मुंबईतील ३ जम्बो कोविड सेंटर बंद होणार!

मुंबई (वार्ताहर) : मुंबईत कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी पालिकेने दहा कोविड सेंटर सुरू केले होते. सध्या कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात असल्याने दहिसर, नेस्को व कांजूरमार्ग ही तीन जम्बो कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय मुंबई पालिकेने घेतला आहे. या सेंटरमधील आवश्यक साहित्य पालिकेच्या रुग्णालयात हलवले जाणार आहे. यामुळे नागरिकांना चांगल्या सुविधा देणे शक्य होईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त संजीव कुमार यांनी दिली.


मुंबईत मार्च २०२० मध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर १० जम्बो कोविड सेंटर सुरू करण्यात आली. कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, गॅस व ऑक्सिजनची पाइपलाइन, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, बेड्स आदी साहित्य या कोविड सेंटरमध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. कोरोना काळात याचा रुग्णांना चांगला फायदा झाला. कोट्यवधी रुपये खर्च करून ही सेंटर उभारण्यात आली आहेत. सध्या कोरोना नियंत्रणात आल्याने तीन कोविड सेंटर बंद केली जाणार असून, याबाबतची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.


या सेंटरमधील बेड्स, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, व्हेंटिलेटर आदी साहित्य पालिकेच्या रुग्णालयात वापरले जाणार आहे, तर इतर साहित्य सेव्हन हिल रुग्णालयात साठवले जाणार आहे. पालिकेची नव्याने मोठी रुग्णालये उभारली जाणार आहेत, त्यामध्ये इतर साहित्य वापरले जाणार आहे, अशी माहिती संजीव कुमार यांनी दिली.


तीन कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असला, तरी पालिका सतर्क आहे. कोरोना डोके वर काढण्याचे आव्हान पाहता उर्वरित सात सेंटर स्टॅण्डबाय मोडवर ठेवण्यात येणार आहेत. कानपूर आयआयटीने स्पष्ट केल्यानुसार कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा जोर जुलै ते ऑगस्टदरम्यान येऊ शकतो. म्हणूनच सप्टेंबरपर्यंत कोविड सेंटर सुरू ठेवणार असल्याचे महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

नवी मुंबई विमानतळाचे 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आगामी 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

'नाशिकच्या नव्या रिंग रोड आणि साधूग्रामचे काम लवकर पूर्ण करा'

मुंबई : कुंभमेळा हे श्रद्धा, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ

'राज्यातील सर्व संवर्गातील सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करणार'

मुंबई : राज्य शासनाच्या प्रत्येक संवर्गातील पदे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप मोठ्या प्रमाणात बदल

ओबीसी महामोर्चा दहा ऑक्टोबरलाच होणार

मुंबई (प्रतिनिधी) : सरकारने सकल ओबीसी संघटनांच्या या मागण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने १० ऑक्टोबर रोजी

फास्ट टॅग नसला तरीही नाही भरावा लागणार दुप्पट टोल

मुंबई (प्रतिनिधी) : फास्टटॅग नियमांमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. १५ नोव्हेंबरपासून, जर तुमच्या वाहनात वैध

कुणबीचे चुकीचे दाखले दिल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई

मुंबई (प्रतिनिधी): मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयावरून ओबीसी समाजात निर्माण झालेला संभ्रम