पारस सहाणे
जव्हार : जव्हार आणि मोखाडा तालुक्यातील आदिवासी अतिदुर्गम भागात पावसाळ्यामध्ये विजेची समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवते. आदिवासी जनतेची विजेची समस्या दूर व्हावी या उद्देशाने जव्हारमधील जामसर येथे १३२/३३ केव्ही बोराळे व खोडाळा येथील २२ केव्ही उपकेंद्राची निर्मिती करण्यात आली. मात्र तेथील कामे अद्याप अपूर्ण आहेत. बोराळे येथे महा पारेषण कंपनीने सुमारे २१ कोटी रुपये खर्च करुन १३२ केव्ही विद्युतपुरवठा क्षमतेचे केंद्र सप्टेंबर २०१९ मध्ये तयार केले. मात्र ते तसेच धूळखात पडले आहे. आजतागायत तिथून कार्य सुरू झालेले नाही.
जव्हार व मोखाडा तालुक्यातील नव्याने बांधलेले विद्युत उपकेंद्र चालू करून नागरिकांची समस्या सोडवावी, याबाबत मोखाडा पंचायत समितीचे सदस्य प्रदीप वाघ यांनी राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना निवेदन दिले आहे.
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात डहाळेवाडी येथे दीनदयाळ ग्रामीण ज्योती अंतर्गत नवीन ३३/११ केव्ही विद्युत उपकेंद्राच्या उद्घाटनाला ऊर्जामंत्री राऊत आले होते. वाघ यांनी निवेदनांबाबत माहिती दिल्यानंतर जव्हार, मोखाडा भागातील वीजसमस्या सोडविण्यासाठी अधिकारी वर्गाला सूचना देण्यात येतील, असे आश्वासन दिले आहे. तसेच अपूर्ण असलेली कामे त्वरित पूर्ण करण्याचे निर्देशही देणार असल्याचे ऊर्जामंत्री राऊत यांनी वाघ यांना सांगितले.
परवानग्यांचा अडथळा…
जव्हार तालुक्यातील विजेची समस्या सोडवण्यासाठी तत्कालीन पालकमंत्री विष्णु सवरा यांनी प्रयत्न केले. मात्र उभारलेल्या उपकेंद्राला ठेकेदार मिळत नाही, तर कधी वनविभागाच्या परवानग्या मिळाल्या नसल्याचे अधिकारी सांगतात. पाच वर्षे होऊन गेली मात्र जव्हार तालुक्याला मोठ्या क्षमतेच्या केंद्रातून वीजपुरवठा होऊ शकला नाही.
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…