राजस्थानचा ‘प्ले-ऑफ’ प्रवेश यशस्वी

  79

मुंबई (प्रतिनिधी) : यशस्वी जयस्वालची धडाकेबाज सलामी आणि अनुभवी रविचंद्रन अश्वीनच्या अष्टपैलू कामगिरीमुळे शुक्रवारी राजस्थानने चेन्नईवर मात करत ‘प्ले-ऑफ’ मध्ये दिमाखात प्रवेश केला. ओबेद मॅकॉय, युजवेंद्र चहल यांची धावा रोखणारी आणि बळी मिळवणारी गोलंदाजीही राजस्थानच्या विजयात मोलाची ठरली. २० षटकांत १५१ धावांचे लक्ष्य राजस्थानसाठी मोठे नसले तरी त्याचा पाठलाग करताना राजस्थानचा दम निघाला.


जयस्वाल धावा जमविण्यात यशस्वी ठरला असला तरी जोस बटलर, देवदत्त पडिक्कल आणि संजू सॅमसन यांच्या अपयशाने राजस्थानची डोकेदुखी वाढवली. जयस्वालने संघातर्फे सर्वाधिक ५९ धावांचे योगदान दिले. दरम्यान शेमरॉन हेटमायरनेही नाराज केल्याने राजस्थानच्या अडचणीत आणखी वाढ झाली. तळात रविचंद्रन अश्वीनने अनुभव पणाला लावत संघाला आवश्यक असलेली खेळी खेळली. मोक्याच्या क्षणी अश्वीनची खेळी संघाच्या विजयात निर्णायक ठरली. अश्वीनने ४० धावा ठोकत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. १५१ धावांचे लक्ष्य राजस्थानने १९.४ षटकांत पूर्ण केले. ५ विकेट राखून राजस्थानने हा सामना खिशात घातला.


नाणेफेकीचा कौल जिंकून चेन्नईने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रुतुराज गायकवाड आणि देवॉन कॉनवे या सलामीवीरांनी नाराज केल्यानंतर मोईन अलीने फलंदाजीची सूत्रे हाती घेत राजस्थानच्या गोलंदाजांवर आक्रमण केले. दुसऱ्या फलंदाजाकडून साथ मिळाली नसली तरी मोईनने एका बाजूने धावांचा ओघ कायम ठेवला. त्यामुळे दोन फलंदाजांमध्ये भागीदारी झाली नसली तरी चेन्नईचे धावफलक खेळते राहीले. मोईन अलीने ५७ चेंडूंत ९३ धावांची उपयुक्त खेळी खेळली. त्याला धोनीने बरी साथ दिली.


धोनीने २८ चेंडूंत २९ धावांचे योगदान दिले. चेन्नईने २० षटकांत ६ फलंदाजांच्या बदल्यात १५० धावांपर्यंत मजल मारली. मोईन अली आणि धोनी वगळता चेन्नईचे अन्य फलंदाज राजस्थानच्या सापळ्यात झटपट अडकले. ओबेद मॅकॉय, युजवेंद्र चहल आणि रविचंद्रन अश्वीन या गोलंदाजांच्या तिकडीने चेन्नईचा कणाच मोडला. त्यांनी धावा रोखण्यात आणि बळी मिळवण्यातही यश मिळवले. त्यामुळे चेन्नईला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.

Comments
Add Comment

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार

इंग्लंडचा दुसऱ्या कसोटीसाठीचा संघ जाहीर, आर्चरचे पुनरागमन

Archer included in England squad for second Test लंडन : इंग्लंड आणि भारत यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला