प्रा. रश्मी शेट्ये – तुपे
पिंगुळी, स्वातंत्र्यपूर्व काळातील सावंतवाडी संस्थानातील एक गाव. पिंगळा पक्ष्याचा हुबेहूब आवाज काढण्यावरून हे लोक पिंगळा म्हणून तर त्यांच्या वास्तव्यामुळे हे गाव पिंगुळी म्हणून प्रसिद्ध ओळखले जाऊ लागले. कळसूत्री बाहुल्या, चामड्याच्या बाहुल्या, चित्रकथी, पोतराजा, नंदीबैल अशा लोककला सादर करून आपली उपजीविका करू लागले. या ठाकर आदिवासी लोकांची स्वतःची अशी एक संस्कृती आहे. ठाकरांच्या अनेक पिढ्यांनी ती जोपासली. त्यांच्या या कलाप्रकारांनी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा आणि कारवार प्रांतात आपल्या कला सादर करून इथल्या लोकांचे शेकडो वर्षे मनोरंजन केले.
स्वतंत्र भारतात शिक्षणाचा प्रसार झाला आणि सारेच कलाप्रकार नामशेष झाले. नव्या पिढीचा लोककला विषयीचा दृष्टिकोन बदलला आणि त्यांचा ऱ्हास अटळ ठरला. मात्र काही अंशी जुने जाणते लोककलावंत या कलांची आजही जोपासना करीत आहेत. अशावेळी या कलांचा मागोवा घेत त्यावर पुस्तक लिहून लेखक रामचंद्र वरक यांनी सांस्कृतिक ठेवा जतन करण्याच्या दृष्टीने मोलाचे पाऊल उचलले आहे. पिंगुळीच्या ठाकर आदिवासींच्या सांस्कृतिक जीवनाचा एका व्यासंगी लेखकाने घेतलेला हा मागोवा आहे. लोककलांचे संशोधक, कवी अशोक परांजपे, अभ्यासक
कै. प्रा. डॉ. रमेश कुबल, प्रा. डॉ. पुष्पलता राजापुरे-तापस आदींच्या मार्गदर्शनातून लेखकाची लोककलाविषयक दृष्टी समृद्ध होत गेली. ‘धनगरगाथा’, ‘दशावतारी नाट्यसंहिता’, असे वेगळ्या धाटणीचे साहित्यही लेखकाकडून लिहिले गेले आहे. या पुस्तकातून सांस्कृतिक ठेवा जतन केला गेल्याचे दिसून येते.
rashmishetye@gmail.com
डॉ. राणी खेडीकर: अध्यक्ष बाल कल्याण समिती, पुणे आज फेसबुकवर एक खूप वायरल झालेली पोस्ट…
रवींद्र मुळे: अहिल्या नगर काश्मीरमधील पहलगाम येथील क्रूर आणि भ्याड हत्याकांडाने सगळा देश हादरून गेला…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण द्वादशी शके १९४७ . चंद्र नक्षत्र पूर्वा भाद्रपदा योग ऐद्र.…
काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरनमध्ये दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याने भारताच्या सर्वोच्च स्थानी असलेल्या जम्मूपासून ते…
बंगलोर: इंडियन प्रीमियर लीगच्या ४२व्या सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने राजस्थान रॉयल्सला ११ धावांनी हरवले…
नैना प्रकल्पाची गतीने अंमलबजावणी करावी मुंबई : भविष्यातील आव्हाने लक्षात घेता पर्यावरण पूरक आणि समृद्ध…