जव्हार, मोखाड्यातील विद्युत सबस्टेशन कधी होणार सुरू

  106


  • पाच वर्षांपासून १३२ केव्ही केंद्रातून वीजपुरवठा नाहीच

  • तब्बल २१ कोटींचा खर्च, समस्या सोडविण्याचे ऊर्जामंत्र्यांचे आश्वासन


पारस सहाणे


जव्हार : जव्हार आणि मोखाडा तालुक्यातील आदिवासी अतिदुर्गम भागात पावसाळ्यामध्ये विजेची समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवते. आदिवासी जनतेची विजेची समस्या दूर व्हावी या उद्देशाने जव्हारमधील जामसर येथे १३२/३३ केव्ही बोराळे व खोडाळा येथील २२ केव्ही उपकेंद्राची निर्मिती करण्यात आली. मात्र तेथील कामे अद्याप अपूर्ण आहेत. बोराळे येथे महा पारेषण कंपनीने सुमारे २१ कोटी रुपये खर्च करुन १३२ केव्ही विद्युतपुरवठा क्षमतेचे केंद्र सप्टेंबर २०१९ मध्ये तयार केले. मात्र ते तसेच धूळखात पडले आहे. आजतागायत तिथून कार्य सुरू झालेले नाही.


जव्हार व मोखाडा तालुक्यातील नव्याने बांधलेले विद्युत उपकेंद्र चालू करून नागरिकांची समस्या सोडवावी, याबाबत मोखाडा पंचायत समितीचे सदस्य प्रदीप वाघ यांनी राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना निवेदन दिले आहे.


नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात डहाळेवाडी येथे दीनदयाळ ग्रामीण ज्योती अंतर्गत नवीन ३३/११ केव्ही विद्युत उपकेंद्राच्या उद्घाटनाला ऊर्जामंत्री राऊत आले होते. वाघ यांनी निवेदनांबाबत माहिती दिल्यानंतर जव्हार, मोखाडा भागातील वीजसमस्या सोडविण्यासाठी अधिकारी वर्गाला सूचना देण्यात येतील, असे आश्वासन दिले आहे. तसेच अपूर्ण असलेली कामे त्वरित पूर्ण करण्याचे निर्देशही देणार असल्याचे ऊर्जामंत्री राऊत यांनी वाघ यांना सांगितले.


परवानग्यांचा अडथळा...


जव्हार तालुक्यातील विजेची समस्या सोडवण्यासाठी तत्कालीन पालकमंत्री विष्णु सवरा यांनी प्रयत्न केले. मात्र उभारलेल्या उपकेंद्राला ठेकेदार मिळत नाही, तर कधी वनविभागाच्या परवानग्या मिळाल्या नसल्याचे अधिकारी सांगतात. पाच वर्षे होऊन गेली मात्र जव्हार तालुक्याला मोठ्या क्षमतेच्या केंद्रातून वीजपुरवठा होऊ शकला नाही.

Comments
Add Comment

लाडक्या बहिणींच्या प्रवासाचा चढता आलेख !

५ दिवसांत १ लाख ३१ हजार महिलांचा प्रवास विरार : वसई-विरार महानगरपालिकेने १ जूनपासून मनपाच्या परिवहन सेवेत

४० हजार पशुधनासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा

जून महिन्यातही पाणीटंचाई कायम पालघर : जिल्ह्यातील मोखाडा, वाडा, जव्हार आणि विक्रमगड तालुक्यातील पाणीटंचाई जून

नुकसानग्रस्तांसाठी मिळाला पाऊणे दोन कोंटीचा निधी

पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्याला यश पालघर : अवकाळी पावसामुळे पालघर जिल्ह्यातील घरे, शेती, फळशेती, मत्स्य

युवक ठरला नियोजनशून्य व्यवस्थेचा बळी!

दुसऱ्याची चूक जयेशच्या जीवावर बेतली विरार: विजेच्या धक्क्याने अर्नाळा येथे मृत्यू झालेल्या जयेश घरत हा केवळ

५० लाख बांबू वृक्ष लागवडीचा शुभारंभ

भातशेतीपेक्षा बांबूशेती करण्याचे आवाहन पालघर : संपूर्ण विश्वभरात जागतिक पर्यावरण दिन साजरा होत असताना दुर्गम

घरकुलासाठी ९१,९९१ कुटुंबाचे सर्वेक्षण !

१८ जूनपर्यंत आणखी मुदतवाढ; नागरिकांना मिळणार हक्काचे घर पालघर : "सर्वांसाठी घरे" शासनाच्या या धोरणाची यशस्वी