भंगार साहित्या मुळे मुंब्र्यातील नालेसफाई टांगणीला....

ठाणे (प्रतिनिधी) : मे महिना संपण्यास काही दिवसांचा कालावधी शिल्लक आहे, पावसाळा उंबरठ्यावर आला आहे तरी देखील ठाण्यातील नालेसफाई बद्दल प्रश्नचिन्ह कायम असून अधिकाऱ्यांमध्येच नालेसफाई बद्दल एकवाक्यता नसल्याचे समोर येत आहे. नालेसफाईच्या बैठकीत अधिकाऱ्यांमध्येच आरोप-प्रत्यारोपांची साफसफाई झाल्याचे दिसून आले आहे.


महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी नालेसफाईचा दौरा केल्यानंतर ७० ते ७५ टक्के नालेसफाई झाल्याचा दावा केला असला तरी अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांच्या दालनात नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये नालेसफाई केवळ ५० टक्केच झाली असल्याची माहिती देण्यात आल्यामुळे नाले सफाईच्या कामाच्या दर्जाबाबत प्रशासनातच गोंधळ असल्याची गंभीर बाब सामोर आली आहे.


ठाणे महापालिका क्षेत्रात नालेसफाईच्या कामांना सुरुवात करण्यात आली आहे. नऊ प्रभाग समितीच्या अंतर्गत एकत्रच ही कामे सुरू करण्यात आली असून यासाठी ९ प्रभाग समिती अंतर्गत नऊ स्वतंत्र ठेकेदारांची नियुक्त करण्यात आली आहे. नालेसफाई करताना कर्मचाऱ्यांची सुरक्षा गांभीर्याने घेतली जात नसल्याच्या मुद्द्यावरून प्रशासनावर टीका झाली होती. या मुद्द्यावर सोमवारी अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी संबंधित ठेकदारांची बैठक घेऊन नालेसफाईचा आढावा घेतल्यानंतर ४० ते ५० टक्केच नालेसफाई झाला असल्याचा दावा या बैठकीमधून करण्यात आला आहे.


दरम्यान शहरात सर्व प्रभाग समित्यांमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा अधिक नालेसफाई झाली असल्याची माहिती उपायुक्त मनीष जोशी यांनी दिली आहे.


कळवा-मुंब्रातील नालेसफाईचे आव्हान


कळवा-मुंब्रा परिसरातील नालेसफाई करणे हे प्रशासनासाठी आव्हान असते. या परीसरात लोकसंख्येची घनता जास्त आहे. त्याच प्रमाणे नागरी वस्तीत असलेले अरुंद नाले त्यामुळे नालेसफाई करणार तरी कशी हा प्रश्न असतो. अनेक ठिकाणी नालेसफाई करण्यासाठी लागणारे यांत्रिक वाहन त्याचप्रमाणे राडारोडा उचलण्यासाठी ट्रक नाल्यापर्यंत पोहोचण्यासाठी रस्ता उपलब्ध नसतो, अशा अनेक अडचणींचा त्या ठिकाणी सामना करावा लागतो.

Comments
Add Comment

मुंबई–नाशिक महामार्गावरील कोंडी लवकरच इतिहास जमा होणार? मार्च २०२६ पर्यंत .....

ठाणे : मुंबई–नाशिक दरम्यान प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. माजिवडा ते वडपे या

रस्ते-मेट्रो-पाणी प्रकल्पांना गती देणार, हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई करणार; पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न

१७०० कोटी प्रस्तावीत करण्याच्या पालकमंत्री शिंदे यांनी दिल्या सूचना पावसाळ्यापूर्वी ठाणे जिल्हा अलर्ट

10th-12 Board Exam 2026: दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर वेळेवर पोहोचवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी लढवली अनोखी शक्कल

ठाणे: आजपासून म्हणजेच मंगळवार १० फेब्रुवारी पासून बारावीच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे. तर २० फेब्रुवारी

भिवंडीत श्वानदंश झालेल्या मुलाचा मृत्यू

भिवंडी : श्वानदंश झालेल्या १२ वर्षीय हमीद खान याचा उपचारादरम्यान मृत्यूची घटना भिवंडीत घडली आहे. १० जानेवारीला

ठाण्यातील भव्य त्रिमंदिर भाविकांसाठी खुले; तीन दिवसांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर दर्शनास सुरुवात

ठाणे : ठाणे शहरात उभारण्यात आलेले भव्य त्रिमंदिर अखेर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. तीन दिवस चाललेल्या

ठाणे-घोडबंदर रोडचे रुंदीकरण होणार?

मीरा-भाईंदर (वार्ताहर): ठाणे-घोडबंदर रस्ता ६० मीटर रुंद करण्यासाठी आवश्यक असणारी भूसंपादनाची प्रक्रिया