लोकांच्या बोलण्याकडे लक्षही देत नाही -विराट कोहली

मुंबई (वृत्तसंस्था) : भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली सध्या खराब फॉर्ममधून जात आहे. त्यामुळे त्याच्यावर अनेकांकडून टीका होत आहे. दरम्यान विराटने पहिल्यांदाच यावर आपले मत व्यक्त केले आहे. विराटने सर्व टीकाकारांना एका वाक्यात उत्तर दिले आहे. 'मी अशा वेळी टीव्हीचा आवाज बंद करतो, तसंच अशा लोकांच्या बोलण्याकडे लक्षही देत नाही.' विराटने अशा प्रकारे एका वाक्यात उत्तर देत सर्व टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले आहे.


आरसीबीच्या एका सोशल मीडियावरील एका मनोरंजन व्हिडीओमध्ये विराटची मुलाखत घेण्यात आली. यावेळी विराटला खराब फॉर्मबद्दल विचारण्यात आले. तेव्हा विराट म्हणाला, ''मी अशावेळी टीव्हीचा आवाज बंद करतो, तसेच अशा लोकांच्या बोलण्याकडे लक्षही देत नाही.'' विराटने अशा प्रकारे एका वाक्यात उत्तर देत सर्व टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले आहे.


अव्वल दर्जाचा क्रिकेटपटू विराट कोहली गेल्या काही काळापासून खराब फॉर्ममध्ये दिसत आहे. ७० शतके लगावणाऱ्या विराटने २०१९ नंतर एकही शतक लगावलेले नाही. त्यात सध्या सुरू असलेल्या आयपीएल २०२२ मध्येही विराट खास कामगिरी करत नाहीये. आतापर्यंत त्याने १२ सामन्यांत २१६ धावा करत केवळ एक अर्धशतक झळकावले आहे. दरम्यान या त्याच्या खराब फॉर्मवर सर्व स्तरातून टीका होत असताना विराटने पहिल्यांदाच यावर आपले मत व्यक्त केले आहे.

Comments
Add Comment

Yuzvendra Chahal-Dhanshree Verma :घटस्फोटानंतर पुन्हा एकत्र येणार ? चहल म्हणाला..

Yuzvendra Chahal-Dhanshree Verma : भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि चहलची पुर्व पत्नी हे ईनफ्लुन्सर धनश्री वर्मा हे दोघेजन पुन्हा

मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर दुटप्पी!

मोहम्मद कैफ याचे संघ व्यवस्थापनावरही गंभीर आरोप नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय

मुंबई इंडिन्सचा गुजरात जायंट्सवर सात बळी राखून विजय

कर्णधार हरमनप्रित कौरची आक्रमक खेळी नवी मुंबई : विजयासाठी १९३ धावांचे आव्हान घेवून मैदानात उतरलेल्या मुंबई

शिखर धवनच्या आयुष्यात नवी इनिंग! सोफी शाइनसोबत उरकला साखरपुडा

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर शिखर धवनने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा गाठत

आयसीसी क्रमवारीतील अव्वल स्थानाकडे विराट कोहलीची वाटचाल

वडोदरा : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानाला आता धोका

महिला प्रीमियर लीग: हरमनप्रीत-सायव्हरचा झंझावात

मुंबई इंडियन्सचा दिल्ली कॅपिटल्सवर ५० धावांनी विजय मुंबई : वानखेडे स्टेडियमवर महिला प्रीमियर लीगच्या तीसऱ्या