तुळजाभवानी मंदिर दानपेटीतील भ्रष्टाचार प्रकरणी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतो - शंभूराज देसाई

  145

मुंबई : तुळजाभवानी देवीच्या मंदिरातील दानपेटीच्या लिलावातील भ्रष्टाचारासंदर्भातील सीआयडी अहवाल प्रकरणी मी अधिका-यांकडून माहिती घेतो. तसेच याविषयी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतो, असे आश्वासन या वेळी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिराच्या दानपेटीतील भ्रष्टाचाराप्रकरणी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट आणि सतीश सोनार यांची शंभूराज देसाई यांची भेट घेऊन दोषींवर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी देसाई यांनी वरील आश्वासन दिले. याविषयीचे निवेदनही या वेळी समितीच्या वतीने शंभूराज देसाई यांना देण्यात आले.


महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिरातील दानपेटीच्या लिलावातील भ्रष्टाचाराची सरकारने विशेष अन्वेषण यंत्रणेद्वारे (सी.आय.डी.) चौकशी लावली होती. विशेष अन्वेषण यंत्रणेने हा चौकशीचा अहवाल वर्ष २०१७ मध्ये सरकारला सादर केला आहे; मात्र अहवाल सादर करून ५ वर्षे झाली तरी दोषींवर अद्याप कारवाई झालेली नाही.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या