ठाण्यातील भव्य त्रिमंदिर भाविकांसाठी खुले; तीन दिवसांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर दर्शनास सुरुवात

ठाणे : ठाणे शहरात उभारण्यात आलेले भव्य त्रिमंदिर अखेर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. तीन दिवस चाललेल्या प्राणप्रतिष्ठा विधीनंतर हे मंदिर सर्वसामान्य भक्तांसाठी दर्शनासाठी खुले झाले असून, ठाण्यातील नवे अध्यात्मिक केंद्र म्हणून या मंदिराकडे पाहिले जात आहे. मुंबई महानगर प्रदेशातील हे सर्वात मोठे त्रिमंदिर मानले जात आहे.


ठाणे पश्चिमेकडील बाळकूम–साकेत रोड परिसरात सुमारे १.५ एकर क्षेत्रफळावर या त्रिमंदिराची उभारणी करण्यात आली आहे. महावीर जैन ट्रस्ट आणि दादा भगवान फाउंडेशन यांच्या संकल्पनेतून हे मंदिर साकारले असून, धार्मिक समन्वय आणि सर्वधर्मीय ऐक्याचा संदेश देणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.


या त्रिमंदिरात एकाच व्यासपीठावर विविध धर्मांचे आराध्य दैवत विराजमान करण्यात आले आहेत. यामध्ये *जैन धर्माचे श्री सीमांधर स्वामी, शैव धर्माचे भगवान शिव, तसेच वैष्णव परंपरेतील भगवान कृष्ण यांच्यासह एकूण २५ पूजनीय देवतांची स्थापना करण्यात आली आहे. विविध धर्मांमधील निपक्षपातीपणा आणि समतेची भावना जपण्याचा प्रयत्न या मंदिररचनेतून दिसून येतो.


मंदिराच्या स्थापत्यशैलीकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. हे मंदिर जयपूर येथून आणलेल्या पांढऱ्या संगमरवरी दगडापासून बांधण्यात आले असून, त्याची कलात्मक रचना भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. मंदिरातील प्रमुख आकर्षण असलेल्या श्री सीमांधर स्वामी यांच्या मूर्तीची उंची सुमारे १३ फूट असून, तिचे वजन अंदाजे १८ हजार किलो असल्याची माहिती देण्यात आली आहे.


हे त्रिमंदिर केवळ श्रद्धेचे केंद्र नसून सामाजिक समता, धार्मिक सलोखा आणि अध्यात्मिक शांततेचे प्रतीक आहे. मंदिर सुरू झाल्याने ठाणे शहरातील भाविकांमध्ये समाधान व्यक्त केले जात असून, पुढील काळात हे ठिकाण अध्यात्मिक पर्यटनाचेही महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे.

Comments
Add Comment

Congress : राज्यसभा निवडणूकीपूर्वीच काँग्रेसच्या एकमेव उमेदवाराचा अर्ज रद्द

भोपाळ : मध्य प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या एकमेव उमेदवार असलेल्या मीनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी

Babasaheb Patil : गटसचिवांच्या न्याय्य मागण्यांवर कायदेशीर व प्रशासकीय बाबी तपासून सकारात्मक निर्णय घेऊ

मुंबई, दि. ९ जून : राज्यातील गटसचिवांच्या सेवा विषयक प्रश्न वेतन थकीत देयके तसेच जिल्हा संवर्गाच्या

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मानाचा स्कॉच पुरस्कार

शासन आपल्या दारी'च्या यशाबद्दल 'स्कॉच ग्रुप' कडून झाला सन्मान २०२४ साली जाहीर झालेला पुरस्कार आज उपमुख्यमंत्री

MSRDC : आराखडा तयार करावा,ऊर्जा राज्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई,  : तिसऱ्या मुंबईचा विकास जलद गतीने होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विकास प्रक्रियेवर लक्ष

Dr. Neelam Gorhe : महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि विद्यार्थी सुसंवादासाठी व्यासपीठ सुरू होणार

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षा पद्धतीत तातडीने सुधारणा करावी आणि स्पर्धा परीक्षार्थींच्या

Crime News : पोलीस असल्याचे सांगत वृद्धाला गंडा; साडेतीन तोळ्यांचे दागिने घेऊन पसार

Ahilyanagar Crime News : अहिल्यानगर शहरात पुन्हा एकदा ‘बनावट पोलीस’ टोळी सक्रिय झाल्याचं समोर आलं असून, पोलीस असल्याची बतावणी