लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेने वाडा शहर तहानलेले

वाडा (प्रतिनिधी) : वाडा शहरातील नागरिक पाणी समस्याने त्रस्त झाले असून त्यांनी एक दिवसाआड अंघोळीचा पर्याय निवडला आहे. तरी देखील याचे लोकप्रतिनिधींना काही सोयरसुतक पडलेले नाही.


वाडा शहराची लोकसंख्या ४० हजाराहून अधिक असून दिवसेंदिवस वाढतच आहे. शहराला प्रामुख्याने वैतरणा नदीतील सिध्देश्वर बंदा-यातून पाणीपुरवठा केला जातो.


या ठिकाणी मुबलक पाणी आहे. त्यामुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या टाकितही भरपूर पाण्याची साठवणूक होत आहे.या साठ्यातून शहरातील इतर नगरांना पाणीपुरवठा सुरळीत होतो.


मात्र शिवाजी नगर, शास्त्री नगर, विवेक नगर,सोनार पाडा, शांती नगर, समर्थ नगर,विष्णुनगर या नगरातील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.येथील नागरिकांना टॅक्टरने पाणी विकत घ्यावे लागत आहे


या संदर्भात येथील सामाजिक कार्यकर्ते बंड्या सूर्वे यांनी सांगितले की , वाडा शहराची वस्ती वाढल्याने नगराची संख्या प्रचंड वाढली आहे.त्यामूळे जुनी पाणी योजना वाढत्या लोकसंख्येला पाणी पुरवठा करण्यास अपुऱ्या पडत आहेत. त्यासाठी प्रत्येक नगरासाठी टाकी पासून स्वतंत्र पाईपलाईन टाकायला हवी परंतू नगरपंचायत प्रशासनावर लोकप्रतिनिधींचा अंकुश नसल्या कारणाने वाडा शहरात पाणीटंचाई जाणवत आहे.


व्यथा आणि कथा


नगर पंचायतीकडे वेळो वेळी अर्ज विनंत्या करूनही नेहमीच तांत्रिक कारण दाखवून दोष दूर करू व लवकरच पाणी पुरवठा सुरळीत होईल, अशी आश्वासने दिली. मात्र त्याची पूर्तता केली नसल्याने ही पाणीटंचाई निर्माण झाल्याचे शिवाजी नगर येथील रहिवासी दामोदर पाटील यांनी सांगितले. पाणीटंचाईमुळे येथील नागरिकांनी आंघोळीला रामराम ठोकला आहे. तर आजूबाजूच्या खेड्यातून नोकरीनिमित्त वाड्यात राहायला आलेल्या रहिवाशांनी वाड्यातील घरे सोडून गावाकडे मुक्काम ठोकायला सुरुवात केली आहे.

Comments
Add Comment

वसई स्काय वॉकचा काही भाग कोसळला

वसई : वसई - विरार महानगरपालिका हद्दीत सध्या धोकादायक बांधकामे,उद्यान, नाल्यावरील स्लॅब कोसळण्याचा घटना सतत घडत

पालघरच्या किनाऱ्यावर ३ संशयास्पद कंटेनर आढळले! सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचा इशारा

पालघर: जिल्ह्यातील किनारपट्टी भागात तीन संशयास्पद कंटेनर वाहून आल्याची बातमी समोर येत आहे. महामंडळाचे अधिकारी

Ganeshotsav 2025 : घोणसईत गणपतीबरोबर देशभक्ती! 'ऑपरेशन सिंदूर' देखावा ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू

गणेशोत्सवात देशभक्तीचा संगम – हर्षल पाटील यांचा देखावा ठरत आहे आकर्षणाचा केंद्रबिंदू पालघर : गणेशोत्सव २०२५

विरार इमारत दुर्घटनेत या १७ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये एक वर्षाच्या चिमुरडीचाही समावेश

विरार : विरार पूर्व येथील चामुंडानगरमधील रमाबाई अपार्टमेंट कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू

विरारमधील जुनी इमारत कोसळली, वाढदिवसाच्या कार्यक्रमावर काळजात धस्स करणारी घटना

विरार: गणेशोत्सवाचा आनंद सर्वत्र साजरा होत असताना, मुंबईजवळील विरारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. विरार

बेरोजगार उमेदवारांसाठी इस्राायल येथे रोजगाराची संधी

युवक-युवतींनी लाभ घेण्याचे आवाहन पालघर : महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता