चीनमधील गाशा गुंडाळून ‘ॲपल’ येणार भारतात!

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना महामारीनंतर जगभरातील बाजारांमध्ये खळबळ उडाली असताना बिकट परिस्थितीत मात करीत आता भारतीय अर्थव्यवस्था झपाट्याने सुधारली असून सर्व बाबतीत सतत पुढे सरसावत आहे. उद्योग आणि बांधकाम क्षेत्रात भारत झपाट्याने प्रगती करत आहे.


त्याचाच परिणाम म्हणून जगातील सर्व प्रसिद्ध कंपन्यांच्या नजरेत भारत ही गुंतवणुकीसाठी सुरक्षित बाजारपेठ बनत आहे. त्यामुळे अनेक मोठ्या कंपन्या अन्य देशांतून आपला व्यवसाय बंद करून भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्नात आहेत. अशातच आता टेक जायंट कंपनी ‘ॲपल’ बाबतची एक मोठी माहिती पुढे आली आहे.


त्यानुसार ‘ॲपल’ चीनमधून आपला गाशा गुंडाळून दुसऱ्या देशात म्हणजेच भारतात येण्याचा विचार करत आहे. आपल्या उत्पादन वाढीसाठी भारत हा एक चांगला पर्याय असल्याचे कंपनीचे मत झाले आहे. भारताला पहिली पसंती- ‘ॲपल’ने त्यांच्या अनेक कंत्राटी उत्पादकांना चीनबाहेर उत्पादन वाढविण्याचे निर्देश दिले आहेत. वॉल स्ट्रीट जर्नलच्या मते, ‘ॲपल’ भारतात आणि व्हिएतनाममध्ये आपला व्यवसाय सुरू करण्याच्या शक्यतांचा विचार व अभ्यास करत असल्याची माहिती आहे.


‘ॲपल’च्या जागतिक उत्पादनात सध्या भारत आणि व्हिएतनामचा वाटा फारच कमी आहे. एका अंदाजानुसार, आयफोन, आयपॅड व मॅकबुक कंप्यूटर यांसारखी ९० टक्के ‘ॲपल’ उत्पादने चीनमध्ये स्वतंत्र उत्पादक तयार करतात.

Comments
Add Comment

Maharashtra's Rajya Sabha Seats : महाराष्ट्रातील ७ राज्यसभा जागांची निवडणूक 'बिनविरोध' होणार? शरद पवारांच्या जागेवरही टांगती तलवार

मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत विजयाचा फायदा आता महायुतीला राज्यसभेतही मिळणार

चेन्नईमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव, H5N1 विषाणूमुळे शेकडो कावळे मृत्युमुखी; सरकारकडून महत्त्वाच्या सूचना जारी

चेन्नई: तामिळनाडूची राजधानी चेन्नईत बर्ड फ्लूचा इशारा देण्यात आला आहे. चेन्नईमध्ये शेकडो कावळे मृत आढळले आहेत.

Days In February : फेब्रुवारी महिन्यात 'इतके' दिवस बँका राहणार बंद! राज्यानुसार यादी जाहीर; पहा संपूर्ण वेळापत्रक

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) दरवर्षी बँकांच्या सुट्ट्यांची अधिकृत यादी जाहीर करत असते, ज्यामध्ये देशभरातील सार्वजनिक

Pariksha Pe Charcha 2026: 'परीक्षा पे चर्चा'च्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले विद्यार्थ्यांना 'हे' कानमंत्र

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हणजेच शुक्रवार ६ फेब्रुवारी रोजी 'परीक्षा पे चर्चा' च्या

Meghalaya Coal Mine Blast : मेघालयमध्ये अवैध कोळसा खाणीत भीषण स्फोट, १८ जणांचा बळी, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

शिलाँग : मेघालयातील जयंतिया हिल्स जिल्ह्यातील थांगस्कू परिसरात एका अवैध कोळसा खाणीत झालेल्या भीषण स्फोटाने

UPSC 2026 New Rules: यूपीएससी परीक्षेच्या नियमात महत्वाचे बदल; वाचा संपूर्ण माहिती

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) ४ फेब्रुवारी रोजी नागरी सेवा परीक्षा (CSE) आणि भारतीय वन सेवा (IFS) परीक्षा २०२६ साठी