महिला गोलंदाज मायाची अजब अॅक्शन चर्चेत

पुणे (प्रतिनिधी) : महिला टी-२० चॅलेंज म्हणजेच महिला आयपीएल सुरू झाले आहे. या स्पर्धेत एकूण चार सामने होणार आहेत. आतापर्यंत झालेल्या दोन सामन्यांमध्ये अनेक खेळाडूंनी आश्चर्यकारक कामगिरी केली असली तरी सर्वाधिक चर्चा माया सोनवणे हिची आहे.


आयपीएल २०२२ मध्ये महिला टी-२० चॅलेंजचे सामनेही सुरू झाले आहेत. ही ४ सामन्यांची लीग सुपरनोव्हास, ट्रेलब्लेझर्स आणि व्हेलॉसिटी यांच्यात खेळवली जात आहे. सुपरनोव्हासने पहिल्या सामन्यात ट्रेलब्लेझर्सचा ४९ धावांनी पराभव केला; परंतु दुसऱ्या सामन्यात त्यांना व्हेलॉसिटीविरुद्ध ७ गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. सुपरनोव्हास आणि व्हेलॉसिटी यांच्यातील दुसऱ्या सामन्यात माया सोनवणे या महाराष्ट्राच्या खेळाडूला खेळण्याची संधी मिळाली आणि तिची गोलंदाजी प्रसिद्धीच्या झोतात आली.


व्हेलॉसिटीकडून खेळणारी माया सोनवणे लेगस्पिन गोलंदाजी करते. गोलंदाजी करताना तिचे डोके खाली जाते. ती तिच्या गुडघ्यात खूप वाकते. ११व्या षटकात कर्णधार दीप्ती शर्माने मायाला पहिल्यांदा गोलंदाजी दिली. पहिला चेंडू टाकताच ती चर्चेचे केंद्र बनली. मात्र तिला गोलंदाजीत काही चमत्कार करता आला नाही. दोन षटकांत १९ धावा दिल्यानंतर कर्णधार दीप्तीने तिला पुन्हा गोलंदाजीची संधी दिली नाही.


महिला सीनिअर टी-२० ट्रॉफीमध्ये केलेल्या शानदार गोलंदाजीमुळे या महिला टी-२० चॅलेंजमध्ये स्टार खेळाडूंसोबत खेळण्याची संधी तिला मिळाली आहे. महाराष्ट्राचा संघ सीनिअर टी-२० ट्रॉफीच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. त्या स्पर्धेत मायाने ८ सामन्यांत ११ विकेट घेतल्या होत्या. सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत ती दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Comments
Add Comment

कोल्हापूर ACB मधील DYSP वैष्णवी पाटील यांच्या कारचा अपघात; दोन जणांचा मृत्यू, चित्रदुर्गमध्ये उपचार सुरू

चित्रदुर्ग : कोल्हापूर अँटी करप्शन ब्युरोमध्ये कार्यरत असलेल्या उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या वाहनाला

Nagpur News: नागपुरात आयकर विभागाची व्यापाऱ्यावंर मोठी कारवाई

नागपूर : महापालिका निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होताच नागपूर शहरात आयकर विभागाने मोठी धडक कारवाई करत

कोल्हापुरात प्रसुतीनंतर डिस्चार्ज घेऊन घरी जाताना अपघात, बाळंतीणचा मृत्यू, सात दिवसांचं बाळ जखमी, PI ची तडकाफडकी बदली

कोल्हापूर : गडहिंग्लज-चंदगड राज्यमार्गावर कानडेवाडी येथे झालेल्या भीषण अपघातानंतर नेसरी पोलीस ठाण्यातील

Mumbai - Pune Expressway : अटल सेतुपासुन थेट पुण्यापर्यंत ९० मिनिटात,नक्की मार्ग काय ?

Mumbai - Pune Expressway : मुंबई आणि पुणे या महाराष्ट्रातील दोन प्रमुख शहरांदरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांरीकांना मोठा

कोल्हापूरात काँग्रेसला सर्वाधिक जागा; तरीही सत्ता महायुतीचीच!

मुंबई : महापालिकेची सत्ता मिळवण्यासाठी विविध पक्ष, उमेदवार व कार्यकर्त्यांनी साम-दाम-दंड-भेदाचा पुरेपूर वापर

अजित पवारांच्या हातून पिंपरी चिंचवडही गेले

पुण्यात उबाठाचा केवळ १ नगरसेवक विजयी ‘वंचित’ने खातेच उघडले झाले पुणे : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या १२८