ठाण्यात कोरोनाच्या रुग्णांत वाढ

  70

ठाणे (प्रतिनिधी) : ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून काही अंशी वाढ होत असल्याचे दिसून आल्याने जिल्हा आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून पालिका क्षेत्र त्याच प्रमाणे ग्रामीण क्षेत्रात १० हजार लिटर क्षमतेच्या १४ प्राणवायूंच्या टाक्यांची सोय करण्यात आली असून आरोग्य आणीबाणीच्या प्रसंगी या टाक्या मुबलक प्राणवायूची निकड पूर्ण करतील, असा विश्वास जिल्हा आरोग्य विभागाला आहे.


जिल्ह्यातील कोरोना रुग्णालयांना सज्जतेचे आदेश देण्यात आले असून अतिदक्षता विभागांतील खाटांची संख्या वाढवण्याचे काम जिल्हा आरोग्य यंत्रणेने सुरू केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव अचानक वाढल्यास मोठ्या प्रमाणावर प्राणवायूची गरज लागू शकते म्हणून मोठ्या प्रमाणावर प्राण वायूची उपलब्धता करून ठेवण्यात येत आहे.


फेब्रुवारीनंतर कोरोनाच्या रुग्ण संख्येत कमालीची घट झाली होती. एप्रिल महिन्यात अवघ्या २६९ बाधित रुग्णांची नोंद झाल्याचे आकडेवारीनुसार दिसून येत आहे. परंतु मागील १२ दिवसांची आकडेवारी काळजी वाढवणारी आहे. या कालावधीत २५० रुग्णांच्या आसपास बाधित रुग्णांची नोंद झाली आहे.


कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येताच खबरदारीचा उपाय म्हणून प्राणवायू त्याचप्रमाणे बालक आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी खाटांचे नियोजन करण्यास आरोग्य यंत्रणेने सुरुवात केली आहे. निर्बंध शिथिल झाले असले तरी कोरोनाला अटकाव करायचा असेल तर नागरिकांनी सजग असणे आवश्यक आहे. कोरोना नियंत्रणासाठी सर्वांनी दक्ष राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Comments
Add Comment

उबाठा गटाचे माजी नगरसेवक रामदास कांबळे यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश

रामदास कांबळे यांची युवासेना कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती जाहीर ठाणे: मुंबई महानगरपालिकेतील सायन कोळीवाडा

भारत महासत्ता न होण्यासाठी तरुणाईला अंमली पदार्थांच्या आहारी लोटण्याचा परकीय शक्तींचा डाव

आयआरएस समीर वानखेडे यांचे वक्तव्य कल्याण  : ''आपला भारत देश हा महासत्ता होण्याच्या दिशेने अतिशय विश्वासाने आणि

पोलीस अधिकारी संभाजी देशमुख यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पोलीस पदक

कल्याण : पोलीस दलात केलेल्या उल्लेखनीय कामगीरीमुळे राज्य गुप्त वार्ता विभागातील पोलीस अधिकारी संभाजी देशमुख

ठाणेकरांनो, पाण्याचा जपून वापरा करा

मंगळवारी ८ तास पाणीपुरवठा बंद डोंबिवली  : केडीएमसीच्या कल्याण (पूर्व) परिसरातील पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेतील

श्रीकृष्णनाथ पांचाळ ठाण्याचे जिल्हाधिकारी

मुंबई : जालन्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ यांची महाराष्ट्र सरकारने बदली केली असून ठाण्याचे

मध्य रेल्वेची ऐन सकाळी ठप्प झालेली वाहतूक सुरळीत, रेल्वे रुळाला तडे गेल्याने नोकरदारांचे झाले हाल

कर्जत: मध्य रेल्वेची लोकल वाहतूक आज सकाळी काही तासांसाठी विस्कळीत झालेली पाहायला मिळाली. पण रेल्वे प्रशासनाच्या