बोईसर (वार्ताहर) : मुले निरोगी व सुदृढ राहावी यासाठी पालघर जिल्ह्यातील पाच तालुक्यांमधील वय वर्ष १ ते १९ या वयोगटातील २ लाख ७६ हजार ६९३ मुलांना जंतनाशक गोळ्या देण्यात येणार आहेत. ही मोहीम प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाडी, प्राथमिक, माध्यमिक व आश्रम शाळांमध्ये राबवण्यात येणार आहे.
पालघर जिल्ह्यामधील जव्हार, मोखाडा, वाडा, वसई, पालघर या पाच तालुक्यांमधे राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीम २५ एप्रिल रोजी तर मॉपअप दिवस २९ एप्रिल रोजी राबविण्यात येणार आहे.
या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील ग्रामिण भागातील १ ते ६ वयोगटातील ९३ हजार ८४० लाभार्थी आणि ६ ते १९ वयोगटातील १ लाख ८२ हजार ८५३ लाभार्थी आहेत, असे एकूण २ लाख ७६ हजार ६९३ मुलांना लाभ मिळणार आहे.
१ ते १९ वयोगटातील लाभार्थ्यांना अम्बेडेझॉलची गोळी (जंतनाशक) देण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत १ ते ६ वयोगटातील सर्व मुलांना अंगणवाडी केंद्रस्तरावर व ६ ते १९ वयोगटातील सर्व मुलांना शाळा, आश्रमशाळा इत्यादी ठिकाणी वयोमानानुसार जंतनाशक गोळ्या देण्यात येतील.
याद्वारे मुलांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषणस्थिती व जीवनाचा दर्जा उंचावणे हा राष्ट्रीय जंतनाशक दिनाचा उद्देश साध्य करण्याचे काम करण्यात येत आहे. ही मोहीम जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाडी, प्राथमिक व माध्यमिक शाळा, आश्रमशाळा इत्यादींमध्ये राबवण्यात येणार आहे. तसेच २५ एप्रिल ते २ मे या कालावधीत शाळाबाह्य मुलांसाठी आशा कार्यकर्त्यांमार्फत जंतनाशक गोळ्या घरी जाऊन देणात येणार आहेत.
जंतनाशक गोळीचे दुष्परिणाम नाहीत
जंतनाशक गोळी खाल्ल्यामुळे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. जंताचा प्रादुर्भाव असल्यास किरकोळ पोटदुखी, जळजळ अथवा क्वचितप्रसंगी मुलांना उलटी होऊ शकते. हे दुष्परिणाम किरकोळ स्वरूपाचे असल्याने पालकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी यांनी केले आहे.
मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकणाऱ्या टीम इंडियाचे मुंबईत जोरदार स्वागत झाले. लाखो मुंबईकरांनी टीम इंडियाच्या…
मुंबई: रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने टी-२० वर्ल्डकप जिंकत मोठा इतिहास रचला आहे. या टीम…
मुंबई: दही साखर हातात ठेवणे ही हिंदू धर्मातील महत्त्वाची परंपरा आहे. दही-साखर खाणे शुभ मानले…
विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या अथक प्रयत्नांना यश मुंबई : गोकुळदास तेजपाल रुग्णालय, मुंबई…
मुंबई: मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर आलेल्या लाखो चाहत्यांमध्ये सहकार्य आणि सहृदयतेचे अद्भुत दृश्य पाहायला मिळाले. वर्ल्डकप…
मुंबई: टीम इंडिया(team india) विक्ट्री परेडसाठी मुंबईत पोहोचले आहेत. भारतीय संघाचे मुंबई एअरपोर्टवर दिमाखात स्वागत…