साईनाथांचा भक्तांना संदेश

Share

विलास खानोलकर

साईबाबा सांगतात, ‘मी श्रद्धा, सबुरी ठेवली, माझ्या गुरूने माझे कल्याण केले.’ असे साईबाबा म्हणतात. म्हणजेच काय, तर आपणही साईचरणी लीन व्हावे अनन्यभावाने साईंची भक्ती करावी, म्हणजे आपणालाही आयुष्याची सार्थकता लाभेल. भक्ती कशी करावी, याचे विवरण साईबाबांनी किती लीलया केले. त्यांनी ध्यानाचे महत्त्व ज्ञानापेक्षा जास्त आहे, हे आपणास दाखवून दिले. कासवी पिल्लांना ना दूध पाजते, ना चारा देते; पण एकाग्रतेने पिल्लांवर नजर ठेवून त्यांचे रक्षण करते आणि पोषण करते. एकटक नजर लावून आपण साईंचे ध्यान केले, तर मन स्थिर होऊन आपणास द्वैताचा पडदा दूर करता येईल. सर्व प्राणिमात्रांत वास करणारा साईनाथ दर्शन देईल. ज्ञान असणे महत्त्वाचे आहेच; कारण त्याशिवाय त्या वस्तूचे (ब्रह्माचे) ध्यान कसे बरे लागणार! साईंबद्दल माहिती असणे, ज्ञान असणे महत्त्वाचे आहे; परंतु साईंच्या अस्तित्वाचा जर अनुभवच झाला नसेल, तर त्या ज्ञानाचा काय फायदा! म्हणून ध्यान हवे. ध्यास हवा. त्याच्या सतत अनुसंधानात राहायला हवे. आपले विचार साईंना केंद्रस्थानी ठेवून व्हायला हवेत. तरच हित होईल. साईंवर भार टाकून आपली सत्कर्मे करीत राहणे, यातच भक्ती आली, मुक्ती आली, प्रपंचाची शक्ती आली आणि अद्वैताची प्रचीती आली. हे सद्गुरू साईनाथ, तुझा महिमा अगाध, अथांग, अमर्याद आहे. तसाच तो गोड आहे, पुन्हा पुन्हा गावा असाच आहे म्हणून तुला वंदन करून

माझ्या मना नको शिणु
दुःख नको मनी आणू ।।१।।
माझा साई उभा दारी,
माझ्या संसारा सावरी ।।२।।
तुझ्या कृपेची रे आस,
प्रीती खरी, नाही भास ।।३।।
तळमळ तुझ्या पायी,
छत्र धरी माझा साई ।।४।।
तुझ्यासाठी माझी वाणी,
तुझ्यासाठी ही लेखणी ।।५।।
कर्ता – करविता साई,
कसा होऊ मी उतराई ।।६।।

 vilaskhanolkardo@gmail.com

Recent Posts

पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्याला कशी देणार प्रतिक्रिया, गुरुवारी बिहारमध्ये कळणार

दरभंगा : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्याला भारताकडून कशी प्रतिक्रिया दिली जाणार यावरुन तर्कवितर्कांना…

10 minutes ago

१० कोटींचा बँक घोटाळा! वरिष्ठ मॅनेजर, उद्योजक व एजंटला ५ वर्षांची शिक्षा

मुंबई : तब्बल १० कोटी रुपयांच्या बनावट 'लेटर ऑफ क्रेडिट' (LC) प्रकरणात सीबीआय न्यायालयाने तीन…

21 minutes ago

Sachin Tendulkar: “हल्ल्याच्या बातमीने धक्काच बसला…” पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सचिन तेंडुलकरची भावनिक पोस्ट

मुंबई: मंगळवारी दि २२ एप्रिल रोजी जम्मू - काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथील पर्यटकांच्या…

52 minutes ago

Mumbai BMW hit and run case : गाडी थांबवता आली असती, पण माणुसकी हरवली…

वरळी BMW अपघात प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली हळहळ मुंबई : काही अपघात हे केवळ…

53 minutes ago

Ladki Bahin Yojana : तारीख ठरली! लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार १५०० रुपये

मुंबई : महायुती सरकारने (Mahayuti) महिलांच्या आर्थिक दृष्टया सक्षमीकरणासाठी 'लाडकी बहीण योजना' (Ladki Bahin Yojana)…

1 hour ago

Ram Charan: अभिनेत्याच्या जिद्दीला सलाम! केलं कठोर व्रत आणि अखेर चित्रपटाला मिळालं ऑस्कर!

मुंबई: जेव्हा चित्रपट रिलीज होणार असतो तेव्हा प्रेक्षकांना तो आवडेल की नाही , चित्रपटाला यश…

1 hour ago