लोकांच्या बोलण्याकडे लक्षही देत नाही -विराट कोहली

मुंबई (वृत्तसंस्था) : भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली सध्या खराब फॉर्ममधून जात आहे. त्यामुळे त्याच्यावर अनेकांकडून टीका होत आहे. दरम्यान विराटने पहिल्यांदाच यावर आपले मत व्यक्त केले आहे. विराटने सर्व टीकाकारांना एका वाक्यात उत्तर दिले आहे. 'मी अशा वेळी टीव्हीचा आवाज बंद करतो, तसंच अशा लोकांच्या बोलण्याकडे लक्षही देत नाही.' विराटने अशा प्रकारे एका वाक्यात उत्तर देत सर्व टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले आहे.


आरसीबीच्या एका सोशल मीडियावरील एका मनोरंजन व्हिडीओमध्ये विराटची मुलाखत घेण्यात आली. यावेळी विराटला खराब फॉर्मबद्दल विचारण्यात आले. तेव्हा विराट म्हणाला, ''मी अशावेळी टीव्हीचा आवाज बंद करतो, तसेच अशा लोकांच्या बोलण्याकडे लक्षही देत नाही.'' विराटने अशा प्रकारे एका वाक्यात उत्तर देत सर्व टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले आहे.


अव्वल दर्जाचा क्रिकेटपटू विराट कोहली गेल्या काही काळापासून खराब फॉर्ममध्ये दिसत आहे. ७० शतके लगावणाऱ्या विराटने २०१९ नंतर एकही शतक लगावलेले नाही. त्यात सध्या सुरू असलेल्या आयपीएल २०२२ मध्येही विराट खास कामगिरी करत नाहीये. आतापर्यंत त्याने १२ सामन्यांत २१६ धावा करत केवळ एक अर्धशतक झळकावले आहे. दरम्यान या त्याच्या खराब फॉर्मवर सर्व स्तरातून टीका होत असताना विराटने पहिल्यांदाच यावर आपले मत व्यक्त केले आहे.

Comments
Add Comment

विराटचा दोन डावातील सलग ११ शतकांचा विक्रम

मुंबई  :  विराट कोहलीने त्याचे ५३वे एकदिवसीय शतक झळकावले आहे. रायपूरमध्ये सुरू असलेल्या दक्षिण

आयसीसी क्रमवारीत कोहलीची विराट भरारी

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेदरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकतीच

दक्षिण आफ्रिकेच्या टी - २० मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर

फिटनेसवर ठरणार शुभमन गिलचा निर्णय नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेच्या टी-२० मालिकेसाठी आता भारताचा संघ जाहीर

एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने साधली बरोबरी

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना दक्षिण

रायपूर ODI : द. आफ्रिकेपुढे ३५९ धावांचे लक्ष्य

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना

रायपूरमध्ये होणार भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना

रायपूर: दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा रांचीतील पहिला सामना जिंकून भारतीय संघाने एकदिवसीय मालिकेची दमदार सुरुवात