काँग्रेसचे माजी नगरसेवक चंद्रकांत मोदी भाजपमध्ये

  21

भाईंदर (प्रतिनिधी) : मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे दोन वेळा नगरसेवक राहिलेले तथा माजी सभापती चंद्रकांत मोदी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले आहे.


मीरा-भाईंदर महानगरपालिकेत २००२ आणि २००७ या दोन टर्म मध्ये काँग्रेसचे नगरसेवक होते. तसेच प्रभाग समिती सभापती म्हणून राहिलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत मोदी यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला. मीरा रोड येथील शांतीनगर भागात त्यांचे वर्चस्व असून गुजराती समाज तसेच स्वामी नारायण संप्रदायात त्यांना मानणारे अनेक लोक आहेत.


मीरा रोडच्या विकासकामात त्यांचा मोठा वाटा आहे. मुंबई भाजपच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्याला केंद्रीय मंत्री नारायण राणे, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेतील विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर उपस्थित होते. यावेळी पुष्पगुच्छ देऊन मोदी यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी मीरा-भाईंदर भाजपचे जिल्हाध्यक्ष रवी व्यास, नगरसेवक सुरेश खंडेलवाल, माजी नगरसेविका डॉ. नयना वसाणी आदी उपस्थित होते.

Comments
Add Comment

परवानगीविना ३४ मजली इमारत उभी राहिलीच कशी? उच्च न्यायालयाने महापालिकेला खडसावले!

मुंबई : मुंबईत ताडदेव भागात अनिवार्य अग्निसुरक्षा परवाना आणि इतर आवश्यक परवानग्यांविना ३४ मजली इमारत कशी उभी

Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन चीनमुळे रखडली; चीनमधील बंदरात टीबीएम मशिन अडकल्या!

मुंबई : चीनमधील बंदरात टीबीएम मशिन अडकल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद

भाईंदर येथे खून करुन बिहारला फरार झालेला आरोपी १३ वर्षांनी दिल्लीत सापडला

भाईंदर : भाईंदर पूर्वेतील नवघर पोलीस ठाणे हद्दीत १३ वर्षांपूर्वी घडलेल्या एका धक्कादायक खुनाचा गुंता आता सुटला

उबाठा-मनसे एकत्र येण्याआधीच काँग्रेसचा महाआघाडीला झटका!

महापालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याची तयारी मुंबई : हिंदी सक्तीच्या विषयावरून मनसेप्रमुख राज ठाकरे आणि उबाठा

मुंबईत मरीन ड्राईव्हपेक्षा मोठा समुद्री पदपथ तयार! कधी सुरु होणार?

या मार्गाला धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता असे नाव मुंबई : मुंबईकरांसाठी

विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने काम करणार - मुख्य सचिव राजेश कुमार

मुंबई : महाराष्ट्र हे सर्व क्षेत्रात प्रगत राज्य आहे. राज्याचा मुख्य सचिव म्हणून २०४७ च्या विकसित महाराष्ट्र