ड्रग्जमाफियांची तरुणाला बेदम मारहाण

  86

बोईसर (वार्ताहर) : शहरात ड्रग्जमाफियांनी दहशत निर्माण केली आहे. तुरुंगातून सुटून आलेल्या माफियाने एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. भंडारवाडा येथील काही स्थानिकांनी एकत्र येत ड्रग्जमाफियाविरोधात बोईसर पोलिसांत तक्रार दिली होती. या तक्रारीचा राग मनात धरून यातील एका तक्रारदारावर प्राणघातक हल्ला करण्यात आला.


बोईसर शहरात ड्रग्जमाफिया सक्रिय झाल्याने भंडारवाडा येथील नागरिकांनी बोईसर उपविभागीय अधिकारी यांच्याकडे ८ जुलै २०२१ रोजी लेखी तक्रार दाखल केली होती. याचा राग मनात धरून ड्रग्जमाफिया नीलेश सुर्वे व त्याच्या साथीदारांनी मंगळवारी १७ मे २०२२ रोजी मधुर हॉटेलसमोरून जाणाऱ्या तक्रारदार मुबारक खान याला रस्त्यावर अडवून बेदम मारहाण केली.


मुबारकला बळजबरीने दुचाकीवर बसवून त्याला यशवंतसृष्टी येथे रेल्वे धक्याजवळील साईबाबा मंदिर भागात नेले. याठिकाणी पुन्हा मारहाण करून सायंकाळपर्यंत डांबून ठेवले होते. तिथून मुबारकने पळ काढला. मित्राच्या घरी जाऊन त्याच्यासोबत थेट बोईसर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेला असता बोईसर पोलीस स्टेशनमधील काही कर्मचाऱ्यांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याचे मुबारकने सांगितले.


याबाबत काही स्थानिकांनी आवाज उठवल्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे गुन्हा दाखल केला. याप्रकरणी बोईसर उपविभागीय पोलीस अधिकारी नित्यानंद झा यांनी तपास आपल्याकडे घेत आरोपींना तातडीने ताब्यात घेतले. नीलेश सुर्वे, सोनु भोसले, विनोद माने, अन्या, काळु व इतर १० ते १२ अनोळखी इसमांवर बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Comments
Add Comment

पालघर नगर परिषदेचे पैसे ‘पाण्यात’!

२० गावांकडे ७ कोटी थकले पालघर : पालघर नगर परिषदेसह जवळच्या वीस गावांनी गेल्या पंधरा वर्षापासून एकाच योजनेतून

कंत्राटदारांपुढे महापालिका हतबल!

पुन्हा उघडल्या ठोक रकमेच्या निविदा विरार : वसई-विरार महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाची सर्व कामे यापुढे

खड्ड्यातील पाण्यात बुडून तीन मुलांचा मृत्यू

पालघर : खड्ड्यातील पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या तीन मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बोईसर मधील

जिल्ह्यात पेरणीची कामे अंतिम टप्प्यात

सहा हजार हेक्टरवर भातपेरणी, जिल्ह्यात ८९ हजार हेक्टरवर होणार भाताची लागवड अलिबाग  : पावसाळ्याला यंदा मे

आणीबाणी काळ म्हणजे स्वातंत्र्याची दुसरी लढाई !

पालघर: संपूर्ण देशात लोकशाही मजबूत होत असताना २५ जून १९७५ रोजी संविधानाची हत्या करून आणीबाणी लागू केली. या

सूर्या प्रकल्पातून वाढीव पाणी मिळणार नाही

पालघरसह २० गावांना शोधावा लागणार दुसरा पर्याय गणेश पाटील पालघर : पालघर नगर परिषद क्षेत्रासह नजीकच्या २० गावांना