भारत-पाक आज भिडणार

  41

जकार्ता (वृत्तसंस्था) : आशिया कप हॉकी चॅम्पियनशिप स्पर्धेला सोमवारपासून प्रारंभ होत असून पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढतीने स्पर्धेला सुरूवात होणार आहे.


भारताला स्पर्धेतील जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. यापूर्वी २१ डिसेंबर २०२१ मध्ये खेळल्या गेलेल्या आशिया चॅम्पियन ट्रॉफीमध्ये भारताने पाकिस्तानला ४-३ ने पराभूत केले होते. वीरेंद्र लाकडाच्या अनुपस्थितीत भारतीय संघ विजयी सलामी देण्यासाठी उत्सुक आहे, तर ढाकामधील पराभवाचा वचपा काढण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून केला जाईल.


आतापर्यंतच्या आकड्यांवर नजर टाकल्यास पाकिस्तानचा पगडा भारी मानला जात आहे; परंतु या स्पर्धेत किताब जिंकण्यात दोन्ही संघ बरोबरीत आहेत. दोघांनीही तीन-तीन वेळा किताबावर नाव कोरले आहे. भारताने २००३, २००७, २०१७ मध्ये जेतेपदावर नाव कोरले आहे, तर १९८२, १९८५, १९८९, १९९४, २०१३ मध्ये अंतिम सामना गमावला आहे.


भारत आणि पाकिस्तान यांच्यात सोमवारी हॉकीचा १७८वा सामना होणार आहे. आतापर्यंत दोन्ही संघ १७७ वेळा आमने-सामने आले आहेत. त्यातील भारताने ६४ आणि पाकिस्तानने ८२ सामने जिंकले आहेत. ३१ सामने बरोबरीत सुटले आहेत. आशिया कप स्पर्धेत दोन्ही देश ८ वेळा एकमेकांना भिडले आहेत. त्यातील ३ सामने भारताने, तर ५ सामने पाकिस्तानने जिंकले आहेत.

Comments
Add Comment

मुस्लिम असल्याने मला ट्रोल करतात : शमी

मुंबई (प्रतिनिधी) : भारतीय संघातील अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने अगामी आशिया चषकासाठी निवड न झाल्याबद्दल

पीव्ही सिंधू बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या क्वार्टर फायनलमध्ये

पॅरिस : दुहेरी ऑलिंपिक पदक विजेती पीव्ही सिंधूने बीडब्ल्यूएफ बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या क्वार्टर

बंगळुरु चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेच्या तीन महिन्यानंतर आरसीबीची भावुक पोस्ट

नवी दिल्ली :  आयपीएल २०२५ चॅम्पियन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू अखेर सोशल मीडियावर परतले आहे. त्यांनी बंगळुरूमधील

R Ashwin IPL Retirement: आर. अश्विनने आयपीएलला दिला निरोप! म्हटले "प्रत्येक शेवट ही एक..."

चेन्नई: भारतीय ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनने इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. पण

मिस्टर ३६०' एबी डिव्हिलियर्सचे आरसीबीमध्ये पुनरागमनाचे संकेत, पण नव्या भूमिकेत!

बंगळुरू: रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (RCB) संघाचा लाडका खेळाडू, 'मिस्टर ३६०'

Dream11 OUT Team India Sponsorship : ऑनलाइन गेमिंग कायद्याचा फटका; BCCI ला तब्बल ११९ कोटींचा दणका, सरकारच्या निर्णयामुळे Dream११ मागे

मुंबई : भारत सरकारने अलीकडेच ऑनलाइन गेमिंग कायदा लागू केला आहे. या कायद्यानुसार पैशांच्या आधारे खेळल्या