मिलरने मागितली राजस्थान रॉयल्सची माफी; व्हायरल झालेले ट्विट

कोलकाता (वृत्तसंस्था) : आयपीएलच्या क्वालिफायर सामन्यात गुजरातच्या डेव्हिड मिलरने शेवटच्या षटकात सलग तीन षटकार मारत संघाला विजयापर्यंत नेत राजस्थानला पराभवाचा धक्का दिला.


रोमांचक वळणावर आलेल्या या सामन्यात त्याने ३८ चेंडूंत पाच षटकार आणि तीन चौकार लगावत नाबाद ६८ धावा करून आपल्या पूर्वाश्रमीच्या संघाला फायनलमध्ये जाण्यापासून रोखले. त्यामुळे सामना संपल्यानंतर लगेचच मिलरने ट्विटरवर ‘सॉरी राजस्थान रॉयल्स’ असे म्हणत त्यांची माफी मागितली. २०२० आणि २०२१ या दोन हंगामात मिलर रॉयल्स संघात होता; परंतु तो अनेक सामन्यांमध्ये संघाचा भाग नव्हता.


https://twitter.com/rajasthanroyals/status/1529202557314162688

मिलरच्या ट्वीटला प्रतिसाद देत, राजस्थान रॉयल्सने लोकप्रिय शो "तारक मेहता का उल्टा चष्मा" मधील एक मिम शेअर केला आहे ज्यामध्ये लिहिले आहे, "दुष्मन ना करे दोस्त ने वो काम किया है."


आयपीएल २०२२ मेगा लिलावाच्या पहिल्या दिवशी न विकल्या गेलेल्या डेव्हिड मिलरला गुजरात टायटन्सने ३ कोटी रुपयांना विकत घेतले आहे. त्याच्यावर राजस्थान रॉयल्सनेही बोली लावली होती.


या सामन्यात रॉयल्सच्या १८९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना डेव्हिड मिलर (नाबाद ६८) आणि पंड्या (नाबाद ४०) यांच्या चौथ्या विकेटसाठी १०६ धावांच्या अखंड भागीदारीमुळे टायटन्सने तीन चेंडू राखून तीन बाद १९१ धावा करत विजय मिळवला.

Comments
Add Comment

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत