बांधकाम व्यावसायिकांकडून कांदळवनाचा ऱ्हास

पालघर (वार्ताहर) : चिंचणी- तारापूर सागरी महामार्गालगत दिवसेंदिवस अवैध बांधकामे वाढू लागली आहेत. या बांधकामांसाठी संबंधित मंडळीकडून बांधकाम ठिकाणी असलेल्या तिवरांच्या झाडांची कत्तल सुरू आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने खाड़ी क्षेत्रात अवैध बांधकाम करणारे मोकाट असल्याचे उघड झाले आहे.


चिंचणी- तारापूर मुख्य सागरी महामार्गालगत खाडी क्षेत्रात भराव टाकून बांधकाम करण्याचे काम दिवसेंदिवस वाढत चालले आहे. या खाडी क्षेत्रात कांदळवने असतानाही या अनधिकृत बांधकामांवर महसूल आणि वनविभाग कारवाई करत नसल्याचे दिसून येत आहे. चिंचणी-तारापूर सागरी महामार्गालगत कांदळ वनक्षेत्राशेजारील जागेत भरावासाठी गौण खनिजाचा (मुरूम) उपयोग केला जात आहे. या भरावसाठी लागलेल्या गौण खनिजाचा महसूल भरला आहे की नाही हा संशोधनाचा विषय असला तरीही या आधीही या जागेत मातीचा भराव करण्यात आला होता. तेव्हा गावकऱ्यांनी वेळीच दखल घेऊन वनविभाग आणि महसूल विभाग यांना ही बाब निदर्शनास आणून भराव थांबून वानगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता.


त्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी राखेचा भरावही करण्यात आला होता. आता पुन्हा वर्षभराच्या कालावधीनंतर त्याच जागेत गौण खनिजाचा भराव करून कांदळवनाला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. मागील काही वर्षांपासून खाडी भागात अनधिकृतरीत्या कांदळवनांची कत्तल करून या जागेवर भराव टाकत जोमाने बांधकामे करण्यात येत आहेत. याबाबत संबंधित विभागाकडे विचारणा केली की, या घटनेची चौकशी करून कारवाई करू, असे उत्तर देण्यात येते. मात्र कोणत्याही प्रकारची कारवाई वास्तवात केली जात नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे.


संबंधित खाजण जागेवरती टाकलेल्या भरावाचा पंचनामा करून पुढील कारवाईसाठी वरिष्ठ कार्यालयात अहवाल पाठवण्यात येणार आहे.- ज्योस्पिन गमजा, चिंचणी मंडळ अधिकारी

Comments
Add Comment

मच्छीमारांना आता क्यूआर कोडचे ओळखपत्र

हानिकारक मासेमारीवर बंदी नवीन नियमानुसार, एलईडीद्वारे मासे पकडणे, पेयर ट्रॉलिंग आणि बुल ट्रॉलिंगसारख्या

पालघर नगर परिषदेत तिरंगी लढतीची चिन्हे!

मोबिन शेख पालघर : आगामी पालघर नगर परिषद निवडणुकीत राजकीय समीकरणांमध्ये चुरस वाढली असून तिरंगी लढतीचे संकेत

विरार-अलिबाग कॉरिडोरचे काम सुरू होण्याच्या दिशेने एक पाऊल

चार तासांचा प्रवास केवळ दीड तासांत होणार मुंबई  : गेल्या ९ वर्षांपासून रखडलेल्या विरार-अलिबाग कॉरिडोरचे काम

खासदार डॉ. सवरा पालघरचे निवडणूक प्रभारी

आमदार राजन नाईक वसई-विरारचे निवडणूक प्रमुख पालघर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता

विरार-अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिकेच्या भूसंपादनाच्या कर्जास शासन हमी

मुंबई : विरार ते अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिकेच्या भूसंपादनासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला

पालघर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कामास गती देण्यासाठी वॉररुमध्ये हा प्रकल्प घेण्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांचे निर्देश

मुंबई : पालघरमधील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. त्याच्या परिसरातील