देवबाग बंधाऱ्याचे काम प्राधान्याने करणार: निलेश राणे

  57

मालवण (वार्ताहर) : देवबाग गावाचे पावसाळ्यात होणाऱ्या समुद्री अतिक्रमणापासून संरक्षण करण्यासाठी अत्यावश्यक ठिकाणी बंधारा घालण्याचे काम प्राधान्याने करण्यासाठी प्रयत्नशील आल्याचे माजी खासदार, भाजपचे प्रदेश सचिव निलेश राणे यांनी देवबाग येथे ग्रामस्थांशी बोलताना स्पष्ट केले.


देवबाग किनारपट्टीवर १९९० साली केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेबांनी बंधारा उभारून गाव वाचवला. सद्यस्थितीत जीर्ण झालेला बंधारा अनेक ठिकाणी कोसळला आहे, वाहून गेला आहे. आता नव्याने बंधारा उभारणी करणे गरजेचे आहे. देवबागचा बंधारा राणेच करू शकतात. अशा भावना देवबाग ग्रामस्थांनी भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांच्याशी संवाद साधताना देवबाग संगम येथे व्यक्त केल्या. मागील आठवड्यात मालवण दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी देवबाग दौरा करत ग्रामस्थांशी संवाद साधला.


पावसाळ्यात होणाऱ्या समुद्री अतिक्रमणामुळे देवबाग गावास धोका निर्माण होणार असल्याने बंधाऱ्याचे काम मार्गी लावावे अशी आग्रही मागणी त्यावेळी ग्रामस्थांनी केली होती. यावेळी मंत्री राणे यांनी आपल्या खासदार फंडातून अत्यावश्यक ठिकाणी तत्काळ बंधाऱ्याचे काम करण्यासाठी १ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही दिली होती. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मालवण दौऱ्यावर आलेल्या माजी खासदार निलेश राणे यांनी दुपारी देवबाग गावास भेट देत किनारपट्टी भागाची पाहणी केली.

Comments
Add Comment

रत्नागिरी नाचणेत मुलाकडून आईचा खून, खून करून मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न

गणेशोत्सवाच्या उत्साहात रत्नागिरी जिल्हा हादरला आहे. शहरातील नाचणे येथे पोटच्या मुलाने आपल्या आईचा निर्घृण

खेडमधील खवटी गावाजवळ खासगी बस आणि कारचा भीषण अपघात, तिघेजण गंभीर जखमी

खेडमधील खवटी गावाजवळ मंगळवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास खासगी बस आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला. या

वैभव खेडेकरांची मनसेतून हकालपट्टी, वैभव खेडेकर भाजपाच्या वाटेवर, मनसेतून 4 जणांची हकालपट्टी

गेल्या काही दिवसांपासून वैभव खेडेकर यांच्या नावाची चर्चा सुरु होती, वैभव खेडेकर भाजपमध्ये जातील अशीही शक्यता

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत ‘आरटीओ’कडून दर सूची प्रसिद्ध

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी दरतक्ता प्रसिद्ध करण्यात आले आहे.

मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी, काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम, दोन दिवस पावसाचा अंदाज

मुंबई : विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी केली आहे. सकाळपासून रिमझिम पावसाळा सुरुवात

रत्नागिरीत युनिट टेस्टमध्ये कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

रत्नागिरी जिल्ह्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. परीक्षेतील कमी गुणांमुळे भविष्याच्या चिंतेतून आईने हटकले