कसोटी क्रिकेटचे भविष्य धोक्यात; युवराज सिंहने मांडले मत

मुंबई (वार्ताहर) : कसोटी क्रिकेटचे भविष्य धोक्यात असल्याची चर्चा मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात होत आहे. दरम्यान भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंहनेही टी-२० क्रिकेटमुळे कसोटी क्रिकेट धोक्यात असल्याचे म्हटले आहे.


युवराज सिंह म्हणाला की, सध्याचे क्रिकेटप्रेमी टी-२० क्रिकेटला अधिक पसंत करत आहेत. त्यामुळे कसोटी क्रिकेटमधील रोमांच कमी होत आहे. आजकाल अनेकांना टी-२० क्रिकेट खेळणे आणि पाहणे अधिक आवडते. त्यात टी-२० क्रिकेट सामन्यांमध्ये पैसाही मोठ्या प्रमाणात मिळत असल्याने अधिक क्रिकेटर्स या क्रिकेट फॉर्मेटमध्ये अधिक रस घेत आहेत. कसोटी आणि टी-२० ची तुलना करताना का कोणता खेळाडू ५ लाखांसाठी ५ दिवस खेळणे पसंत करेल असेही युवराज म्हणाला.


युवराज सिंह पुढे म्हणाला की, सद्यस्थितीला सर्व दिग्गज खेळाडू जे भलेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळत नाहीत, पण टी-२० क्रिकेट खेळून कोट्यवधी कमावत आहेत. कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या अनेक देशांची स्वत:ची टी-२० लीग देखील आहे. युवराजच्या मते ज्या वेगाने टी-२० क्रिकेट वाढत आहे.

Comments
Add Comment

ICC ODI Rankings: कोहलीचा अव्वल सिंहासनावरून पायउतार, डॅरिल मिशेल नंबर-वन

ICC ODI Rankings : आयसीसी वनडे क्रमवारीत मोठा आणि मनाला वेदना देणारा बदल पाहायला मिळाला असून भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी

ड्रीम-११ आणि माय-११ नंतर गुगलचा बीसीसीआयला आधार

मुंबई : बीसीसीआय पूर्वी ऑनलाइन गेमिंग कंपन्यांकडून भरपूर उत्पन्न मिळवत होते. मात्र आता अशावेळी बोर्ड हे नुकसान

बॅडमिंटनपटू सायना नेहवालची निवृत्ती

गुडघ्याच्या दुखापतीने कारकिर्दीला पूर्णविराम मुंबई : भारतीय बॅडमिंटनला जागतिक नकाशावर मानाचे स्थान मिळवून

‘ए+’ श्रेणीतून विराट, रोहित, बुमराहला डच्चू?

बीसीसीआयच्या करारात ट्विस्ट : मानधनात कपात होण्याची शक्यता नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर

विश्वचषकापूर्वी भारतीय संघाची परीक्षा

नागपुरात आज न्यूझीलंडविरुद्ध पहिली टी-२० लढत ; पांड्या, बुमराह, श्रेयसवर लक्ष नागपूर : न्यूझीलंडविरुद्धच्या

कर्णधार सूर्यकुमार यादव गाठणार ‘शतकी’ टप्पा

नागपूर : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेचा थरार बुधवारपासून नागपूरच्या विदर्भ