नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना महामारीनंतर जगभरातील बाजारांमध्ये खळबळ उडाली असताना बिकट परिस्थितीत मात करीत आता भारतीय अर्थव्यवस्था झपाट्याने सुधारली असून सर्व बाबतीत सतत पुढे सरसावत आहे. उद्योग आणि बांधकाम क्षेत्रात भारत झपाट्याने प्रगती करत आहे.
त्याचाच परिणाम म्हणून जगातील सर्व प्रसिद्ध कंपन्यांच्या नजरेत भारत ही गुंतवणुकीसाठी सुरक्षित बाजारपेठ बनत आहे. त्यामुळे अनेक मोठ्या कंपन्या अन्य देशांतून आपला व्यवसाय बंद करून भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्नात आहेत. अशातच आता टेक जायंट कंपनी ‘ॲपल’ बाबतची एक मोठी माहिती पुढे आली आहे.
त्यानुसार ‘ॲपल’ चीनमधून आपला गाशा गुंडाळून दुसऱ्या देशात म्हणजेच भारतात येण्याचा विचार करत आहे. आपल्या उत्पादन वाढीसाठी भारत हा एक चांगला पर्याय असल्याचे कंपनीचे मत झाले आहे. भारताला पहिली पसंती- ‘ॲपल’ने त्यांच्या अनेक कंत्राटी उत्पादकांना चीनबाहेर उत्पादन वाढविण्याचे निर्देश दिले आहेत. वॉल स्ट्रीट जर्नलच्या मते, ‘ॲपल’ भारतात आणि व्हिएतनाममध्ये आपला व्यवसाय सुरू करण्याच्या शक्यतांचा विचार व अभ्यास करत असल्याची माहिती आहे.
‘ॲपल’च्या जागतिक उत्पादनात सध्या भारत आणि व्हिएतनामचा वाटा फारच कमी आहे. एका अंदाजानुसार, आयफोन, आयपॅड व मॅकबुक कंप्यूटर यांसारखी ९० टक्के ‘ॲपल’ उत्पादने चीनमध्ये स्वतंत्र उत्पादक तयार करतात.
मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…
शिबानी जोशी जगभरात आज मराठी माणूस पोहोचला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या…
वर्षा फडके - आंधळे जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल…
काश्मीरमध्ये गेले दोन दिवस पावसाने हाहाकार माजवला आहे आणि असे वाटते आहे की, निसर्गाचा कोप…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ. चंद्र राशी…
किमतीचे नवे सूत्र समिती ठरवणार मुंबई : स्वत:च्या हक्काचे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र…