जकार्ता (वृत्तसंस्था) : आशिया कप हॉकी चॅम्पियनशिप स्पर्धेला सोमवारपासून प्रारंभ होत असून पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढतीने स्पर्धेला सुरूवात होणार आहे.
भारताला स्पर्धेतील जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. यापूर्वी २१ डिसेंबर २०२१ मध्ये खेळल्या गेलेल्या आशिया चॅम्पियन ट्रॉफीमध्ये भारताने पाकिस्तानला ४-३ ने पराभूत केले होते. वीरेंद्र लाकडाच्या अनुपस्थितीत भारतीय संघ विजयी सलामी देण्यासाठी उत्सुक आहे, तर ढाकामधील पराभवाचा वचपा काढण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून केला जाईल.
आतापर्यंतच्या आकड्यांवर नजर टाकल्यास पाकिस्तानचा पगडा भारी मानला जात आहे; परंतु या स्पर्धेत किताब जिंकण्यात दोन्ही संघ बरोबरीत आहेत. दोघांनीही तीन-तीन वेळा किताबावर नाव कोरले आहे. भारताने २००३, २००७, २०१७ मध्ये जेतेपदावर नाव कोरले आहे, तर १९८२, १९८५, १९८९, १९९४, २०१३ मध्ये अंतिम सामना गमावला आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात सोमवारी हॉकीचा १७८वा सामना होणार आहे. आतापर्यंत दोन्ही संघ १७७ वेळा आमने-सामने आले आहेत. त्यातील भारताने ६४ आणि पाकिस्तानने ८२ सामने जिंकले आहेत. ३१ सामने बरोबरीत सुटले आहेत. आशिया कप स्पर्धेत दोन्ही देश ८ वेळा एकमेकांना भिडले आहेत. त्यातील ३ सामने भारताने, तर ५ सामने पाकिस्तानने जिंकले आहेत.
मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…