बालविवाह रोखणे यंत्रणेतील प्रत्येकाची जबाबदारी : लीना बनसोड

Share

नाशिक (प्रतिनिधी) : ग्रामीण भागात बालविवाह रोखण्यासाठी यंत्रणेतील सर्व घटकांनी एकत्र येत काम करावे, अंगणवाडी सेविकांनी किशोरवयीन मुलींचे मेळावे घ्यावे व महिला बचत गटांच्या मासिक सभा, ग्रामसभांमध्ये बालविवाह रोखण्यासाठी प्रबोधन करत लोकसहभागातून बालविवाह थांबवण्यासह बालविवाह करण्याच्या मानसिकतेत बदल घडवून आणण्यासाठी काम करावे, असे आवाहन नाशिक जिल्या परिषदेच्या मुख्य कार्यकारी लीना बनसोड यांनी केले एका बैठकीत केले.

जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात आज महिला व बालकल्याण विभाग आणि युनिसेफ (UNICEF) या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक लीना बनसोड यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी त्या बोलत होत्या. महिला व बालकल्याण विभागाच्या एक मूठ पोषण कार्यक्रम, नवजात बालकांची संख्या व कमी वजनाची बालके, सर्वसाधारण वजनाची बालके त्याचबरोबर बाल आधार नोंदणी यासंदर्भात आढावा घेत या सर्वाच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत चर्चा करण्यात आली.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगावमध्ये साडेचौदा वर्षाची अल्पवयीन मुलगी व साडेवीस वर्षांच्या अल्पवयीन मुलाचा विवाह होणार असल्याचे प्रशासनाला कळाले. यावेळी प्रशासनाने तत्काळ देवगाव येथे विवाहस्थळ गाठत हळदीच्या दिवशी अल्पवयीन मुलगा-मुलगी व दोघांचे कुटुंबीय यांचे समुपदेशन करून हा विवाह थांबवण्यात आला असल्याची माहिती त्र्यंबकेश्वरच्या बालविकास प्रकल्प अधिकारी भारती गेजगे यांनी दिली.

निफाड तालुक्यातल्या तारुखेडले या गावातील १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा विवाह होत असतांना प्रशासनाने वेळीच दखल घेऊन अल्पवयीन मुलीच्या शाळेत जाऊन जन्म तारखेची पडताळणी केली आणि मुलीसह आई -वडिलांचे समुपदेशन करत हाही विवाह बेकायदेशीर असल्याचे लक्षात आणून देत, विवाह झाल्यास गुन्हे दाखल करण्यात येतील, असे सांगत हा विवाह थांबवण्यात आला, अशी माहिती निफाड तालुक्याच्या बालविकास प्रकल्प अधिकारी आरती गांगुर्डे यांनी बैठकीत दिली.

त्याचबरोबर युनिसेफच्या सीमा कानोळे यांनीदेखील बालकांशी निगडित योजना या कशा प्रकारे राबवाव्यात, आंतरराष्ट्रीय पातळीवरील मानांकने यासंदर्भात मार्गदर्शन केले. या बैठकीसाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपक चाटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजीव म्हसकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ, युनिसेफ (UNICEF) कडून सीमा कानोळे आदीसंह सर्व तालुक्यांचे गट विकास अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी उपस्थित होते.

Recent Posts

Jio युजर्सला हवे Unlimited 5G डेटा, इतके रुपयांचा करावा लागेल रिचार्ज

मुंबई: जिओने आपला रिचार्ज पोर्टफोलिए अपडेट केला आहे. कंपनीने सर्व प्लान्सच्या किंमतीत बदल केला आहे.…

51 mins ago

IND vs ZIM: अभिषेक-गायकवाडचे वादळ, आवेश-मुकेशचा कहर, झिम्बाब्वेला १०० धावांनी हरवले

मुंबई: भारताने दुसऱ्या टी-२० सामन्यात झिम्बाब्वेला १०० धावांनी हरवले आहे. यासोबतच टीम इंडियाने पाच सामन्यांच्या…

2 hours ago

१००० कोटीहून अधिक नेटवर्थ…क्रिकेटच नव्हे तर बिझनेसमध्येही हिट धोनी

मुंबई: टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा आज वाढदिवस आहे. कॅप्टन कूल ४३ वर्षांचा झाला…

3 hours ago

Tomato Price Hike : टोमॅटोची ‘लाली’ आणखी वाढणार

नवी दिल्ली : टोमॅटोच्या दरात मोठी (Tomato Price Hike) वाढ झाली आहे. टोमॅटो उत्पादक राज्यांमध्ये…

5 hours ago

Ashadhi Ekadashi : आषाढीमुळे विठुरायाचे व्हीआयपी दर्शन बंद!

दर्शन रांगेतील भाविकांना मोठा दिलासा पंढरपूर : आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) आता जवळ येऊ लागली…

6 hours ago

ग्राहकांची दिशाभूल टाळण्यासाठी FSSAI ची नवी नियमावली!

आता कंपन्यांना द्यावी लागणार मोठ्या अक्षरात माहिती मुंबई : एफएसएसआयचे (FSSAI) अध्यक्ष अपूर्व चंद्र यांच्या…

6 hours ago