राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिमेचे आयोजन

बोईसर (वार्ताहर) : मुले निरोगी व सुदृढ राहावी यासाठी पालघर जिल्ह्यातील पाच तालुक्यांमधील वय वर्ष १ ते १९ या वयोगटातील २ लाख ७६ हजार ६९३ मुलांना जंतनाशक गोळ्या देण्यात येणार आहेत. ही मोहीम प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाडी, प्राथमिक, माध्यमिक व आश्रम शाळांमध्ये राबवण्यात येणार आहे.


पालघर जिल्ह्यामधील जव्हार, मोखाडा, वाडा, वसई, पालघर या पाच तालुक्यांमधे राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीम २५ एप्रिल रोजी तर मॉपअप दिवस २९ एप्रिल रोजी राबविण्यात येणार आहे.


या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील ग्रामिण भागातील १ ते ६ वयोगटातील ९३ हजार ८४० लाभार्थी आणि ६ ते १९ वयोगटातील १ लाख ८२ हजार ८५३ लाभार्थी आहेत, असे एकूण २ लाख ७६ हजार ६९३ मुलांना लाभ मिळणार आहे.


१ ते १९ वयोगटातील लाभार्थ्यांना अम्बेडेझॉलची गोळी (जंतनाशक) देण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत १ ते ६ वयोगटातील सर्व मुलांना अंगणवाडी केंद्रस्तरावर व ६ ते १९ वयोगटातील सर्व मुलांना शाळा, आश्रमशाळा इत्यादी ठिकाणी वयोमानानुसार जंतनाशक गोळ्या देण्यात येतील.


याद्वारे मुलांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषणस्थिती व जीवनाचा दर्जा उंचावणे हा राष्ट्रीय जंतनाशक दिनाचा उद्देश साध्य करण्याचे काम करण्यात येत आहे. ही मोहीम जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाडी, प्राथमिक व माध्यमिक शाळा, आश्रमशाळा इत्यादींमध्ये राबवण्यात येणार आहे. तसेच २५ एप्रिल ते २ मे या कालावधीत शाळाबाह्य मुलांसाठी आशा कार्यकर्त्यांमार्फत जंतनाशक गोळ्या घरी जाऊन देणात येणार आहेत.


जंतनाशक गोळीचे दुष्परिणाम नाहीत


जंतनाशक गोळी खाल्ल्यामुळे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. जंताचा प्रादुर्भाव असल्यास किरकोळ पोटदुखी, जळजळ अथवा क्वचितप्रसंगी मुलांना उलटी होऊ शकते. हे दुष्परिणाम किरकोळ स्वरूपाचे असल्याने पालकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी यांनी केले आहे.

Comments
Add Comment

नालासोपाऱ्यात ५० लाखांचा मेफेड्रोन जप्त

वसई : नालासोपाऱ्यामध्ये अमली पदार्थ तस्करीसाठी आलेल्या तीन जणांना गुन्हे प्रकटीकरण शाखा २ ने अटक केली आहे.

वसई स्काय वॉकचा काही भाग कोसळला

वसई : वसई - विरार महानगरपालिका हद्दीत सध्या धोकादायक बांधकामे,उद्यान, नाल्यावरील स्लॅब कोसळण्याचा घटना सतत घडत

पालघरच्या किनाऱ्यावर ३ संशयास्पद कंटेनर आढळले! सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचा इशारा

पालघर: जिल्ह्यातील किनारपट्टी भागात तीन संशयास्पद कंटेनर वाहून आल्याची बातमी समोर येत आहे. महामंडळाचे अधिकारी

Ganeshotsav 2025 : घोणसईत गणपतीबरोबर देशभक्ती! 'ऑपरेशन सिंदूर' देखावा ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू

गणेशोत्सवात देशभक्तीचा संगम – हर्षल पाटील यांचा देखावा ठरत आहे आकर्षणाचा केंद्रबिंदू पालघर : गणेशोत्सव २०२५

विरार इमारत दुर्घटनेत या १७ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये एक वर्षाच्या चिमुरडीचाही समावेश

विरार : विरार पूर्व येथील चामुंडानगरमधील रमाबाई अपार्टमेंट कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू

विरारमधील जुनी इमारत कोसळली, वाढदिवसाच्या कार्यक्रमावर काळजात धस्स करणारी घटना

विरार: गणेशोत्सवाचा आनंद सर्वत्र साजरा होत असताना, मुंबईजवळील विरारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. विरार