वीजचोरांकडून अधिकारी वर्गाची वसुली;

  86

उरण (वार्ताहर) : उरणमध्ये वीजचोरी मोठ्या प्रमाणात होत असून येथील काही अधिकारीवर्गच वीजचोरांना धमकावून त्यांच्याकडून मांडवली करून मालामाल झाले आहेत. वीजचोरही आपले प्रकरण उघड होऊ नये म्हणून मांडवली करून आपली सुटका करत असल्याच्या काही वीजचोरांनी ही धक्कादायक माहिती दिली. याबाबत वरिष्ठ अधिकारी गणेशकर यांच्याकडे येथील अधिकारी वर्गाच्या मालमत्तेच्या चौकशीची मागणी सामाजिक संघटना करणार असल्याचे समजते.


विजेचा वापर वाढल्याने वीजबिलांचा आकडाही फुगत चालला आहे. त्यामुळे यातून सुटका करण्यासाठी वीजचोरीचे प्रमाण वाढले आहे. हाच मोका साधत अधिकारी वर्गाचे पथक रात्रीच्यावेळी फिरत अनेक ठिकाणी वीजचोरी पकडत आहेत. पकडण्यात आलेल्या वीजचोरांना अव्वाच्या सव्वा दंड व बेइज्जत होण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून मोठी रक्कम घेऊन वीजचोरी प्रकरण रफातफर करून मोकळे होत आहेत.


यामुळे वीज मंडळाचा महसूल बुडत असून, अधिकारी वर्ग मालामाल होत आहे. याची लेखी तक्रार वरिष्ठ अधिकारी गणेशकर यांच्याकडे करून उरणमधील अधिकारी वर्गांच्या मालमत्तेची सखोल चौकशी करण्याची मागणी सामाजिक संघटना करणार आहे. अन्यथा वेळ पडल्यास न्यायालयात याचिका दाखल करण्याच्या तयारीत असल्याचे अधिकृत सूत्राकडून समजते.

Comments
Add Comment

निधीच्या प्रतीक्षेत विरार-अलिबाग कॉरिडॉर

एमएसआरडीसी यंत्रणेकडून अद्याप प्रस्तावावर प्रश्नचिन्ह अलिबाग:विसर-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका बांधण्यासाठी

रायगडावर ३५२ वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

रायगड : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५२ वा शिवराज्याभिषेक सोहळा आज (शुक्रवार, ६ जून

पीक कर्जाची मार्चअखेर १०० टक्के उद्दिष्टपूर्ती करा

जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळेंच्या हस्ते जिल्हा पतपुरवठा पुस्तिकेचे

अवकाळीमुळे शेतकरी, मच्छीमार, बागायतदारांचे नुकसान

भरपाईसाठी पावले उचलण्याची शेकापची मागणी अलिबाग : अवकाळी पावसामुळे शेतकरी, मच्छीमार, बागायतदारांचे मोठे नुकसान

अलिबाग नगरपालिकेची हद्द वाढवणार

ग्रामपंचायतींकडे मागविल्या ना-हरकती अलिबाग : रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग नगरपालिकेची हद्द खूपच

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर पाईप गळतीमुळे वाहने घसरण्याचा धोका

पोलादपूर : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ पोलादपूर शहरातून अंडरपास बॉक्सकटींग पद्धतीने भुमिगत झाला