रेल्वेत पुन्हा मास्क वापरणे बंधनकारक

नवी दिल्ली (हिं.स.) : कोरोना साथरोगाच्या संभाव्य चौथ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन रेल्वेने प्रवासादरम्यान मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. रेल्वेचे कार्यकारी संचालक नीरज शर्मा यांनी यासंदर्भात ९ मे रोजी परिपत्रक जारी केलेय.


नीरज शर्मा यांनी जारी केलेल्या पत्रानुसार, प्रवाशांना मास्क घातल्यानंतरच स्थानकात प्रवेश दिला जाणार आहे. त्यशिवाय ट्रेनमधून प्रवास करताना प्रत्येक प्रवाशाला मास्क घालणे अनिवार्य असणार आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णसंख्येत झालेली घट लक्षात घेता इतर गोष्टींप्रमाणे रेल्वेची सेवादेखील पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली होती.


तसेच अनेक निर्बंधदेखील रेल्वेतर्फे शिथील करण्यात आले होते. त्यानंतर अनेकांनी मास्कसक्ती नसल्याने प्रवासादरम्यान मास्क परिधान करणे बंद केले होते. मात्र, आता पुन्हा देशातील काही भागात कोरोनाचे रूग्ण वाढू लागले आहे. तसेच आगामी काळात कोरोनोची चौथी लाट येऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.


त्यापार्श्वभूमीवर आता रेल्वेने पुन्हा स्थानकांवर येणाऱ्या प्रवाशांना आणि ट्रेनमधून प्रवास करणाऱ्यांना मास्क घालणे बंधनकारक केले आहे.

Comments
Add Comment

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे

पंतप्रधान मोदी शुक्रवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त देशवासियांना संबोधित करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त देशवासियांना

Magh Mela 2026 : जणू महाकुंभच! हा केवळ माघ मेळा नाही, तर... प्रयागराजमध्ये भाविकांच्या अलोट गर्दीने मोडले सर्व जुने विक्रम; पाय ठेवायलाही जागा मिळेना

प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील पवित्र त्रिवेणी संगमावर सुरू असलेल्या 'माघ मेळ्या'ने यंदा गर्दीचे

Andhra Pradesh Train Accident : आंध्र प्रदेशात रेल्वे अपघात! नेल्लोरमध्ये मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले; रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता

नेल्लोर : आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातून रेल्वे अपघाताची एक मोठी बातमी समोर येत आहे. येथे एका धावत्या

Street Dogs: भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांवर सर्वोच्च न्यायालयाचा कडक निर्णय, खाऊ घालणाऱ्यांनाही जबाबदार ठरवणार

नवी दिल्ली: देशभरात रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचे हल्ल्याचे प्रकरण वाढताना दिसत आहेत यावर सर्वोच्च