सूर्यफूल बियाणांच्या दरात तिपटीने वाढ

  171

सोलापूर (हिं.स.) खरीप हंगामाला सुरवात होते न होते तोच सूर्यफूल बियाणांचे उत्पादन करणाऱ्या बहुतांश कंपन्यांनी गतवर्षीपेक्षा यंदा बियाणांच्या दरात थेट दीडशे टक्के वाढ केली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. हे बियाणे खरेदी कसे करायचे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. मान्सूनपूर्व पावसाने मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागात समाधानकारकरीत्या हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये गावोगावी सध्या पेरणीची धांदल उडाली आहे.


सूर्यफूल व बाजरीचा पट्टा म्हणून प्रसिद्ध असलेल्या मंगळवेढा दक्षिण भागामध्ये सध्या शेतकरी वर्ग बियाणे शोधत दुकानांमध्ये गर्दी करीत आहे. सूर्यफुलाच्या बियाणे निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी दोन किलोच्या प्रति पिशवी मागे गतवर्षीपेक्षा सरासरी दीडशे टक्के दरवाढ केली आहे. सूर्यफुलाच्या चांगल्या प्रतीच्या वाणची किंमत तीन हजार रुपये प्रति दोन किलो पिशवी अशी झाली आहे.


सूर्यफूल बियाणाचा दर एका क्विंटल साठी दीड लाख रुपये झाला आहे. एका एकरासाठी दोन किलो बियाणे शेतकऱ्याला लागते. त्याला ३ हजार रुपये मोजावे लागतात. एक एकर मशागतिसाठी ४ हजार रूपये, पेरणीसाठी एक हजार, कोळपणीसाठी एक हजार, काढणीस ५ हजार, पिकांना पाणी देण्यास २ हजार रूपये मजुरी असा एकूण १५ ते १६ हजार एकरी खर्च येतो.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या