आरटीई: राज्यात ५१.८२ टक्के बालकांचे प्रवेश निश्चित

Share

पुणे (हिं. स.) : शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवरील सोडतीत (लॉटरी) निवड झालेल्या बालकांपैकी आत्तापर्यंत राज्यात ५१.८२ टक्के बालकांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. तर पुणे जिल्ह्यात प्रवेशासाठी निवड झालेल्यांपैकी ५१.४९ टक्के बालकांचे प्रवेश आत्तापर्यंत निश्चित झाले आहेत. निवड झालेल्या बालकांचे प्रवेश निश्चित करण्यासाठी पालकांना येत्या शुक्रवारपर्यंत (ता. २९) मुदत आहे. आरटीईनुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येते.

या जागांवरील प्रवेशासाठी प्राथमिक शिक्षण विभागातर्फे केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. या अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू आहे. प्रवेश प्रक्रियेतील सोडत यापूर्वी जाहीर झाली आहे. राज्यातील नऊ हजार ८६ शाळांमधील एकूण एक लाख एक हजार ९०६ जागांसाठी एकूण दोन लाख ८२ हजार ७८३ अर्ज आले होते. त्यापैकी सोडतीत राज्यातून ९० हजार ६८५ विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड झाली आहे.

त्यातील ४६ हजार ९९५ विद्यार्थ्यांचे आत्तापर्यंत प्रवेश निश्चित झाले आहेत. या प्रवेश प्रक्रियेंतर्गत पुणे जिल्ह्यातील ९५७ शाळांमधील १५ हजार १२६ जागांसाठी ६२ हजार ९६० अर्ज आले होती. त्यातील १४ हजार ९५८ विद्यार्थ्यांनी सोडतीत निवड झाली असून त्यातील सात हजार ७०३ विद्यार्थ्यांचे प्रवेश अद्याप निश्चित झाले आहेत.

Recent Posts

Health Tips: उन्हाळ्यात या घरगुती गोष्टी चेहऱ्यावर लावा!

दिवसभर तुमची त्वचा ताजी राहील मुंबई: उन्हाळ्यात आपण आपल्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे. कारण आता…

26 minutes ago

मोदी सरकार भारत – पाकिस्तान सीमा सील करण्यासाठी इस्रोच्या उपग्रहांची मदत घेणार

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सागरी तसेच भू सीमा मोठी आहे. भू…

55 minutes ago

Pahalgam Terrorist Attack: जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रीयन पर्यटकांची पहिली तुकडी मुंबईत दाखल

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या आणि जम्मू कश्मीर मध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या…

1 hour ago

RCB vs RR, IPL 2025: राजस्थान बेंगळुरूला पराभवाचा धक्का देणार!

मुंबई(ज्ञानेश सावंत): राजस्थानने सलग चार सामने गमावले आहेत त्यापैकी तीन सामने अगदी थोड्या अंतराने गमावले…

1 hour ago

मुंबईकरांनो लक्ष द्या! कुर्ला ते घाटकोपर भागांत शनिवार, रविवारी पाणीकपात

महापालिकेच्या वतीने पाणीपुरवठ्याची कामे हाती घेतली जाणार मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेतर्फे घाटकोपर (पश्चिम) येथे…

2 hours ago

Health: उन्हाळ्यात डोळ्यांचे विकार होण्याचा वाढतो धोका, डोळ्यांची घ्या अशी काळजी

ठाणे (प्रतिनिधी) : उष्म्याने ठाणेकर भलतेच हैराण झाले असून, एप्रिल महिन्यात उन्हाचा तडाखा वाढत चालला…

3 hours ago