मातोश्रीसमोर हनुमान चालीसा म्हणायला ती काय मशीद आहे का? - राज ठाकरे

  96

पुणे (हिं.स.) : पुण्यात आज गणेश कला क्रीडा मंच येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा पार पडली. या सभेत ठाकरे यांनी राणा दाम्पत्याचा समाचार घेत निशाणा साधला आहे. मशिदीवरील अनधिकृत भोंगे हटवा ही मागणी आम्ही केल्यानंतर ते राणा दाम्पत्य उठले आणि मातोश्रीसमोर हनुमान चालीसा म्हणायचा हट्ट केला.


अरे मातोश्री समोर हनुमान चालीसा म्हणायला ती काय मशीद आहे का?", असा सवाल करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राणा दाम्पत्याला जोरदार चपराक लगावली. पुण्यात गणेश कला क्रीडा येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा पार पडली. यावेळी त्यांनी भोंग्यांच्या बाबतीतील पुढील आंदोलन, राणा दाम्पत्य, तसेच अयोध्या दौऱ्याला स्थिगिती या सर्वच विषयांवर राज ठाकरे यांनी भाष्य केले.


भोंग्यांच्या बाबतीत मी सांगितले काय की जर मशीदीवरती जोरात बांग दिली तर त्यासमोर जाऊन हनुमान चालिसा लावा. आणि ते राणा दाम्पत्यांने काय केले. मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा पठणाचा हट्ट.. अरे मातोश्री समोर हनुमान चालीसा म्हणायला ती काय मशीद आहे का?", अशा शब्दात राज ठाकरेंनी राणा दाम्पत्याचा समाचार घेतला. हे कोणी केले आणि यानंतर लडाखला संजय राऊत आणि राणा भेटले यावरूनच पहा हे कोणी केलं असं देखील यावेळी ठाकरे म्हणाले.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या