पालखी रथासाठी बैलजोडीचा मान शेतकरी पांडुरंग वरखडे यांना मिळाला

पुणे (हिं.स.) : आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा २०२२ या वर्षी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ज्या रथातून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवते. त्या रथाला बैलजोडीचा मान आळंदी येथील प्रगतशील शेतकरी पांडुरंग वरखडे यांना मिळाला आहे. दोन वर्ष कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा हा प्रातिनिधीक स्वरुपात मोजक्या वारकऱ्यांच्या समवेत एसटी महामंडळाच्या बसने पार पडला गेला.


यंदा मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने पालखी सोहळा पायी जाणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा २१ जुन रोजी होणार आहे. त्याच अनुषंगाने संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा बैलजोडी समिती सदस्यांच्या झालेल्या सभेत रोटेशन नुसार एकमताने आळंदीतील पांडुरंग वरखडे यांच्या कुटुंबाला संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील बैलजोडीचा मान देण्याचा निर्णय घेतला गेला आहे.


यावेळी विश्वस्त अभय टिळक, बैलजोडी समितीचे अध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे, सदस्य शिवाजीराव रानवडे, विलास घुंडरे, रामदास भोसले, नंदकुमार कुऱ्हाडे, माऊली वहीले, रमेश कुऱ्हाडे, पांडुरंग वरखडे, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर उपस्थित होते.

Comments
Add Comment

Chhatrapati Sambhajinagar Murder : तलवारीने सपासप वार अन् ३० सेकंदांत…छत्रपती संभाजीनगरमध्ये दिवसाढवळ्या तरुणाचा खून

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहराच्या जुन्या भागातील शहाबाजार परिसरात शुक्रवारी (३१

Maharashtra Rain : मोंथाचा मुक्काम लांबला! तुळशीचं लग्न गाजणार, नोव्हेंबर महिनाही पावसाचा; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना IMD चा थेट इशारा!

नोव्हेंबर महिना (November) उजाडला असला तरी, अद्याप पाऊस जाण्याचं नाव घेत नाहीये. मे महिन्यापासून सुरू झालेला हा पाऊस

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मुख्यमंत्र्यांच्या सल्लागारांच्या अध्यक्षतेखाली ‘उच्चाधिकार समिती’ गठीत

मुंबई : शेतकऱ्यांची थकीत कर्जाच्या विळख्यातून कायमस्वरुपी सोडवणूक करण्यासाठी, त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी

राष्ट्रीय सागरी मत्स्यव्यवसाय जनगणना २०२५ ला प्रारंभ

मुंबई : भारतातील सागरी मत्स्य व्यवसायाला अधिक बळकटी देण्यासाठी व मच्छीमार समुदायाच्या सर्वांगीण विकासासाठी

“आजच्या तुलनेत आठ महिन्यांनी होणारी कर्जमाफी अधिक फायद्याची” – बच्चू कडू

नागपूर : राज्यातील शेतकऱ्यांकडून तात्काळ कर्जमाफीची मागणी होत असताना, आजच्या तुलनेत 8 महिन्यांनी जाहीर होणारी

कार्तिकीसाठी राज्यातील विविध मार्गावरून ५५० एसटी बसेस धावणार

सोलापूर : सावळ्या विठ्ठलाचे भक्त असलेल्या वारकऱ्यांसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून सोलापूरसह सांगली, सातारा,