मुंबई (वृत्तसंस्था) : भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली सध्या खराब फॉर्ममधून जात आहे. त्यामुळे त्याच्यावर अनेकांकडून टीका होत आहे. दरम्यान विराटने पहिल्यांदाच यावर आपले मत व्यक्त केले आहे. विराटने सर्व टीकाकारांना एका वाक्यात उत्तर दिले आहे. ‘मी अशा वेळी टीव्हीचा आवाज बंद करतो, तसंच अशा लोकांच्या बोलण्याकडे लक्षही देत नाही.’ विराटने अशा प्रकारे एका वाक्यात उत्तर देत सर्व टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले आहे.
आरसीबीच्या एका सोशल मीडियावरील एका मनोरंजन व्हिडीओमध्ये विराटची मुलाखत घेण्यात आली. यावेळी विराटला खराब फॉर्मबद्दल विचारण्यात आले. तेव्हा विराट म्हणाला, ”मी अशावेळी टीव्हीचा आवाज बंद करतो, तसेच अशा लोकांच्या बोलण्याकडे लक्षही देत नाही.” विराटने अशा प्रकारे एका वाक्यात उत्तर देत सर्व टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले आहे.
अव्वल दर्जाचा क्रिकेटपटू विराट कोहली गेल्या काही काळापासून खराब फॉर्ममध्ये दिसत आहे. ७० शतके लगावणाऱ्या विराटने २०१९ नंतर एकही शतक लगावलेले नाही. त्यात सध्या सुरू असलेल्या आयपीएल २०२२ मध्येही विराट खास कामगिरी करत नाहीये. आतापर्यंत त्याने १२ सामन्यांत २१६ धावा करत केवळ एक अर्धशतक झळकावले आहे. दरम्यान या त्याच्या खराब फॉर्मवर सर्व स्तरातून टीका होत असताना विराटने पहिल्यांदाच यावर आपले मत व्यक्त केले आहे.
मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या…
पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…
पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…
डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…
अर्चना सोंडे जगात ज्या काही दुर्मीळ आदिवासी जमाती आहेत. ज्यांचे पृथ्वीवरील अस्तित्व संपल्यात जमा झाले…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण सप्तमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग सिद्ध. चंद्र राशी…