बांधकाम व्यावसायिकांकडून कांदळवनाचा ऱ्हास

पालघर (वार्ताहर) : चिंचणी- तारापूर सागरी महामार्गालगत दिवसेंदिवस अवैध बांधकामे वाढू लागली आहेत. या बांधकामांसाठी संबंधित मंडळीकडून बांधकाम ठिकाणी असलेल्या तिवरांच्या झाडांची कत्तल सुरू आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने खाड़ी क्षेत्रात अवैध बांधकाम करणारे मोकाट असल्याचे उघड झाले आहे.


चिंचणी- तारापूर मुख्य सागरी महामार्गालगत खाडी क्षेत्रात भराव टाकून बांधकाम करण्याचे काम दिवसेंदिवस वाढत चालले आहे. या खाडी क्षेत्रात कांदळवने असतानाही या अनधिकृत बांधकामांवर महसूल आणि वनविभाग कारवाई करत नसल्याचे दिसून येत आहे. चिंचणी-तारापूर सागरी महामार्गालगत कांदळ वनक्षेत्राशेजारील जागेत भरावासाठी गौण खनिजाचा (मुरूम) उपयोग केला जात आहे. या भरावसाठी लागलेल्या गौण खनिजाचा महसूल भरला आहे की नाही हा संशोधनाचा विषय असला तरीही या आधीही या जागेत मातीचा भराव करण्यात आला होता. तेव्हा गावकऱ्यांनी वेळीच दखल घेऊन वनविभाग आणि महसूल विभाग यांना ही बाब निदर्शनास आणून भराव थांबून वानगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता.


त्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी राखेचा भरावही करण्यात आला होता. आता पुन्हा वर्षभराच्या कालावधीनंतर त्याच जागेत गौण खनिजाचा भराव करून कांदळवनाला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. मागील काही वर्षांपासून खाडी भागात अनधिकृतरीत्या कांदळवनांची कत्तल करून या जागेवर भराव टाकत जोमाने बांधकामे करण्यात येत आहेत. याबाबत संबंधित विभागाकडे विचारणा केली की, या घटनेची चौकशी करून कारवाई करू, असे उत्तर देण्यात येते. मात्र कोणत्याही प्रकारची कारवाई वास्तवात केली जात नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे.


संबंधित खाजण जागेवरती टाकलेल्या भरावाचा पंचनामा करून पुढील कारवाईसाठी वरिष्ठ कार्यालयात अहवाल पाठवण्यात येणार आहे.- ज्योस्पिन गमजा, चिंचणी मंडळ अधिकारी

Comments
Add Comment

जव्हारमध्ये बनावट धनादेश प्रकरणातील आरोपींना पुन्हा पोलीस कोठडी

पालघर : सार्वजनिक बांधकाम विभाग, जव्हार कार्यालयातील बनावट धनादेश प्रकरणात अटक केलेल्या आरोपींना पुन्हा पोलीस

बविआतून आलेल्यांना तिकीट देऊ नका

भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांचा नेतृत्वाला इशारा विरार : महानगरपालिकेच्या सत्तेसाठी बहुजन विकास आघाडीतून (बविआ)

नगराध्यक्ष हरले, मात्र जिल्हाध्यक्ष जिंकले

जिल्ह्यात भाजपचे ९४ पैकी ५० नगरसेवक गणेश पाटील पालघर: पालघर जिल्ह्यात तीन नगर परिषद आणि एका नगरपंचायतीच्या

भाजप नेत्यांचे ‘रायगड’वर विचारमंथन

टिळक भवनात आज काँग्रेसची खलबते वसई : वसई-विरार महापालिकेच्या निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया

मच्छीमारांच्या सर्वांगीण सर्वेक्षणाला गती

वाढवण बंदर प्रकल्प: जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार पालघर : प्रस्तावित वाढवण बंदर प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या

कुडूसला स्वतंत्र पोलीस ठाण्याचा दर्जा

५२ गावांच्या सुरक्षिततेसाठी गृहविभागाची मंजुरी वाडा : वाडा तालुक्यातील औद्योगिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण आणि ५२