कसोटी क्रिकेटचे भविष्य धोक्यात; युवराज सिंहने मांडले मत

मुंबई (वार्ताहर) : कसोटी क्रिकेटचे भविष्य धोक्यात असल्याची चर्चा मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात होत आहे. दरम्यान भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंहनेही टी-२० क्रिकेटमुळे कसोटी क्रिकेट धोक्यात असल्याचे म्हटले आहे.


युवराज सिंह म्हणाला की, सध्याचे क्रिकेटप्रेमी टी-२० क्रिकेटला अधिक पसंत करत आहेत. त्यामुळे कसोटी क्रिकेटमधील रोमांच कमी होत आहे. आजकाल अनेकांना टी-२० क्रिकेट खेळणे आणि पाहणे अधिक आवडते. त्यात टी-२० क्रिकेट सामन्यांमध्ये पैसाही मोठ्या प्रमाणात मिळत असल्याने अधिक क्रिकेटर्स या क्रिकेट फॉर्मेटमध्ये अधिक रस घेत आहेत. कसोटी आणि टी-२० ची तुलना करताना का कोणता खेळाडू ५ लाखांसाठी ५ दिवस खेळणे पसंत करेल असेही युवराज म्हणाला.


युवराज सिंह पुढे म्हणाला की, सद्यस्थितीला सर्व दिग्गज खेळाडू जे भलेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळत नाहीत, पण टी-२० क्रिकेट खेळून कोट्यवधी कमावत आहेत. कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या अनेक देशांची स्वत:ची टी-२० लीग देखील आहे. युवराजच्या मते ज्या वेगाने टी-२० क्रिकेट वाढत आहे.

Comments
Add Comment

आयसीसी क्रमवारीत भारतीय महिलांचा डंका

शफाली, रेणुकाची झेप; दीप्तीचा 'नंबर १' कायम नवी दिल्ली: आयसीसीच्या ताज्या महिला टी-२० क्रमवारीत भारतीय खेळाडूंनी

विराटसाठी २८ हजार धावांचा टप्पा हाकेच्या अंतरावर

सचिन-संगकाराच्या क्लबमध्ये एन्ट्रीसाठी २५ धावांची गरज मुंबई : भारतीय क्रिकेटचा 'किंग' विराट कोहली पुन्हा एकदा

भारताचे मिशन ‘क्लीन स्वीप’ यशस्वी

हरमनप्रीतच्या ६८ धावा; मालिका ५-० ने खिशात तिरुवनंतपुरम : भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२०

टी-२० सामन्यात सोनम येशेचा ८ बळींचा जागतिक विक्रम

भूतानच्या फिरकीपटूने म्यानमारविरुद्ध रचला इतिहास; ४ षटकांत दिल्या ७ धावा भूतान : फिरकीपटू सोनम येशे याने इतिहास

न्यूझीलंडविरुद्ध वनडेतून ३ स्टार खेळाडूंचा पत्ता कट ? दिग्गजांचं कमबॅक ?

मुंबई : जानेवारीत न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी बीसीसीआय लवकरच संघाची घोषणा करणार

गौतम गंभीरच भारताचा कसोटी प्रशिक्षक

नवी दिल्ली : गौतम गंभीर भारताचा कसोटी प्रशिक्षक म्हणू्न कायम राहील. बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया यांनी स्पष्ट