लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेने वाडा शहर तहानलेले

वाडा (प्रतिनिधी) : वाडा शहरातील नागरिक पाणी समस्याने त्रस्त झाले असून त्यांनी एक दिवसाआड अंघोळीचा पर्याय निवडला आहे. तरी देखील याचे लोकप्रतिनिधींना काही सोयरसुतक पडलेले नाही.


वाडा शहराची लोकसंख्या ४० हजाराहून अधिक असून दिवसेंदिवस वाढतच आहे. शहराला प्रामुख्याने वैतरणा नदीतील सिध्देश्वर बंदा-यातून पाणीपुरवठा केला जातो.


या ठिकाणी मुबलक पाणी आहे. त्यामुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या टाकितही भरपूर पाण्याची साठवणूक होत आहे.या साठ्यातून शहरातील इतर नगरांना पाणीपुरवठा सुरळीत होतो.


मात्र शिवाजी नगर, शास्त्री नगर, विवेक नगर,सोनार पाडा, शांती नगर, समर्थ नगर,विष्णुनगर या नगरातील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.येथील नागरिकांना टॅक्टरने पाणी विकत घ्यावे लागत आहे


या संदर्भात येथील सामाजिक कार्यकर्ते बंड्या सूर्वे यांनी सांगितले की , वाडा शहराची वस्ती वाढल्याने नगराची संख्या प्रचंड वाढली आहे.त्यामूळे जुनी पाणी योजना वाढत्या लोकसंख्येला पाणी पुरवठा करण्यास अपुऱ्या पडत आहेत. त्यासाठी प्रत्येक नगरासाठी टाकी पासून स्वतंत्र पाईपलाईन टाकायला हवी परंतू नगरपंचायत प्रशासनावर लोकप्रतिनिधींचा अंकुश नसल्या कारणाने वाडा शहरात पाणीटंचाई जाणवत आहे.


व्यथा आणि कथा


नगर पंचायतीकडे वेळो वेळी अर्ज विनंत्या करूनही नेहमीच तांत्रिक कारण दाखवून दोष दूर करू व लवकरच पाणी पुरवठा सुरळीत होईल, अशी आश्वासने दिली. मात्र त्याची पूर्तता केली नसल्याने ही पाणीटंचाई निर्माण झाल्याचे शिवाजी नगर येथील रहिवासी दामोदर पाटील यांनी सांगितले. पाणीटंचाईमुळे येथील नागरिकांनी आंघोळीला रामराम ठोकला आहे. तर आजूबाजूच्या खेड्यातून नोकरीनिमित्त वाड्यात राहायला आलेल्या रहिवाशांनी वाड्यातील घरे सोडून गावाकडे मुक्काम ठोकायला सुरुवात केली आहे.

Comments
Add Comment

ऐन सणासुदीच्या तोंडावर कांद्याचे भाव घसरले, कांदा उत्पादक हवालदिल

लासलगाव : ऐन सणासुदीच्या तोंडावर कांद्याच्या बाजार भावात घसरण झाल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले

वाढवण बंदराविरोधातील स्थानिक संघटनांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

 वाढवण बंदराच्या नियोजित विकासाला स्थगिती देण्याची स्थानिक संघटनांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने

वसई-विरारमध्ये ऑटोरिक्षा-टॅक्सींसाठी मीटर बंधनकारक

१५ नोव्हेंबरनंतर मीटरशिवाय भाडे घेतल्यास थेट कारवाई. मंत्री प्रताप सरनाईक यांचा मोठा निर्णय; ठाणे, कल्याणसाठी

गारगाई पाणी प्रकल्पामुळे सहा गावे बाधित, तब्बल ४०० हेक्टर जमिनींचे केले जाणार सीमांकन

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्यावतीने पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील ओगदे गावाजवळील गारगाई नदी

विरार–डहाणू रेल्वे मार्गावर विद्युत पुरवठा खंडित; लोकल थांबल्याने प्रवाशांची गैरसोय

सफाळे : पश्चिम रेल्वेच्या विरार–डहाणू रेल्वे मार्गावर विद्युत पुरवठा अचानक खंडित झाल्याने रेल्वेसेवा

जव्हार शहरातील १२ अंगणवाडी केंद्रांवर लसीकरण ठप्प

जव्हार शहरातील तब्बल १२ अंगणवाडी केंद्रांवरील गरोदर माता आणि बालकांसाठी सुरू असलेले लसीकरण व आरोग्य तपासणीचे