दुखापतीमुळे सूर्यकुमार यादव आयपीएलमधून बाहेर

  61

मुंबई : मुंबई इंडियन्सचा फलंदाज सूर्यकुमार यादव आयपीएल २०२२ च्या उर्वरित सामन्यांत खेळताना दिसणार नाही. गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्सच्या सामन्या दरम्यान यादवच्या डाव्या हाताला झालेल्या स्नायूच्या दुखापतीमुळे २०२२ च्या आयपीएल मधून बाहेर गेला आहे. आयपीएलच्या अधिकृत ट्वीटरवर याबाबतची माहिती मिळाली आहे.

https://twitter.com/IPL/status/1523652959199907842

यामुळे कोलकात्याविरोधात आज होणाऱ्या सामन्याआधी मुंबई संघाला मोठा धक्का बसला आहे. दुखापतीमुळे आयपीएलच्या सुरुवातीला काही सामन्यांना सूर्यकुमार मुकला होता. आता दुखापतीमुळे सूर्यकुमार यादवला आयपीएलला मुकावे लागले आहे.


आयपीएलच्या यंदाच्या हंगामात सूर्यकुमार यादवने मुंबईसाठी आठ सामने खेळले आहेत. ज्यात ४३.२९ च्या सरासरीने ३०३ धावा केल्या आहेत. ज्यात तीन अर्धशतकाचा समावेश आहे. विशेष म्हणजे, सूर्यकुमार यादवला दुखापतीमुळे आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील सुरूवातीच्या तीन सामन्यांना मुकावे लागले होते.

Comments
Add Comment

R Ashwin IPL Retirement: आर. अश्विनने आयपीएलला दिला निरोप! म्हटले "प्रत्येक शेवट ही एक..."

चेन्नई: भारतीय ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनने इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. पण

मिस्टर ३६०' एबी डिव्हिलियर्सचे आरसीबीमध्ये पुनरागमनाचे संकेत, पण नव्या भूमिकेत!

बंगळुरू: रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (RCB) संघाचा लाडका खेळाडू, 'मिस्टर ३६०'

Dream11 OUT Team India Sponsorship : ऑनलाइन गेमिंग कायद्याचा फटका; BCCI ला तब्बल ११९ कोटींचा दणका, सरकारच्या निर्णयामुळे Dream११ मागे

मुंबई : भारत सरकारने अलीकडेच ऑनलाइन गेमिंग कायदा लागू केला आहे. या कायद्यानुसार पैशांच्या आधारे खेळल्या

Pujara Retirement : टीम इंडियामधून ९ महिन्यांत ४ दिग्गजांनी घेतली निवृत्ती

मुंबई: भारतीय क्रिकेट संघात गेल्या काही महिन्यांपासून निवृत्तीची त्सुनामी आल्याचे चित्र आहे. गेल्या ९

Virat Kohli Comeback: विराट कोहली धमाकेदार पुनरागमनासाठी सज्ज! लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर सराव करताना दिसला

लॉर्ड्स : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL)

भारत-पाकिस्तान सामन्यांबाबत भारत सरकारची कठोर पाऊले, आशिया कपबद्दलही महत्त्वाचा निर्णय

नवी दिल्ली: भारत सरकारने भारत-पाकिस्तान क्रीडा सामन्यांबाबत कठोर भूमिका घेतली आहे. भारतीय संघ पाकिस्तानमध्ये