करताना कर्मचाऱ्यांची सुरक्षा गांभीर्याने घेतली जात नसल्याच्या मुद्द्यावरून प्रशासनावर टीका झाली होती. या मुद्द्यावर सोमवारी अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी संबंधित ठेकदारांची बैठक घेऊन नालेसफाईचा आढावा घेतल्यानंतर ४० ते ५० टक्केच नालेसफाई झाला असल्याचा दावा या बैठकीमधून करण्यात आला आहे.


दरम्यान शहरात सर्व प्रभाग समित्यांमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा अधिक नालेसफाई झाली असल्याची माहिती उपायुक्त मनीष जोशी यांनी दिली आहे.


कळवा-मुंब्रातील नालेसफाईचे आव्हान


कळवा-मुंब्रा परिसरातील नालेसफाई करणे हे प्रशासनासाठी आव्हान असते. या परीसरात लोकसंख्येची घनता जास्त आहे. त्याच प्रमाणे नागरी वस्तीत असलेले अरुंद नाले त्यामुळे नालेसफाई करणार तरी कशी हा प्रश्न असतो. अनेक ठिकाणी नालेसफाई करण्यासाठी लागणारे यांत्रिक वाहन त्याचप्रमाणे राडारोडा उचलण्यासाठी ट्रक नाल्यापर्यंत पोहोचण्यासाठी रस्ता उपलब्ध नसतो, अशा अनेक अडचणींचा त्या ठिकाणी सामना करावा लागतो.

Comments
Add Comment

आनंदाची बातमी शिळफाटा-कल्याण ते रांजनोली वाहतूककोंडी सुटणार

ठाणे : शिळफाटा-कल्याण ते रांजनोली या पट्ट्यात वाहतूक कोंडी ही रोजची समस्या झाली आहे. यावर उपाय करण्यासाठी

कल्याणमध्ये भीषण अपघात: ट्रकने दुचाकीस्वार महिलेला चिरडले, जागीच मृत्यू

ठाणे: कल्याण पश्चिम येथील निक्कीनगर परिसरात एका दुचाकीस्वार महिलेचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. आपल्या

ठाणे महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर, नगरसेवक संख्येत वाढ नाहीच, यंदाही 131 नगसेवक

मुंबई, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, ठाणे महापालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून आज ठाणे महानगरपालिकेची

Bhiwandi Accident : भिवंडीत खड्ड्यांनी घेतला डॉक्टरचा बळी; आतापर्यंत जीवघेण्या खड्ड्यामुळे तिघांचे प्राण गेले, जबाबदार कोण?

भिवंडी : भिवंडी शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था पुन्हा एकदा जीवघेणी ठरली आहे. वंजारपट्टी नाका परिसरात उघडखाबड

ठाण्यात मुसळधार पावसामुळे गणपती कारखान्यात शिरलं पाणी

ठाण्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असताना पावसाचा फटका गणपती मूर्तीला देखील बसला

पावसामुळे ठाण्यात ४ महिन्यांत २० जणांचा बळी!

ठाणे: गेल्या चार महिन्यांत ठाणे जिल्ह्यात पावसामुळे संबंधित घटनांमध्ये किमान २० लोकांचा मृत्यू झाला आहे, तर या