भारत-पाक आज भिडणार

जकार्ता (वृत्तसंस्था) : आशिया कप हॉकी चॅम्पियनशिप स्पर्धेला सोमवारपासून प्रारंभ होत असून पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढतीने स्पर्धेला सुरूवात होणार आहे.


भारताला स्पर्धेतील जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. यापूर्वी २१ डिसेंबर २०२१ मध्ये खेळल्या गेलेल्या आशिया चॅम्पियन ट्रॉफीमध्ये भारताने पाकिस्तानला ४-३ ने पराभूत केले होते. वीरेंद्र लाकडाच्या अनुपस्थितीत भारतीय संघ विजयी सलामी देण्यासाठी उत्सुक आहे, तर ढाकामधील पराभवाचा वचपा काढण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून केला जाईल.


आतापर्यंतच्या आकड्यांवर नजर टाकल्यास पाकिस्तानचा पगडा भारी मानला जात आहे; परंतु या स्पर्धेत किताब जिंकण्यात दोन्ही संघ बरोबरीत आहेत. दोघांनीही तीन-तीन वेळा किताबावर नाव कोरले आहे. भारताने २००३, २००७, २०१७ मध्ये जेतेपदावर नाव कोरले आहे, तर १९८२, १९८५, १९८९, १९९४, २०१३ मध्ये अंतिम सामना गमावला आहे.


भारत आणि पाकिस्तान यांच्यात सोमवारी हॉकीचा १७८वा सामना होणार आहे. आतापर्यंत दोन्ही संघ १७७ वेळा आमने-सामने आले आहेत. त्यातील भारताने ६४ आणि पाकिस्तानने ८२ सामने जिंकले आहेत. ३१ सामने बरोबरीत सुटले आहेत. आशिया कप स्पर्धेत दोन्ही देश ८ वेळा एकमेकांना भिडले आहेत. त्यातील ३ सामने भारताने, तर ५ सामने पाकिस्तानने जिंकले आहेत.

Comments
Add Comment

भारतीय संघातील महाराष्ट्रातील तीन महिला खेळाडूंना बक्षीस जाहीर

मुंबई  : भारतीय महिला क्रिकेट संघाने २०२५ महिला एकदिवसीय विश्वचषक जिंकला. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्त्वाखालील

महिला एकदिवसीय क्रमवारीत लॉरा वुल्फार्ट अव्वल

स्मृती मानधना दुसऱ्या स्थानावर घसरली; जेमिमाची 'टॉप १०' मध्ये दमदार एन्ट्री मुंबई : नुकताच महिला वनडे वर्ल्ड कप

वर्ल्डकप जिंकल्यावर हरमनप्रीतने सोशल मीडियातून दिला 'हा' संदेश

नवी मुंबई : भारतीय महिला संघाने आयसीसी महिला वर्ल्ड कप जिंकत इतिहास रचला आणि भारतीय क्रिकेटचा नवा अध्याय लिहिला.

जगज्जेत्या टीमचे प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांना आवडतो 'हा' पदार्थ

मुंबई : आयसीसी महिला विश्वचषक २०२५ वर भारतानं नाव कोरलं. ही किमया साधण्यासाठी टीम इंडियाला प्रेरित करणे आणि

कपिल देव आणि महेंद्रसिंग धोनीनंतर हरमनप्रीत कौरने रचला इतिहास

नवी मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाने २०२५ च्या आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचा

ICC Worldcup 2025 : भारताच्या लेकींनी विश्वचषक जिंकून इतिहास घडवला! वर्ल्ड कप जिंकून देशवासियांना दिला 'हा' सर्वात मोठा संदेश

नवी मुंबई : नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्पोर्ट्स ॲकॅडमीच्या (DY Patil Sports Academy) रोषणाईत, २ नोव्हेंबर (रविवार) रोजी भारतीय