बांधकाम व्यावसायिकांकडून कांदळवनाचा ऱ्हास

पालघर (वार्ताहर) : चिंचणी- तारापूर सागरी महामार्गालगत दिवसेंदिवस अवैध बांधकामे वाढू लागली आहेत. या बांधकामांसाठी संबंधित मंडळीकडून बांधकाम ठिकाणी असलेल्या तिवरांच्या झाडांची कत्तल सुरू आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने खाड़ी क्षेत्रात अवैध बांधकाम करणारे मोकाट असल्याचे उघड झाले आहे.


चिंचणी- तारापूर मुख्य सागरी महामार्गालगत खाडी क्षेत्रात भराव टाकून बांधकाम करण्याचे काम दिवसेंदिवस वाढत चालले आहे. या खाडी क्षेत्रात कांदळवने असतानाही या अनधिकृत बांधकामांवर महसूल आणि वनविभाग कारवाई करत नसल्याचे दिसून येत आहे. चिंचणी-तारापूर सागरी महामार्गालगत कांदळ वनक्षेत्राशेजारील जागेत भरावासाठी गौण खनिजाचा (मुरूम) उपयोग केला जात आहे. या भरावसाठी लागलेल्या गौण खनिजाचा महसूल भरला आहे की नाही हा संशोधनाचा विषय असला तरीही या आधीही या जागेत मातीचा भराव करण्यात आला होता. तेव्हा गावकऱ्यांनी वेळीच दखल घेऊन वनविभाग आणि महसूल विभाग यांना ही बाब निदर्शनास आणून भराव थांबून वानगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता.


त्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी राखेचा भरावही करण्यात आला होता. आता पुन्हा वर्षभराच्या कालावधीनंतर त्याच जागेत गौण खनिजाचा भराव करून कांदळवनाला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. मागील काही वर्षांपासून खाडी भागात अनधिकृतरीत्या कांदळवनांची कत्तल करून या जागेवर भराव टाकत जोमाने बांधकामे करण्यात येत आहेत. याबाबत संबंधित विभागाकडे विचारणा केली की, या घटनेची चौकशी करून कारवाई करू, असे उत्तर देण्यात येते. मात्र कोणत्याही प्रकारची कारवाई वास्तवात केली जात नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे.


संबंधित खाजण जागेवरती टाकलेल्या भरावाचा पंचनामा करून पुढील कारवाईसाठी वरिष्ठ कार्यालयात अहवाल पाठवण्यात येणार आहे.- ज्योस्पिन गमजा, चिंचणी मंडळ अधिकारी

Comments
Add Comment

वसई स्काय वॉकचा काही भाग कोसळला

वसई : वसई - विरार महानगरपालिका हद्दीत सध्या धोकादायक बांधकामे,उद्यान, नाल्यावरील स्लॅब कोसळण्याचा घटना सतत घडत

पालघरच्या किनाऱ्यावर ३ संशयास्पद कंटेनर आढळले! सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचा इशारा

पालघर: जिल्ह्यातील किनारपट्टी भागात तीन संशयास्पद कंटेनर वाहून आल्याची बातमी समोर येत आहे. महामंडळाचे अधिकारी

Ganeshotsav 2025 : घोणसईत गणपतीबरोबर देशभक्ती! 'ऑपरेशन सिंदूर' देखावा ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू

गणेशोत्सवात देशभक्तीचा संगम – हर्षल पाटील यांचा देखावा ठरत आहे आकर्षणाचा केंद्रबिंदू पालघर : गणेशोत्सव २०२५

विरार इमारत दुर्घटनेत या १७ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये एक वर्षाच्या चिमुरडीचाही समावेश

विरार : विरार पूर्व येथील चामुंडानगरमधील रमाबाई अपार्टमेंट कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू

विरारमधील जुनी इमारत कोसळली, वाढदिवसाच्या कार्यक्रमावर काळजात धस्स करणारी घटना

विरार: गणेशोत्सवाचा आनंद सर्वत्र साजरा होत असताना, मुंबईजवळील विरारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. विरार

बेरोजगार उमेदवारांसाठी इस्राायल येथे रोजगाराची संधी

युवक-युवतींनी लाभ घेण्याचे आवाहन पालघर : महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता