राजस्थानचा ‘प्ले-ऑफ’ प्रवेश यशस्वी

मुंबई (प्रतिनिधी) : यशस्वी जयस्वालची धडाकेबाज सलामी आणि अनुभवी रविचंद्रन अश्वीनच्या अष्टपैलू कामगिरीमुळे शुक्रवारी राजस्थानने चेन्नईवर मात करत ‘प्ले-ऑफ’ मध्ये दिमाखात प्रवेश केला. ओबेद मॅकॉय, युजवेंद्र चहल यांची धावा रोखणारी आणि बळी मिळवणारी गोलंदाजीही राजस्थानच्या विजयात मोलाची ठरली. २० षटकांत १५१ धावांचे लक्ष्य राजस्थानसाठी मोठे नसले तरी त्याचा पाठलाग करताना राजस्थानचा दम निघाला.


जयस्वाल धावा जमविण्यात यशस्वी ठरला असला तरी जोस बटलर, देवदत्त पडिक्कल आणि संजू सॅमसन यांच्या अपयशाने राजस्थानची डोकेदुखी वाढवली. जयस्वालने संघातर्फे सर्वाधिक ५९ धावांचे योगदान दिले. दरम्यान शेमरॉन हेटमायरनेही नाराज केल्याने राजस्थानच्या अडचणीत आणखी वाढ झाली. तळात रविचंद्रन अश्वीनने अनुभव पणाला लावत संघाला आवश्यक असलेली खेळी खेळली. मोक्याच्या क्षणी अश्वीनची खेळी संघाच्या विजयात निर्णायक ठरली. अश्वीनने ४० धावा ठोकत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. १५१ धावांचे लक्ष्य राजस्थानने १९.४ षटकांत पूर्ण केले. ५ विकेट राखून राजस्थानने हा सामना खिशात घातला.


नाणेफेकीचा कौल जिंकून चेन्नईने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रुतुराज गायकवाड आणि देवॉन कॉनवे या सलामीवीरांनी नाराज केल्यानंतर मोईन अलीने फलंदाजीची सूत्रे हाती घेत राजस्थानच्या गोलंदाजांवर आक्रमण केले. दुसऱ्या फलंदाजाकडून साथ मिळाली नसली तरी मोईनने एका बाजूने धावांचा ओघ कायम ठेवला. त्यामुळे दोन फलंदाजांमध्ये भागीदारी झाली नसली तरी चेन्नईचे धावफलक खेळते राहीले. मोईन अलीने ५७ चेंडूंत ९३ धावांची उपयुक्त खेळी खेळली. त्याला धोनीने बरी साथ दिली.


धोनीने २८ चेंडूंत २९ धावांचे योगदान दिले. चेन्नईने २० षटकांत ६ फलंदाजांच्या बदल्यात १५० धावांपर्यंत मजल मारली. मोईन अली आणि धोनी वगळता चेन्नईचे अन्य फलंदाज राजस्थानच्या सापळ्यात झटपट अडकले. ओबेद मॅकॉय, युजवेंद्र चहल आणि रविचंद्रन अश्वीन या गोलंदाजांच्या तिकडीने चेन्नईचा कणाच मोडला. त्यांनी धावा रोखण्यात आणि बळी मिळवण्यातही यश मिळवले. त्यामुळे चेन्नईला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.

Comments
Add Comment

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी गिलकडे नेतृत्व; रोहित शर्माचा खेळाडू म्हणून संघात सहभाग

वनडे आणि टेस्टसाठी शुभमन गिल तर टी २० साठी सूर्यकुमार यादव करणार भारताचे नेतृत्व मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक

IND vs WI: तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडिजचा खेळ खल्लास, भारताचा एक डाव आणि १४० धावांनी विजय

अहमदाबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटीचा निर्णय तिसऱ्याच दिवशी लागला.

IND vs WI: भारताने ४४८वर पहिला डाव केला घोषित, २८६ धावांची घेतली आघाडी

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला तिसऱ्या दिवशी नाट्यमय

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत ध्रुव जुरेलचं पहिलं शतक! 'गन सॅल्यूट' करत केले सेलिब्रेशन

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा युवा यष्टिरक्षक-फलंदाज ध्रुव

IND vs WI: वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताची घट्ट पकड, राहुल, जुरेल आणि जडेजाने ठोकले शतक

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी वेस्ट

IND vs WI: भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा, पहिल्याच दिवशी विंडीजचा संपूर्ण डाव कोसळला

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना अहमदाबादच्या नरेंद्र