नाशिकमध्ये उष्माघाताने तिघांचा बळी

नाशिक : नाशिकमध्ये उष्माघाताने तिघांचा बळी गेल्याची घटना घडली आहे. शहर परिसरात उन्हाची तीव्रता वाढत असल्याने चक्कर येण्याचे प्रकारही वाढले आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी चक्कर येऊन पडल्याने तीन जणांचा मृत्यू झाल्याची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.


पहिल्या घटनेत उत्तम केशव खरात (वय ४१, रा. शारदा निकेतन अपार्टमेंट, कामटवाडा) हे २६ एप्रिल रोजी रात्री खुटवडनगर येथील लोखंडे जॉगिंग ट्रॅकजवळ वॉकिंगसाठी गेले होते. त्यावेळी त्यांना अचानक चक्कर आल्याने ते खाली कोसळले. ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांच्या भावाने त्यांना औषधोपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून त्यांना मयत घोषित केले. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


दुसऱ्या घटनेत विकास वामन भावे (वय ६८, रा. आपेवाडी, सिरजगाव, बदलापूर, जि. ठाणे) हे महसूल आयुक्त कार्यालयासमोरील आयएसपी कॉलनी येथील महाराष्ट्र अॅलोटा इंजिनिअर अॅण्ड रिसर्च अॅकॅडमी येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी आले होते. या स्पर्धेसाठी पंच म्हणून तयारी करीत असताना त्यांना अचानक चक्कर आली व ते खाली जमिनीवर कोसळले. ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना औषधोपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


तिसऱ्या घटनेत मोहन चांदमल वर्मा (वय ६८, रा. मॉडेल कॉलनी, जेलरोड, नाशिकरोड) हे बुधवारी दुपारी मखमलाबाद गाव येथील लक्ष्मीनगर येथे राहणारे शिवप्रसाद वर्मा यांच्याकडे उधारी मागण्यासाठी आले होते. त्यावेळी ते अचानक चक्कर येऊन पडले व बेशुद्ध झाले. नागरिकांनी त्यांना मखमलाबाद येथील विठाई हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे प्राथमिक औषधोपचार करून पुढील औषधोपचारासाठी त्यांच्या मुलीने कॉलेज रोडवरील लीलावती हॉस्पिटलमध्ये औषधोपचारासाठी दाखल केले असता उपचारादरम्यान डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Bacchu Kadu Farmers Andolan : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर बच्चू कडू आज मुंबईत; संध्याकाळी ७ वाजता थेट मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा!

७ वाजता महाबैठक! मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार मुंबई : शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून

Weather Updates : समुद्र खवळणार, प्रशासनाची मोठी खबरदारी! हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचा मोठा निर्णय

अरबी समुद्र (Arabian Sea) आणि पश्चिम बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) झालेल्या हवामान बदलांमुळे (Weather Changes) महाराष्ट्राच्या

प्रतीक्षा संपली! नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात नेरळ-माथेरान मिनी ट्रेन धावणार!

नेरळ : मध्य रेल्वे प्रशासनाने नेरळ-माथेरान दरम्यानची बहुप्रतिक्षित मिनी ट्रेन सेव

‘आंदोलन कायम ठेऊन मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार’- बच्चू कडू

मुंबईला जाऊन मुख्यमंत्री फडणवीसांशी चर्चा करणार नागपूर : कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांच्या

महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातल्या आरोपीने लपवलेल्या मोबाईलमध्ये मिळाला मृत्यूपूर्वीचा 'तो' फोटो...

फलटण: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात नवा धक्कादायक खुलासा झाला आहे. आत्महत्या

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हिव्हिपॅट नाहीच; काय दिलं निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅटच्या वापराबाबत कायद्यांत तरतूद नाही मुंबई : स्थानिक