महापालिका प्रशासन लागले निवडणुकीच्या कामाला

विरार : महानगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच जाहीर होणार आहे. त्यामुळे वसई-विरार महापालिका प्रशासन निवडणूक कामाच्या तयारीला लागले आहे. मतदान केंद्र तयार करणे, मतपेट्या ठेवण्यासाठी स्ट्रॉंग रूम तसेच मतमोजणी करण्यासाठी जागेची निवड आदी कामाचा आढावा आयुक्तांकडून नियमित घेतल्या
जात आहे.


वसई-विरार महापालिका क्षेत्रात २९ प्रभाग येतात. २८ प्रभागांमध्ये प्रत्येकी ४ नगरसेवक यावेळी निवडून द्यावयाचे आहेत. तर २९ व्या प्रभागातून तीन नगरसेवक निवडले जाणार आहेत. निवडणुकीच्या आनुषंगाने आरक्षण सोडत काढण्यात आली आहे.


तसेच सुरक्षा व्यवस्था, स्ट्राँग रूमची ताकद, सीसीटीव्ही पाळत ठेवणे, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची व्यवस्था, उमेदवार आणि उमेदवारांच्या प्रतिनिधींसाठी बैठक व्यवस्था, स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था यासह सर्व महत्त्वाच्या बाबींचा आढावा घेतला. यावेळी अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, दीपक सावंत, उपायुक्त स्वाती देशपांडे, प्रभारी शहर अभियंता प्रदीप पाचंगे, कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी, सुरेंद्र ठाकरे, अमोल जाधव, उपअभियंता सतीशकुमार सूर्यवंशी आणि इतर अधिकारी उपस्थित होते.


मतमोजणी एकाच ठिकाणी होणार


वसई-विरार महापालिका निवडणुकीची मोजणी यापूर्वी प्रभागनिहाय म्हणजेच ९ ठिकाणी केली जात होती. मात्र मतमोजणीच्या प्रक्रियेत अधिक सुसूत्रता यावी तसेच पोलीस यंत्रणा आणि निवडणूक कर्मचारी यांना नियोजनबद्ध पद्धतीने काम करता यावे म्हणून यावेळी एकाच ठिकाणी मतमोजणी करण्याचा पालिकेचे नियोजन आहे. महापालिकेच्या मुख्यालय इमारतीमधील पार्किंगमध्ये सर्व ११५ जागांची मतमोजणी केली जाण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

Bullet Train : बुलेट ट्रेनचे राज्यातील काम जोरात, तंत्रज्ञांनी पालघर जिल्ह्यात केली कमाल

पालघर : मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम प्रगतीपथावर आहे. केंद्रातल्या मोदी सरकार आणि राज्यातल्या फडणवीस

Mumbai-Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन: पालघरमध्ये तिसऱ्या डोंगराळ बोगद्याचे काम फत्ते; अवघ्या ५ महिन्यांत महाराष्ट्रातील 'हे' मोठे आव्हान पूर्ण

पालघर : देशातील पहिल्या हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पाच्या (high-Speed Railway Project) म्हणजेच 'मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन'च्या

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अपघातात ठार १३ जणांवर अंत्यसंस्कार, पीडित कुटुंबांचे पालकत्व शासन स्वीकारणार

डहाणू : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील धनिवरी येथे १८ मे रोजी झालेल्या भीषण अपघातातील १३ मृतांवर आज अत्यंत

Palghar Accident : काळजाचा ठोका चुकवणारं दृश्य! एकाच रांगेत १२ मृतदेह, बापूगावात महिलांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश

पालघर : आनंदाने नटलेले घर, साखरपुड्याच्या निमित्ताने जमलेले सर्व नातेवाईक आणि उत्साहाचे वातावरण... पण नियतीच्या

Palghar Accident : साखरपुड्याच्या वऱ्हाडावर काळाचा घाला, १३ जणांचा मृत्यू; मृतांच्या वारसांना मदत जाहीर

डहाणू : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणू तालुक्यातील धानोरी येथे रविवारी दुपारी एक अत्यंत भीषण आणि

Mumbai- Ahemdabad Expressway Accident : डहाणूमध्ये 100 वऱ्हाड्यांनी भरलेल्या ट्रकला भरधाव कंटेनरची धडक; 12 जणांचा जागीच मृत्यू, 25 हून अधिक गंभीर

डहाणू : साखरपुड्याचा आनंद साजरा करण्यासाठी निघालेल्या एका कुटुंबावर आणि त्यांच्या पाहुण्यांवर काळाने अचानक