Categories: ठाणे

ठाण्यात कोरोनाच्या रुग्णांत वाढ

Share

ठाणे (प्रतिनिधी) : ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून काही अंशी वाढ होत असल्याचे दिसून आल्याने जिल्हा आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून पालिका क्षेत्र त्याच प्रमाणे ग्रामीण क्षेत्रात १० हजार लिटर क्षमतेच्या १४ प्राणवायूंच्या टाक्यांची सोय करण्यात आली असून आरोग्य आणीबाणीच्या प्रसंगी या टाक्या मुबलक प्राणवायूची निकड पूर्ण करतील, असा विश्वास जिल्हा आरोग्य विभागाला आहे.

जिल्ह्यातील कोरोना रुग्णालयांना सज्जतेचे आदेश देण्यात आले असून अतिदक्षता विभागांतील खाटांची संख्या वाढवण्याचे काम जिल्हा आरोग्य यंत्रणेने सुरू केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव अचानक वाढल्यास मोठ्या प्रमाणावर प्राणवायूची गरज लागू शकते म्हणून मोठ्या प्रमाणावर प्राण वायूची उपलब्धता करून ठेवण्यात येत आहे.

फेब्रुवारीनंतर कोरोनाच्या रुग्ण संख्येत कमालीची घट झाली होती. एप्रिल महिन्यात अवघ्या २६९ बाधित रुग्णांची नोंद झाल्याचे आकडेवारीनुसार दिसून येत आहे. परंतु मागील १२ दिवसांची आकडेवारी काळजी वाढवणारी आहे. या कालावधीत २५० रुग्णांच्या आसपास बाधित रुग्णांची नोंद झाली आहे.

कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येताच खबरदारीचा उपाय म्हणून प्राणवायू त्याचप्रमाणे बालक आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी खाटांचे नियोजन करण्यास आरोग्य यंत्रणेने सुरुवात केली आहे. निर्बंध शिथिल झाले असले तरी कोरोनाला अटकाव करायचा असेल तर नागरिकांनी सजग असणे आवश्यक आहे. कोरोना नियंत्रणासाठी सर्वांनी दक्ष राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Recent Posts

पुस्तकांचे पालकत्व

गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…

5 hours ago

बाल गुन्हेगार कसे तयार होतात?

फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…

5 hours ago

कुरुंदकरला जन्मठेप; खाकी वर्दीवर काळा डाग

महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…

6 hours ago

LSG vs DC, IPL 2025: के एल राहुलची तडाखेबंद खेळी, दिल्लीचा लखनऊवर ८ विकेटनी विजय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…

7 hours ago

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

8 hours ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

8 hours ago